शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

corona virus : सांगलीचे व्यापारी म्हणतात, १४ दिवस जिल्हा लॉकडाऊन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 16:56 IST

सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या व मृत्यू दर पाहता संपूर्ण जिल्हा १४ दिवसासाठी लॉकडाऊन करावा अशी मागणी सोमवारी व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.

ठळक मुद्देव्यापारी एकता असोसिएशनची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणीकोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाबंदी, संचारबंदीची गरज

सांगली : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या व मृत्यू दर पाहता संपूर्ण जिल्हा १४ दिवसासाठी लॉकडाऊन करावा अशी मागणी सोमवारी व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.

जनता कर्फ्यु प्रभावी ठरत नसल्याने संचारबंदी लागू करून कोरोनाची साखळी तोडावी. त्यासाठी व्यापारी संघटना प्रशासनासोबत असल्याचा निर्वाळा देण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्या नेतृत्वखालील व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. तसेच पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनाही निवेदन पाठवून दिले.

याबाबत शहा म्हणाले की, जिल्ह्यात आणि प्रामुख्याने महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्याचा मृत्युदर काळजीत टाकणारा आहे. पूणे, मुंबईसारखी स्थिती झाली आहे. वेळीच नियंत्रण न आणल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. व्यापारी, उद्योजकांनी हे बाजारपेठेत कठोर उपाययोजना करून व्यवसाय सुरू केले आहेत. पण हे उपाय अपुरे पडू लागले आहेत.

व्यापारी समाज करून व्यवसाय करीत आहे कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचा दर नियंत्रणात आणण्याची गरज आहे. कोरोनाची संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १४ दिवसाचा कडक लॉकडाऊन करावा. तसेच संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करावी. जिल्ह्यात बाहेरील व्यक्तीसाठी बंदी घालावी.

केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय लॉकडाऊन लागू करता येत नाही. त्यासंदर्भात जिल्ह्यातील स्थिती केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी. केंद्र सरकारही संवेदनशील स्थिती पाहून परवानगी नाकारणार नाही. जनता कर्फ्यु प्रभावी ठरणार नाही. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावर जिल्हाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांशी सल्लामसलत करुन लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याचे शहा म्हणाले. यावेळीअसोसिएशनचे सुरेश पटेल, सोमेश बाफना, धीरेन शहा उपस्थित होते. चौकट तज्ञांची समिती स्थापन करा : समीर शहा जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. यासाठी विविध व्यापारी संघटनांशी चर्चा करून प्रशासनाकडे लॉकडाऊनची मागणी केली आहे. लॉकडाऊननंतर बाजारपेठेतील उपाययोजनांचा आराखडाही दिला आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील तज्ञ, व्यापारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांची एक समिती स्थापन करावी, अशी मागणी केल्याचे समीर शहा यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली