शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

सुधारित बातमी - बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST

कोल्हापूर : बालकल्याण संकुलमधील १४ मुली रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील ...

कोल्हापूर : बालकल्याण संकुलमधील १४ मुली रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा अंदाज दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. तोपर्यंतच या मुली पॉझिटिव्ह आल्याने लहान मुलांचा धोका वाढला आहे.

कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथांचे संगोपन केले जाते. कोरोनाचा कहर सुरू होऊन एक वर्ष झाले तरी आजपर्यंत एकही रुग्ण संकुलात आढळला नव्हता; पण रविवारी वर्षभराच्या काळजीवर पाणी फिरवत येथे कोरोनाने शिरकाव करत ६ ते १८ वयोगटातील तब्बल १४ जणींना बाधित केले. यामुळे बाल कल्याण संकुल प्रशासन हादरले असून, तातडीने उपचार व तपासण्या सुरू केल्या आहेत.

पाण्याच्या खजिन्याजवळील या संकुलमध्ये एका मुलीला तापाची लक्षणे जाणवत होती, म्हणून अँटिजन चाचणी केली असता ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आली. लगेच तिच्या संपर्कातील अन्य मुलींची तपासणी केली गेली. यात आणखी १३ जणी पॉझिटिव्ह आढळून आल्या. तातडीने त्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले. संपूर्ण संकुलात औषध फवारणी करण्यात आली. आणखी कोणाला लागण झाली असल्यास कळावी म्हणून आज, सोमवारी महापालिकेतर्फे मुलांची अँटिजन चाचणी केली जाणार आहे.

२५० मुलांचा सांभाळ

बालकल्याण संकुलमध्ये पाच युनिटमध्ये २५० मुले - मुली राहतात. त्यात ४६ मुली आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्यांमध्ये सहा वर्षांची एक, आठ वर्षांची एक, नऊ आणि १० वर्षांच्या तीन आणि उर्वरित १७ ते १८ वयोगटातील मुली आहेत.

- प्रकृती चांगली-

कोरोना झालेल्या या मुलींमध्ये सध्या कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती चांगली आहे.

- असा झाला शिरकाव-

बालकल्याण संकुलमध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत आणलेल्या मुलींनाही ठेवले जाते. त्यांना कोणतीही वेगळी वर्तणूक देता येत नाही. गेल्या आठवड्यात अशा १० ते १२ मुली आल्या होत्या. त्यांची कोणतीही चाचणी न घेता तसेच स्वतंत्र विलगीकरण न करताच त्यांना येथे ठेवले गेले. पाॅझिटिव्ह आढळलेल्या १४ जणींमध्ये तब्बल सहा ते सात जणी अशा बाहेरून आलेल्या आहेत. त्यांच्यामुळेच लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पुरेशी काळजी तरीही..

गेले वर्षभर खूप काळजी घेतली जात आहे. या मुलांच्या संपर्कात कोणी येऊ नये म्हणून बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अंघोळ करून कपडे बदलून मगच आत यावे, असा नियम होता. त्याचे काटेकोर पालन आजही केले जाते. आम्ही खूप काळजी घेतली; पण पोक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या मुलींमुळेही येथील लहानग्या मुलांना त्रास सहन करावा लागला आहे. बाहेरून येणाऱ्या मुलींसाठी विलगीकरण कक्षाची गरज आहे.

पद्मजा तिवले

मानद कार्यवाह

बालकल्याण संकुल कोल्हापूर.