शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जलयुक्तमध्ये पाणीपातळीऐवजी भ्रष्टाचारच वाढला - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 19:37 IST

Hasan Mushrif, chandrakant patil, kolhapur भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत १० हजार कोटी निधीवर डल्ला मारल्याचे कॅगच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या अभियानामुळे गावागावांत पाण्याची पातळी वाढण्याऐवजी भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. गेल्या पाच वर्षांत हायब्रिड ॲन्युइटी योजनेंतर्गत झालेल्या रस्ते प्रकल्पांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ठळक मुद्देजलयुक्तमध्ये पाणीपातळीऐवजी भ्रष्टाचारच वाढला - हसन मुश्रीफहायब्रिड ॲन्युइटी योजनेतील रस्ते प्रकल्पांचीही चौकशी व्हावी

कोल्हापूर : भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत १० हजार कोटी निधीवर डल्ला मारल्याचे कॅगच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या अभियानामुळे गावागावांत पाण्याची पातळी वाढण्याऐवजी भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. गेल्या पाच वर्षांत हायब्रिड ॲन्युइटी योजनेंतर्गत झालेल्या रस्ते प्रकल्पांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.भाजप सरकारने एकेका प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता ही मूळ किमतीच्या ९०० टक्के, ७०० टक्के, ६०० टक्के, ५०० टक्के एवढी वाढवून दाखविली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जलशिवार योजनेमध्ये लोकसहभाग होता म्हणून सांगू लागलेत, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु शासनाच्या १० हजार कोटी निधीवर डल्ला मारला, असा गंभीर अहवाल कॅगने दिला.

चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत मी सतत म्हणत होतो, की ते फार भाग्यवान नेते आहेत, त्यांच्याकडे एवढी महत्त्वाची खाती आणि जबाबदारी आहे; परंतु त्यांच्या पाच वर्षांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला तर सोडाच, कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झाला नाही; कारण कृष्णा खोरे लवादाप्रमाणे कोल्हापूरच्या वाट्याला १३ ते १४ टीएमसी पाणी अडविणे अपेक्षित होते; परंतु पाच वर्षांत एक थेंबही पाणी अडविले नाही.हायब्रिड ॲन्युइटी योजनेंतर्गत घेतलेली कामे आजघडीला बंद आहेत. रस्त्यांचे कंत्राटदार गायब झालेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे किमान आपल्या जिल्ह्यातील रस्ते तरी चांगले करण्याची जबाबदारी होती. त्यामध्येही ते अपयशी ठरले. गारगोटी-कोल्हापूर हा रस्ता दोन-तीन वर्षांतच खराब झाला.

निपाणी-राधानगरी रस्त्याचे कामच बंद आहे. या रस्त्याची तर एवढी वाईट अवस्था आहे की नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. या योजनेतील कामांच्या चौकशीबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर