शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दूषित पाणीप्रश्नी अधिकारी धारेवर

By admin | Updated: April 10, 2015 23:47 IST

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित सांडपाणी तळंदगेच्या ओढ्यात

हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया केंद्रामधून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच प्रदूषित पाणी तळदंगे (ता. हातकणंगले) गावाच्या ओढ्यामध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार सूचना व आंदोलन व तक्रारी करुनही यामध्ये बदल होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईडीपी असोसिएशन व ठेकेदार थर्म्याक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले.दरम्यान, तळदंगे ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता याप्रश्नी योग्य मार्ग काढावा, अन्यथा सर्व संबंधित घटकांच्या विरोधात न्यायालयात धाव घ्यावी लागेल, तसेच ए. व्ही. एच. प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची कोणीही वाट पाहू नये, असा सज्जड दम उपसरपंच राजेंद्र हवालदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष सागर चौगुले यांनी यावेळी दिला. सीईटीपी असोसिएशन व ठेकेदार असणाऱ्या थर्म्याक्स कंपनीची संयुक्त बैठक घेवून प्रदूषित पाणीप्रश्नी मार्ग काढू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने तळंदगे गावानजीक सीईटीपी प्रकल्पाची उभारणी केली आहे. हा प्रकल्प चालविण्यासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईटीपी असोसिएशनला देण्यात आला आहे. या असोसिएशनने या प्रकल्पाची देखभाल व हाताळणी करण्याची जबाबदारी पुण्याच्या थर्म्याक्स कंपनीली दिली आहे. प्रदूषण महामंडळाने नेहमीप्रमाणे पाण्याचे नमुने घेतले. औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी याप्रश्नी बैठक घेऊन सूचना देणे व मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. रमेश औटी, डी. आर. शेंडे, आर. एस. जाधव, सुहास महादर, आर. एस. माधव, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)दोन महिन्यांपूर्वी तळंदगे ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रकल्पातून प्रक्रिया केलेले व ग्रामस्थांची तक्रार येणार नाही, याबाबतची खबरदारी घेऊन पाणी सोडण्यात येत होते. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून पूर्ववत दुर्गंधीयुक्त, काळे व कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी गावाच्या ओढ्यात सोडण्यात येत आहे. याबाबत तक्रार देऊनही काहीच फरक पडत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना ओढ्यानजीक बोलावून घेऊन परिस्थितीची जाणीव करुन दिली.यावेळी ग्रामस्थांनी सर्वच अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करुन भंडावून सोडले.