शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CoronaVirus Lockdown : राजस्थान शासनाकडून परवानगी मिळाल्यावर कामगारांना रेल्वेने पाठवणार-पालकमंत्री सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 11:07 IST

राजस्थानमधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.

ठळक मुद्देराजस्थान शासनाकडून परवानगी मिळाल्यावर कामगारांना रेल्वेने पाठवणारपालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

कोल्हापूर - राजस्थानमधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी ३४ हजार ३६२ जणांनी तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी १७ हजार ४२ अशा एकूण ५१ हजार ४०४ जणांनी आनलाईन नोंद केली आहे, असे सांगून पालकमंत्री  पाटील म्हणाले, राजस्थानमधील एकूण १७०० कामगार जिल्ह्यात आहेत.

रेल्वेच्या क्षमतेनुसार ११९७ कामगारांची यादी काल रात्री राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आली आहे. अद्याप परवानगी मिळाली नाही. ती मिळाल्यास कोल्हापुरातून रेल्वेने या कामगारांना राजस्थानकडे पाठविण्यात येईल.त्याच पद्धतीने बिहारमधील २१६५ कामगारांनीही आनलाईन अर्ज केले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्या परवानगीसाठीही बिहार शासनाला संपर्क केला जाईल.गेले दीड महिना कोल्हापूरकरांनी अत्यंत चांगला पद्धतीने सहकार्य केले आहे. तशाच पद्धतीने इथून पुढेही लाकडाऊनमध्ये सहकार्य करावे. बाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी होणार असून तसे नियोजन केले आहे. निकषानुसार ज्यांची घरात रहायची व्यवस्था नाही त्यांना संस्थात्मक अलगीकरण करणार आहोत. तशा सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत.परवानगीने जे लोक जिल्ह्यात येत आहेत, त्यांनी दक्षता बाळगणं आवश्यक आहे. थोडी जरी लक्षणं दिसली तरी ताबडतोब प्रशासनाला कळवा. किमान १५ दिवस कुणालाही भेटू नये. घरी अलगीकरणात असताना जर बाहेर फिरताना आढळल्यास त्याला सक्तीने संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.मुंबई-पुणे रेड झोनमध्ये असल्याने तेथून येणाऱ्यांच्या बाबतीत अजून निर्णय झाला नाही. जर तेथे व्यवस्था असेल तर थोडे दिवस तेथेच थांबावे, असे आवाहन करुन पालकमंत्री म्हणाले, कोणताही प्रादूर्भाव आपल्या जिल्ह्यात, गावाकडं होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेणं आवश्यक आहे.

आजपर्यंत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. प्रशासनानेही दोन पावले पुढं जावून चांगल्या पद्धतीची सहकार्याची भूमिका घेतली आहे. १७ तारखेपर्यंत अजून लाकडाऊन आहे. आतापर्यंत जसे सहकार्य दिलेत तसेच ते पुढेही ठेवा. अनावश्यक गर्दी टाळा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी शेवटी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर