शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus Lockdown : पाच हजार ४४८ नागरिक अलगीकरण कक्षातून घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:24 IST

कोल्हापूर महापालिकेने स्थापन केलेल्या अलगीकरण कक्षांतून क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून तब्बल पाच हजार ४४८ नागरिक घरी गेले आहेत. दोन महिन्यांमध्ये तब्बल सहा हजार २७२ नागरिक येथे आले होते. अलगीकरण कक्षाची केंद्रेही कमी करण्यात आली आहेत. सध्या केवळ ८२४ नागरिक येथे आहेत.

ठळक मुद्देपाच हजार ४४८ नागरिक अलगीकरण कक्षातून घरीदोन महिन्यांतील चित्र : सेंटरही झाली कमी

कोल्हापूर : महापालिकेने स्थापन केलेल्या अलगीकरण कक्षांतून क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून तब्बल पाच हजार ४४८ नागरिक घरी गेले आहेत. दोन महिन्यांमध्ये तब्बल सहा हजार २७२ नागरिक येथे आले होते. अलगीकरण कक्षाची केंद्रेही कमी करण्यात आली आहेत. सध्या केवळ ८२४ नागरिक येथे आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळेच शहरामध्ये समूह संसर्ग होऊ शकलेला नाही. परराज्यांतून तसेच परजिल्ह्यांतून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येते.

२५ मार्चपासून अलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर येथील नागरिकांना घरी सोडले जाते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रेड झोन पुणे, मुंबई येथील नागरिक मोठ्या संख्येने कोल्हापुरात आले. त्यामुळे अलगीकरण कक्षांची संख्या वाढवण्यात आली.

केंद्रे सहावरून २१ पर्यंत वाढविण्यात आली होती. महापालिका, जिल्हा प्रशासन, सामाजिक संघटनांकडून त्यांना सुविधा पुरविण्यात येत आहेत. सध्या अलगीकरण कक्षात येणाऱ्यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी होत असून क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून घरी जाणाऱ्यांची संंख्या वाढत आहे. 

  • अलगीकरण कक्षात आलेले एकूण नागरिक - ६ हजार २७२
  • क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होऊन घरी गेलेले नागरिक - ५ हजार ४४८
  • सध्या असणारे नागरिक - ८२४
  • सेंटर संख्या - १४

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर