शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

corona virus : गरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:22 IST

घरातून किंवा अलगीकरण केंद्रातून तुम्हाला कोविड उपचार केंद्रावर आणले जाते. सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हास्पिटलसह अन्य ठिकाणी आता ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एकदा का तिथे दाखल झाल्यानंतर मग मात्र निर्धार करायचा की, मी ठणठणीत होऊन दहा दिवसांनी बाहेर पडणार आहे. घाबरायचं नाही, प्रत्येकामध्ये एक योद्धा दडलेला असतो. त्याला जागं करायचं आणि लढाई सुरू करायची. लक्ष्य एकच फक्त आपल्याला जिंकायचंय.

ठळक मुद्देगरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायचीआवश्यक तेवढे खा, मोबाईलवर बोलत बसू नका, सकारात्मक रहा

समीर देशपांडेकोल्हापूर : घरातून किंवा अलगीकरण केंद्रातून तुम्हाला कोविड उपचार केंद्रावर आणले जाते. सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हास्पिटलसह अन्य ठिकाणी आता ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एकदा का तिथे दाखल झाल्यानंतर मग मात्र निर्धार करायचा की, मी ठणठणीत होऊन दहा दिवसांनी बाहेर पडणार आहे. घाबरायचं नाही, प्रत्येकामध्ये एक योद्धा दडलेला असतो. त्याला जागं करायचं आणि लढाई सुरू करायची. लक्ष्य एकच फक्त आपल्याला जिंकायचंय.कोरोना झाल्यामुळे लगेच प्रचंड त्रास होतो असे काहीही नाही. माझ्यासह जे २० पाझिटिव्ह रुग्ण होते, त्यातील आम्ही १५ जण दोन दिवसांतच ठणठणीत झालो. फक्त सुरुवातीला थोडा ताप, घशात खवखव आणि थोडा खोकला अशी लक्षणे असतात. तिथे एकदा औषधे सुरू केली की ही लक्षणेही नाहीशी होतात. फक्त त्यानंतर आठ दिवस तुम्ही सकारात्मक पद्धतीने राहण्याची एक सवय लावून घेण्याची गरज आहे. तेथील सुविधा, गैरसोयी याबाबतीत नकारात्मक विचार न करता हे सर्व डाक्टर्स आणि स्टाफ मला बरे करण्यासाठी राबत आहे याची जाणीव ठेवायची. बाकी सगळं बाजूला ठेवायचं आणि आपली तब्येत ठाकठीक कशी राहील याकडे लक्ष द्यायचं.प्रत्येक फोन घेण्याची गरज नाहीआपण रुग्णालयात दाखल होण्याआधीपासून नातेवाईक, गल्लीतील शेजारी, मित्रपरिवार, हितचिंतक यांच्या फोनचा मारा सुरू होतो. अशावेळी आपल्याला जेवढे अतिगरजेचे आहेत, तेवढेच फोन घ्या. सगळ्यांनीच काळजी वाटूनच फोन केलेला असतो. धीर देण्यासाठीच फोन केलेला असतो. हे समजून घेऊन प्रत्येकाचा फोन घेण्यापेक्षा केवळ अत्यावश्यक फोन घ्या. प्रत्येकाला आपण कुठे फिरत होतो आणि मला कोरोना कसा झाला कळलेच नाही हा इतिहास सांगत बसण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या घशावर ताण येतो. जो हिताचा नसतो. मी असे शेकडो फोन घेणे टाळले. नंतर त्यांची दिलगिरीही व्यक्त केली. परंतु त्याचा मला फायदा झाला.मोबाईल सायलेंट करा आणि झोपाआपण पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्यामुळे आणखी कितीजणांना लागण झाली आहे याची माहिती आपल्याला सोशल मीडियावरून लगेच समजायला लागते. अशावेळी आपण मानसिकरीत्या शांत राहण्याची गरज आहे. आपण पुन्हा निगेटिव्ह येण्यासाठी तुमची तब्येत महत्त्वाची असल्याने तुम्हाला शांतपणे झोप लागण्याची गरज आहे. म्हणून मोबाईल सायलेंट करून शांतपणे अधिकाधिक झोप घेण्याचा प्रयत्न करा.चमचमीत पदार्थ टाळाचवीत बदल म्हणून पाहुणे, घरचे घरातून डबा देतात; पण अनेकदा त्यामध्ये पथ्य पाळले जात नाही. मसालेदार अंडा करीपासून ते तेलाने थपथपलेल्या अंडा आम्लेटपर्यंतचे जेवण पाठविले जाते. परंतु ते आरोग्यासाठी फारसे हिताचे नाही हे लक्षात घ्या. प्रत्येकवेळी तुम्हाला डाक्टर तुमचा डबा बघून काय खावा, काय खाऊ नका सांगायला येणार नाहीत. तेथे तुम्हाला दिलेले जेवण हे पुरेसे असते. उकडलेली अंडी, फळे दिली जातात. ती आवर्जून खावा; पण तिथल्या जेवणातून आलेले दही अगदीच आंबट असेल, लोणचेही आंबट असेल तर सगळ्यांचा चवीपुरताच आस्वाद घ्या. आपला घसा या सगळ्याला कसा प्रतिसाद देईल याचा विचार करून आंबट, तेलकट, तिखट खाणे टाळण्याची गरज आहे.गरम पाणी प्यासर्वांकडेच गरम पाणी करण्याची किटली जरी नसली, तरी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून सकाळी, सायंकाळी एक एक ग्लास गरम पाणी मागून घ्या. अशावेळी कुणी नाही म्हणत नाही. आपल्या घशाला सोसेल अशा पद्धतीने गरम किंवा कोमट पाणी प्या.गोळ्या चुकवू नकाआपण तेथे दाखल झाल्यानंतर तेथे आपल्यावर उपचार सुरू होतात. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, रक्तदाब आहे, मधुमेह आहे अशांकडे विशेष लक्ष दिले जाते. इतरांना गोळ्या दिल्या जातात. गोळ्यांची संख्या सकाळी ५/६, सायंकाळी ५/६ असते. मात्र, गोळ्या घेणे टाळू नका. सांगितल्यानुसार जेवणाआधी आणि नंतर गोळ्या घ्या.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर