शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दूषित पाणीप्रश्नी अधिकारी धारेवर

By admin | Updated: April 10, 2015 23:47 IST

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित सांडपाणी तळंदगेच्या ओढ्यात

हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया केंद्रामधून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच प्रदूषित पाणी तळदंगे (ता. हातकणंगले) गावाच्या ओढ्यामध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार सूचना व आंदोलन व तक्रारी करुनही यामध्ये बदल होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईडीपी असोसिएशन व ठेकेदार थर्म्याक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले.दरम्यान, तळदंगे ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता याप्रश्नी योग्य मार्ग काढावा, अन्यथा सर्व संबंधित घटकांच्या विरोधात न्यायालयात धाव घ्यावी लागेल, तसेच ए. व्ही. एच. प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची कोणीही वाट पाहू नये, असा सज्जड दम उपसरपंच राजेंद्र हवालदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष सागर चौगुले यांनी यावेळी दिला. सीईटीपी असोसिएशन व ठेकेदार असणाऱ्या थर्म्याक्स कंपनीची संयुक्त बैठक घेवून प्रदूषित पाणीप्रश्नी मार्ग काढू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने तळंदगे गावानजीक सीईटीपी प्रकल्पाची उभारणी केली आहे. हा प्रकल्प चालविण्यासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईटीपी असोसिएशनला देण्यात आला आहे. या असोसिएशनने या प्रकल्पाची देखभाल व हाताळणी करण्याची जबाबदारी पुण्याच्या थर्म्याक्स कंपनीली दिली आहे. प्रदूषण महामंडळाने नेहमीप्रमाणे पाण्याचे नमुने घेतले. औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी याप्रश्नी बैठक घेऊन सूचना देणे व मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. रमेश औटी, डी. आर. शेंडे, आर. एस. जाधव, सुहास महादर, आर. एस. माधव, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)दोन महिन्यांपूर्वी तळंदगे ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रकल्पातून प्रक्रिया केलेले व ग्रामस्थांची तक्रार येणार नाही, याबाबतची खबरदारी घेऊन पाणी सोडण्यात येत होते. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून पूर्ववत दुर्गंधीयुक्त, काळे व कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी गावाच्या ओढ्यात सोडण्यात येत आहे. याबाबत तक्रार देऊनही काहीच फरक पडत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना ओढ्यानजीक बोलावून घेऊन परिस्थितीची जाणीव करुन दिली.यावेळी ग्रामस्थांनी सर्वच अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करुन भंडावून सोडले.