शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : गरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:22 IST

घरातून किंवा अलगीकरण केंद्रातून तुम्हाला कोविड उपचार केंद्रावर आणले जाते. सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हास्पिटलसह अन्य ठिकाणी आता ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एकदा का तिथे दाखल झाल्यानंतर मग मात्र निर्धार करायचा की, मी ठणठणीत होऊन दहा दिवसांनी बाहेर पडणार आहे. घाबरायचं नाही, प्रत्येकामध्ये एक योद्धा दडलेला असतो. त्याला जागं करायचं आणि लढाई सुरू करायची. लक्ष्य एकच फक्त आपल्याला जिंकायचंय.

ठळक मुद्देगरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायचीआवश्यक तेवढे खा, मोबाईलवर बोलत बसू नका, सकारात्मक रहा

समीर देशपांडेकोल्हापूर : घरातून किंवा अलगीकरण केंद्रातून तुम्हाला कोविड उपचार केंद्रावर आणले जाते. सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हास्पिटलसह अन्य ठिकाणी आता ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एकदा का तिथे दाखल झाल्यानंतर मग मात्र निर्धार करायचा की, मी ठणठणीत होऊन दहा दिवसांनी बाहेर पडणार आहे. घाबरायचं नाही, प्रत्येकामध्ये एक योद्धा दडलेला असतो. त्याला जागं करायचं आणि लढाई सुरू करायची. लक्ष्य एकच फक्त आपल्याला जिंकायचंय.कोरोना झाल्यामुळे लगेच प्रचंड त्रास होतो असे काहीही नाही. माझ्यासह जे २० पाझिटिव्ह रुग्ण होते, त्यातील आम्ही १५ जण दोन दिवसांतच ठणठणीत झालो. फक्त सुरुवातीला थोडा ताप, घशात खवखव आणि थोडा खोकला अशी लक्षणे असतात. तिथे एकदा औषधे सुरू केली की ही लक्षणेही नाहीशी होतात. फक्त त्यानंतर आठ दिवस तुम्ही सकारात्मक पद्धतीने राहण्याची एक सवय लावून घेण्याची गरज आहे. तेथील सुविधा, गैरसोयी याबाबतीत नकारात्मक विचार न करता हे सर्व डाक्टर्स आणि स्टाफ मला बरे करण्यासाठी राबत आहे याची जाणीव ठेवायची. बाकी सगळं बाजूला ठेवायचं आणि आपली तब्येत ठाकठीक कशी राहील याकडे लक्ष द्यायचं.प्रत्येक फोन घेण्याची गरज नाहीआपण रुग्णालयात दाखल होण्याआधीपासून नातेवाईक, गल्लीतील शेजारी, मित्रपरिवार, हितचिंतक यांच्या फोनचा मारा सुरू होतो. अशावेळी आपल्याला जेवढे अतिगरजेचे आहेत, तेवढेच फोन घ्या. सगळ्यांनीच काळजी वाटूनच फोन केलेला असतो. धीर देण्यासाठीच फोन केलेला असतो. हे समजून घेऊन प्रत्येकाचा फोन घेण्यापेक्षा केवळ अत्यावश्यक फोन घ्या. प्रत्येकाला आपण कुठे फिरत होतो आणि मला कोरोना कसा झाला कळलेच नाही हा इतिहास सांगत बसण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या घशावर ताण येतो. जो हिताचा नसतो. मी असे शेकडो फोन घेणे टाळले. नंतर त्यांची दिलगिरीही व्यक्त केली. परंतु त्याचा मला फायदा झाला.मोबाईल सायलेंट करा आणि झोपाआपण पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्यामुळे आणखी कितीजणांना लागण झाली आहे याची माहिती आपल्याला सोशल मीडियावरून लगेच समजायला लागते. अशावेळी आपण मानसिकरीत्या शांत राहण्याची गरज आहे. आपण पुन्हा निगेटिव्ह येण्यासाठी तुमची तब्येत महत्त्वाची असल्याने तुम्हाला शांतपणे झोप लागण्याची गरज आहे. म्हणून मोबाईल सायलेंट करून शांतपणे अधिकाधिक झोप घेण्याचा प्रयत्न करा.चमचमीत पदार्थ टाळाचवीत बदल म्हणून पाहुणे, घरचे घरातून डबा देतात; पण अनेकदा त्यामध्ये पथ्य पाळले जात नाही. मसालेदार अंडा करीपासून ते तेलाने थपथपलेल्या अंडा आम्लेटपर्यंतचे जेवण पाठविले जाते. परंतु ते आरोग्यासाठी फारसे हिताचे नाही हे लक्षात घ्या. प्रत्येकवेळी तुम्हाला डाक्टर तुमचा डबा बघून काय खावा, काय खाऊ नका सांगायला येणार नाहीत. तेथे तुम्हाला दिलेले जेवण हे पुरेसे असते. उकडलेली अंडी, फळे दिली जातात. ती आवर्जून खावा; पण तिथल्या जेवणातून आलेले दही अगदीच आंबट असेल, लोणचेही आंबट असेल तर सगळ्यांचा चवीपुरताच आस्वाद घ्या. आपला घसा या सगळ्याला कसा प्रतिसाद देईल याचा विचार करून आंबट, तेलकट, तिखट खाणे टाळण्याची गरज आहे.गरम पाणी प्यासर्वांकडेच गरम पाणी करण्याची किटली जरी नसली, तरी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून सकाळी, सायंकाळी एक एक ग्लास गरम पाणी मागून घ्या. अशावेळी कुणी नाही म्हणत नाही. आपल्या घशाला सोसेल अशा पद्धतीने गरम किंवा कोमट पाणी प्या.गोळ्या चुकवू नकाआपण तेथे दाखल झाल्यानंतर तेथे आपल्यावर उपचार सुरू होतात. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, रक्तदाब आहे, मधुमेह आहे अशांकडे विशेष लक्ष दिले जाते. इतरांना गोळ्या दिल्या जातात. गोळ्यांची संख्या सकाळी ५/६, सायंकाळी ५/६ असते. मात्र, गोळ्या घेणे टाळू नका. सांगितल्यानुसार जेवणाआधी आणि नंतर गोळ्या घ्या.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर