शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

CoronaVirus Lockdown : परप्रांतीय कामगारांना थांबवा; अन्यथा उद्योग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:42 IST

कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

ठळक मुद्देपरप्रांतीय कामगारांना थांबवा; अन्यथा उद्योग बंद उद्योजकांची भीती : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली रणजित शहा, संजय शेटे, गोरख माळी, अतुल पाटील, मंगेश पाटील, प्रदीप व्हरांबळे यांनी निवेदन दिले. निवेदनावर सचिन शिरगावकर, सुुमित चौगुले यांच्याही सह्या आहेत.लॉकडाऊननंतर गेल्या काही दिवसांत उद्योग सुरू झाले आहेत; परंतु विविध अडचणींमुळे ते पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. वाहतुकीची अडचण, कच्च्या मालाचा तुटवडा, महानगरे बंद असल्याने अडचणी येत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात उद्योजकांनी परप्रांतीय कामगारांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेतली. त्यांचा पगारही दिला आहे; परंतु शासनाने मोफत रेल्वेची सोय केल्याने परप्रांतीय मजूर गावी जात आहेत.

त्याचा फटका स्थानिक उद्योगांना बसणार आहे. त्यामुळे सुरू झालेले उद्योग बंद पडण्याची भीती आहे. त्यातून उर्वरित कामगारांनाही पगार देणे अशक्य होईल. यासाठी या मजुरांना थांबविणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरू झालेले उद्योग तरी निदान नियमितपणे सुरू राहतील.मजूर का गेले गावी...१. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग जास्त असल्याने कुटुंबीयांना वाटणारी भीती.२. लॉकडाऊन वाढला तर पोटाला काय खायचे याची चिंता.३. रेल्वेची मोफत सोय होत आहे तर गावी जाऊन येऊ ही भावना.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर