शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : भाड्याच्या कार्यालयावर ७५ लाखांची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 13:39 IST

ताराबाई रोडवरील हक्काच्या जागेऐवजी कर्मचाऱ्यांनाही फिरता येत नाही अशा तोकड्या जागेवर एवढी मोठी रक्कम खर्च करताना न्याय व विधी खात्याची परवानगी घेतली नाही. याच रकमेत नवीन इमारतीचे बांधकाम झाले असते.

इंदूमती गणेशकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील भाड्याच्या कार्यालयाच्या नूतनीकरणावर ७५ लाख रुपयांची बेकादेशीररत्या उधळपट्टी करण्यात आली आहे, अंतिम बिल येणे अजून बाकी असून ही रक्कम ८७ लाख असल्याचे समितीच्या सूत्रांनी सांगितले. ताराबाई रोडवरील हक्काच्या जागेऐवजी कर्मचाऱ्यांनाही फिरता येत नाही अशा तोकड्या जागेवर एवढी मोठी रक्कम खर्च करताना न्याय व विधी खात्याची परवानगी घेतली नाही. याच रकमेत नवीन इमारतीचे बांधकाम झाले असते.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची स्थापना १९६७ साली झाली, त्यानंतर १९७१ च्या दरम्यान शिवाजी पेठेतील बलभीम बँकेच्या तळमजल्यात समितीने भाड्याने कार्यालय थाटले. त्यासाठी त्यावेळी नाममात्र भाडे होते. दोन तीन वेळा दुरुस्तीची कामे निघाली जी बँकेने स्वखर्चाने करुन दिली. असे असताना २०१९ मध्ये कार्यालयाच्या नूतनीकरणाचा ठराव केला. तत्पूर्वीच्या समितीने २०११ मध्ये महालक्ष्मी बँकेची अंबाबाई मंदिराजवळील ताराबाई रोडवरील साडेतीन हजार चौरस फुटाची जागा खरेदी केली होती. दरम्यान बलभीम बँकेचे अपना बँकेत विलीनीकरण झाले. अनेकदा बँकेने समितीला कार्यालयाची जागा रिकामी करण्यास सांगितले. तरीही मोठ्या रकमेच्या ठेवी ठेवून कार्यालयाच्या नूतनीकरणावर ७४ लाख रुपये खर्चण्यात आले. या चुकीच्या निर्णयाला शासनाने प्रतिनिधी म्हणवणाऱ्या तत्कालीन सचिवांनी विरोध केला नाही.

नूतनीकरण नेमके कशाचे..एल आकारातील हे कार्यालय बोळासारखे असून तेवढ्यातच मिटींग हॉल, अध्यक्ष, सचिव, सहसचिव, अकौंटंट, अभियंता यांच्या केबिन्स केल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेच्या डब्यासारखी व्यवस्था केली आहे. देवस्थानमधील कामांसाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी मात्र साधे बाकडे नाही अशा कार्यालयावर लाखो रुपये खर्च केले. त्याचवेळी एका पदाधिकाऱ्याच्या लॉजचे इंटिरिअरचे काम सुरू होते.

६३ लाख दिले..अंतिम बिल अजून नाहीच...नूतनीकरणासाठी मार्च २०१९ मध्ये निविदा काढली, सर्वात कमी दर भरलेल्या ठेकेदाराला ५३ लाख १७ हजार १६५ रुपयांचे काम देण्यात आले त्यासाठी १२० दिवसांची मुदत दिली. कामे वाढवून ठेकेदाराला आजवर ६३ लाख रुपये करवीर निवासिनी फंडातून देण्यात आले. नगदी दप्तरी हुकूमानुसार १ फेब्रुवारी २०२० पर्यंत ७४ लाख रुपयांचे काम करण्यात आले. अंतिम बिल येणे असून ही रक्कम ८७ लाख असल्याचे समितीतून सांगण्यात आले.

न्याय विधीची परवानगी नाहीदेवस्थानला प्रत्येक कामासाठी न्याय व विधी खात्याची परवानगी घ्यावी लागते पण नूतनीकरणासाठी ती परवानगी घ्यावी असे समितीला वाटले नाही. त्याचवेळी महालक्ष्मी बँकेच्या जागेवर बांधकाम सुरु आहे. नूतनीकरणाचा खर्चातून नवीन इमारत उभारली गेली असती याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे बेजाबदारपणे केलेला हा खर्च वसुलीस पात्र आहे.

बांधकाम रखडले..कपिलतीर्थ मार्केट जवळील सात मजली इमारत बांधकामाचा ठेका ज्या व्यक्तीला दिला गेला त्याच्याऐवजी दुसऱ्याकडून हे काम केले जात असून गेल्या दोन वर्षात याचे बेसमेंटचे सुद्धा काम झालेले नाही. मुदत संपायला सहा महिने राहिल्यानंतर आता ठेकेदाराला नोटीस काढली जाणार असल्याचे समितीतून सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर