शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

CoronaVirus Lockdown : परप्रांतीय कामगारांना थांबवा; अन्यथा उद्योग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:42 IST

कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

ठळक मुद्देपरप्रांतीय कामगारांना थांबवा; अन्यथा उद्योग बंद उद्योजकांची भीती : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली रणजित शहा, संजय शेटे, गोरख माळी, अतुल पाटील, मंगेश पाटील, प्रदीप व्हरांबळे यांनी निवेदन दिले. निवेदनावर सचिन शिरगावकर, सुुमित चौगुले यांच्याही सह्या आहेत.लॉकडाऊननंतर गेल्या काही दिवसांत उद्योग सुरू झाले आहेत; परंतु विविध अडचणींमुळे ते पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. वाहतुकीची अडचण, कच्च्या मालाचा तुटवडा, महानगरे बंद असल्याने अडचणी येत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात उद्योजकांनी परप्रांतीय कामगारांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेतली. त्यांचा पगारही दिला आहे; परंतु शासनाने मोफत रेल्वेची सोय केल्याने परप्रांतीय मजूर गावी जात आहेत.

त्याचा फटका स्थानिक उद्योगांना बसणार आहे. त्यामुळे सुरू झालेले उद्योग बंद पडण्याची भीती आहे. त्यातून उर्वरित कामगारांनाही पगार देणे अशक्य होईल. यासाठी या मजुरांना थांबविणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरू झालेले उद्योग तरी निदान नियमितपणे सुरू राहतील.मजूर का गेले गावी...१. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग जास्त असल्याने कुटुंबीयांना वाटणारी भीती.२. लॉकडाऊन वाढला तर पोटाला काय खायचे याची चिंता.३. रेल्वेची मोफत सोय होत आहे तर गावी जाऊन येऊ ही भावना.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर