शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

corona virus -प्रशासनाचे आवाहन बासनात,भाजी-धान्य खरेदीसाठी तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:08 IST

जमावबंदीचा आदेश, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अन्नधान्याचा साठा करण्याची गरज नाही, पॅनिक होऊ नका.. या सगळ्या आवाहनाला बासनात बांधून ठेवत सोमवारी कोल्हापूरकरांनी भाजी मंडई आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांना दुकानांबाहेरच रांगेत थांबवून साहित्य देण्याचा पर्याय काढला.

ठळक मुद्देप्रशासनाचे आवाहन बासनातभाजी-धान्य खरेदीसाठी तोबा गर्दी

कोल्हापूर : जमावबंदीचा आदेश, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अन्नधान्याचा साठा करण्याची गरज नाही, पॅनिक होऊ नका.. या सगळ्या आवाहनाला बासनात बांधून ठेवत सोमवारी कोल्हापूरकरांनी भाजी मंडई आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांना दुकानांबाहेरच रांगेत थांबवून साहित्य देण्याचा पर्याय काढला.महाराष्ट्रात कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रविवारी राज्यात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्ती एखाद्या ठिकाणी थांबू नये, अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, पुढील काही दिवसांत सर्वच दुकाने बंद होतील, या भीतीमुळे नागरिकांनी अन्नधान्याचा साठा करायला सुरुवात केली आहे. रविवारी सर्वत्र बंद होता सोमवारी सकाळपासूनच लक्ष्मीपुरी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होती.सोमवारी दुपारी बाराच्यादरम्यान बाजारपेठेत पाय ठेवायला जागा नव्हती. अनेक दुकानदार दुकानांचे शटर अर्धे खुले ठेवून ग्राहकांना साहित्यांची विक्री करत होते. काही दुकानदारांनी दुकानांमध्ये यायला ग्राहकांना बंदी केली होती. त्याऐवजी दुकानाबाहेर ग्राहकांच्या नावे बिल करून त्यांना बाहेर थांबायला लावले होते. नाव पुकारतील त्याप्रमाणे ग्राहकांच्या हाती साहित्य सोपवले जात होते. त्यामुळे बाजारपेठेतील सर्व रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ दिसत होती शिवाय वाहनांमुळेहीवाहतुकीची कोंडी झाली होती.याच दरम्यान महापालिकेची गाडी परिसरातून फिरत होती. ‘वाहने रस्त्याकडेला घ्या, दुकानांसमोर गर्दी करू नका, आरोग्याची काळजी घ्या’ असे आवाहन केले जात होते. व्यावसायिकहीदेखील गर्दी करू नका, आपल्या काळजीसाठीच हे सगळं सुरू आहे, असे सांगत होते. मात्र, बाजारपेठेतून ग्राहकांची गर्दी काही हटत नव्हती. अशीच गर्दी भाजी मंडईमध्ये देखील होती. भाजी विक्रेते. दुकानदार आणि ग्राहकदेखील तोंडाला मास्क बांधून दैनंदिन व्यवहार करत होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर