शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

CoronaVirus Lockdown : बोगस पासमुळे राधानगरीतील १८ नागरिकांना नाक्यावरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:58 IST

ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देसर्वजण ठाण्याचे रहिवाशीगाडी मालकाने काढला होता ठाणे पोलीस आयुक्तांचा ई-पास

कोल्हापूर : ठाणे पोलीस आयुक्तांचा पास घेऊन आलेल्या राधानगरी तालुक्यातील १८ नागरिकांना बोगस ई-पास असल्याचे सांगत किणी टोल नाक्यावरच रोखले.

गाडी मालकाने हा पास काढला होता. ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.मुंबई, ठाणेसह परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. गेली दोन महिने संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका हा मुंबईसह शेजारील जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे तेथील नागरिक आपल्या मूळ गावी जात असून कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात येत आहेत.

पहिल्या टप्प्यात हजारो नागरिक कोल्हापुरात आले. त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने मध्यंतरी चार-पाच दिवस प्रवेश बंद केले होते. सोमवारपासून पुन्हा प्रवेश सुरू झाल्याने नागरिकांनी ई-पास काढले होते.

राधानगरी तालुक्यातील आकनूर व अर्जुनवाडा येथील १८ जण दोन खासगी गाड्यांतून ठाण्यातून निघाले. प्रवास करणाऱ्या नागरिकांचा ई-पास संबंधित गाडी मालकाने ठाणे पोलीस आयुक्तांलयातून काढला होता. तो त्यांनी ठाण्यापासून कोल्हापूरपर्यंत चार ते पाच ठिकाणी दाखवून पुढील प्रवास केला. मात्र, मंगळवारी सकाळी किणी नाक्यावर आल्यानंतर तो पास ह्यस्कॅनह्ण करण्यात आला आणि पासच बोगस असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली.

तुम्ही परत ठाण्याला जावा, असे पोलिसांनी सांगितल्याने संबंधितांनी गाडी मालकाशी बोलून घेतले. दिवसभर हे प्रवासी किणी नाक्यावरच थांबून होते. पास मिळविण्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यात यश आले नाही.राजकीय मंडळींचे प्रयत्नपास बोगस असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी राजकीय मंडळींच्या मार्फत प्रयत्न सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ई-पासची खातरजमा केली गेली.

गाडी मालकाने पास काढला होता. वाटेत कोठेच अडवले नाही. किणी नाक्यावर आल्यानंतर बोगस असल्याचे सांगितल्याने हादरा बसला.- प्रियांका पाटील (प्रवासी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूरthaneठाणेradhanagari-acराधानगरी