शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

CoronaVirus Lockdown :राजस्थान अथवा बिहारसाठी उद्या कोणतीही रेल्वे कोल्हापुरातून निघणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 11:02 IST

राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

ठळक मुद्देराजस्थान अथवा बिहारसाठी उद्या कोणतीही रेल्वे कोल्हापुरातून निघणार नाहीअफवांवर विश्वास ठेवू नये ;  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

कोल्हापूर - राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडाऊनमध्ये कोल्हापुरात अडकलेल्या इतर राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कामगार, प्रवासी यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. काही समाज माध्यमातून राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात येणार आहे, असा संदेश फिरत आहे. परंतु, राजस्थान किंवा बिहारसाठी कुठलीही रेल्वे कोल्हापुरातून शुक्रवारी सुटणार नाही.

ज्यावेळी रेल्वे प्रशासन आणि संबंधित राज्यातील प्रशासनाची संमती मिळेल त्याचवेळी कोल्हापूर किंवा इतर ठिकाणाहून कामगारांची किंवा प्रवासी यांची रेल्वेतून वाहतूक त्या-त्या जिल्ह्यात केली जाईल.कोणत्या दिवशी किती वाजता रेल्वे जाणार आहे, याविषयी जिल्हा प्रशासनामार्फत अधिकृत जाहीर केले जाईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून या जिल्ह्यातील अडकलेल्या कामगार, प्रवासी यांची माहिती त्या-त्या राज्यातील संबंधित जिल्हा प्रशासनाकडे संमतीसाठी पाठविली आहे.

दोन दिवसात ही संमती येईल. यानंतर रेल्वे, बस तसेच खासगी वाहने यामधून अडकलेल्यांना प्रवासासाठी परवानगी दिली जाईल. त्यामुळे रेल्वे, स्थानक, बस स्थानक तसेच इतर ठिकाणी विनाकारण गर्दी करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी