शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

corona virus : राज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:11 IST

केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेचई-पास मागणीच्या अर्जात घट

कोल्हापूर : केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.देशात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत रविवारी केंद्र सरकारने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच जिल्ह्यात जाण्यासाठी ई- पास सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ई-पास सेवा रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी त्याबाबतचा निर्णय ज्या-त्या राज्यांनी तेथील परिस्थितीनुसार घ्यायचा आहे, त्याचे सर्वाधिकारी राज्य शासनाने असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एका मुलाखतीत ई -पासचा निर्णय महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.सध्या हे ई-पास जिल्हा प्रशासनाकडून दिले जातात. राज्य शासनाने ई-पासबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट केलेले नसल्याने अजूनही कोल्हापूरकर तसेच राज्यातील नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढावे लागणार आहेत. सध्या ई-पास मागणीच्या अर्जात घट झाली असून दिवसाला सरासरी दीड हजारांवर अर्ज येत आहेत तर प्रलंबित अर्जांची संख्या केवळ पाचशे इतकी आहे.

ई-पासबाबत राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी ई-पास सक्तीचे आहे. राज्य शासनाचे निर्देश आल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही होईल.रंजना बिचकर,ई -पास वितरण मुख्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर