शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

corona virus : मृताच्या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:31 IST

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृताच्या साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात शंभर ते सव्वाशेजणांचा अपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, हा आकडा कोरोनामुळे दुप्पट झाला आहे.

ठळक मुद्देमृताच्या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांतअपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, कोरोनामुळे आकडा दुप्पट

सचिन भोसलेकोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृताच्या साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात शंभर ते सव्वाशेजणांचा अपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, हा आकडा कोरोनामुळे दुप्पट झाला आहे.हिंदू धर्मातील चालीरितीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची अंत्ययात्रा काढली जाते. ती तिरडीवरून काढली जाते. मृताचे साहित्य विक्री करणारे मोजकेच लोक शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठेत आहेत. मात्र, या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांत आली आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीमुळे संसर्ग वाढू नये. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळून दिला जातो. मृताला घरी न नेता थेट स्मशानभूमीत नेऊन दहन करण्याची सक्त सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मृताच्या साहित्य विक्रीवर व अन्य सर्वच विधीवरही परिणाम झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांत ४०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. इतर आजारांनीही तितक्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी कोरोनाविना मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी हे साहित्य नेले. मात्र, जे कोरोनामुळे मृत झाले त्यांच्यावर कोणताच विधी न करता थेट स्मशानभूमीत लाकडी सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी गुलाल नाही, तिरडी नाही की मंत्र नाही.काय लागते साहित्य..बांबूच्या काठ्या, गाडगी, सुतळी, गुलाल, खोबरेवाटी, चंदन,पाच मीटर पांढरे कापड,पान, सुपारी, हार असे साहित्य लागते. मृत पुरुष असेल तर त्याला पांढरी टोपी, धोतर, पंचा ,तर सुहासिनी महिला असेल तर तिच्याकरीता हिरवा चुडा, हिरवी साडी, कंगवा फणी, मणी मंगळसूत्र, हळदी-कुंकू (प्रत्येकी अर्धा किलो) लागते. विधवा असेल तर पांढरी साडी लागते. सरासरी हा खर्च दीड हजार रुपयांपर्यंत होत असतो. 

आमचा व्यवसाय शंभर वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. मृताच्या साहित्याला कधी मंदी येत नाही, असे लोक म्हणायचे; परंतु कोरोनामुळे ते देखील खोटे ठरविले आहे. गेल्या चार महिन्यांत या साहित्य विक्रीवरही कोरोनाने परिणाम केला आहे.- राजेंद्र निकम, मृताचे साहित्य विक्रेते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर