शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur- पालकमंत्र्यांचा मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:19 IST

कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना घरी थांबविणे हेच मोठे अवघड काम असून, घरी थांबलेल्या लोकांना कोणताही त्रास होणार नाही, यावर पालकमंत्री सतेज पाटील यांचा भर आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयातलोकांना काही त्रास होऊ नये यावर भर

कोल्हापूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना घरी थांबविणे हेच मोठे अवघड काम असून, घरी थांबलेल्या लोकांना कोणताही त्रास होणार नाही, यावर पालकमंत्री सतेज पाटील यांचा भर आहे. दूध, धान्य, भाजीपाला, गॅस आणि औषधे सुलभरीत्या उपलब्ध होऊ शकतात, हे जर लोकांना समजले तर ते रस्त्यांवर येणार नाहीत. त्यामुळे ते या गोष्टींसाठी पॅनिक होणार नाहीत, याची काळजी पालकमंत्र्यांनी घेतली आहे.या संकटात राज्य शासन जसे लोकांच्या मदतीला धावून येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे, तसाच अनुभव कोल्हापूर जिल्हा प्रशासनाबाबत लोकांना येत आहे आणि या प्रशासनामध्ये समन्वय ठेवून त्यांना दिशा देण्याचे काम सतेज पाटील यांच्याकडून सुरू आहे.

सकाळी अंघोळ झाली की ते जिल्हाधिकारी कार्यालयात येतात ते रात्रीच कधीतरी घरी जातात. कुणाचा मुलगा पुण्यात अडकला आहे, त्याला कोल्हापूरला आणायचा आहे, येथपासून ते शहरातील लोकांना भाजीपाला कसा उपलब्ध होईल;. ग्रामीण भागात गावसमितीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कसा होईल, यावरही ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एकाच वेळी रुग्णालयांतील व्यवस्था, रुग्णतपासणी, त्यांचे विलगीकरण यांकडेही त्यांचे तितकेच लक्ष आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी होम क्वारंटाईनमधील लोकांची यादी घेऊन त्यांतील प्रत्येक व्यक्तीशी स्वत:सह वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधायला लावला. त्यांना धीर दिला. प्रांताधिकारी, तहसिसीलदार यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्यांची यंत्रणा कामाला लावली.

या सगळ्यांचे फलित म्हणून उपचारांपासून लोकांच्या नागरी सेवासुविधांपर्यंत कुठेही गोंधळ, तक्रारी असल्याचे चित्र नाही. सारा जिल्हा एकजुटीने या संकटाला सामोरे जात आहे, असा दिलासा लोकांना मिळत आहे.मुख्यमंत्र्यांचा सातत्याने संपर्कपालकमंत्री पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दैनंदिन घडामोडींचा आढावा घेत आहेत. उपाययोजनेसह शासनाकडून केल्या जाणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर