शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : राजस्थान शासनाकडून परवानगी मिळाल्यावर कामगारांना रेल्वेने पाठवणार-पालकमंत्री सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 11:07 IST

राजस्थानमधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.

ठळक मुद्देराजस्थान शासनाकडून परवानगी मिळाल्यावर कामगारांना रेल्वेने पाठवणारपालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

कोल्हापूर - राजस्थानमधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी ३४ हजार ३६२ जणांनी तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी १७ हजार ४२ अशा एकूण ५१ हजार ४०४ जणांनी आनलाईन नोंद केली आहे, असे सांगून पालकमंत्री  पाटील म्हणाले, राजस्थानमधील एकूण १७०० कामगार जिल्ह्यात आहेत.

रेल्वेच्या क्षमतेनुसार ११९७ कामगारांची यादी काल रात्री राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आली आहे. अद्याप परवानगी मिळाली नाही. ती मिळाल्यास कोल्हापुरातून रेल्वेने या कामगारांना राजस्थानकडे पाठविण्यात येईल.त्याच पद्धतीने बिहारमधील २१६५ कामगारांनीही आनलाईन अर्ज केले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्या परवानगीसाठीही बिहार शासनाला संपर्क केला जाईल.गेले दीड महिना कोल्हापूरकरांनी अत्यंत चांगला पद्धतीने सहकार्य केले आहे. तशाच पद्धतीने इथून पुढेही लाकडाऊनमध्ये सहकार्य करावे. बाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी होणार असून तसे नियोजन केले आहे. निकषानुसार ज्यांची घरात रहायची व्यवस्था नाही त्यांना संस्थात्मक अलगीकरण करणार आहोत. तशा सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत.परवानगीने जे लोक जिल्ह्यात येत आहेत, त्यांनी दक्षता बाळगणं आवश्यक आहे. थोडी जरी लक्षणं दिसली तरी ताबडतोब प्रशासनाला कळवा. किमान १५ दिवस कुणालाही भेटू नये. घरी अलगीकरणात असताना जर बाहेर फिरताना आढळल्यास त्याला सक्तीने संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.मुंबई-पुणे रेड झोनमध्ये असल्याने तेथून येणाऱ्यांच्या बाबतीत अजून निर्णय झाला नाही. जर तेथे व्यवस्था असेल तर थोडे दिवस तेथेच थांबावे, असे आवाहन करुन पालकमंत्री म्हणाले, कोणताही प्रादूर्भाव आपल्या जिल्ह्यात, गावाकडं होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेणं आवश्यक आहे.

आजपर्यंत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. प्रशासनानेही दोन पावले पुढं जावून चांगल्या पद्धतीची सहकार्याची भूमिका घेतली आहे. १७ तारखेपर्यंत अजून लाकडाऊन आहे. आतापर्यंत जसे सहकार्य दिलेत तसेच ते पुढेही ठेवा. अनावश्यक गर्दी टाळा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी शेवटी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर