शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

जलयुक्त शिवार अभियानात भ्रष्टाचार

By admin | Updated: April 7, 2017 01:05 IST

शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील जलयुक्तशिवार अभियानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय समिती नेमून संपूर्ण योजनेची चौकशी करावी, तसेच भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी केले.दरम्यान, या जलयुक्तशिवार अभियानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी इन्कार केला; पण या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले.जलयुक्त शिवार या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ६९ गावांत सुमारे ३० कोटींचा निधी खर्च पडून १२०९ कामे केली, पण बहुतांश कामे निरुपयोगी, निकृष्ट, पाणी न अडविणारी झाल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने केला. शेततळी केली असली तरीही पाणी साठत नाही. काही तळी आणि माती नाला बांध आत्ताच मातीने भरले आहेत. कामे घाईत उरकून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केला.या कामाच्या आधारे कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने पाणीसाठा निर्मिती झाली आहे, असे दाखविले; पण प्रत्यक्षात खोटा अहवाल दिला आहे. हे अभियान राबविताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, दरवर्षी पाणीटंचाईचा होणारा आराखडा, भूजल पातळी याचा विचार केला नाही. जलसंपदा विभाग, कृषी विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्यात समन्वय नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचाही आरोप करण्यात आला.या शिष्टमंडळात शहरप्रमुख दुर्गेश लिग्रस, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगले, राजू यादव, विनोद खोत, शशी बिडकर, राजू सांगावकर, सुनील पोवार, संभाजीराव भोकरे, संजय जाधव, दिलीप देसाई, प्रसाद आडनाईक, प्रवीण सावंत, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)