शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानात भ्रष्टाचार

By admin | Updated: April 7, 2017 01:05 IST

शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील जलयुक्तशिवार अभियानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय समिती नेमून संपूर्ण योजनेची चौकशी करावी, तसेच भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी केले.दरम्यान, या जलयुक्तशिवार अभियानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी इन्कार केला; पण या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले.जलयुक्त शिवार या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ६९ गावांत सुमारे ३० कोटींचा निधी खर्च पडून १२०९ कामे केली, पण बहुतांश कामे निरुपयोगी, निकृष्ट, पाणी न अडविणारी झाल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने केला. शेततळी केली असली तरीही पाणी साठत नाही. काही तळी आणि माती नाला बांध आत्ताच मातीने भरले आहेत. कामे घाईत उरकून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केला.या कामाच्या आधारे कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने पाणीसाठा निर्मिती झाली आहे, असे दाखविले; पण प्रत्यक्षात खोटा अहवाल दिला आहे. हे अभियान राबविताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, दरवर्षी पाणीटंचाईचा होणारा आराखडा, भूजल पातळी याचा विचार केला नाही. जलसंपदा विभाग, कृषी विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्यात समन्वय नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचाही आरोप करण्यात आला.या शिष्टमंडळात शहरप्रमुख दुर्गेश लिग्रस, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगले, राजू यादव, विनोद खोत, शशी बिडकर, राजू सांगावकर, सुनील पोवार, संभाजीराव भोकरे, संजय जाधव, दिलीप देसाई, प्रसाद आडनाईक, प्रवीण सावंत, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)