शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

corona virus : मृताच्या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:31 IST

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृताच्या साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात शंभर ते सव्वाशेजणांचा अपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, हा आकडा कोरोनामुळे दुप्पट झाला आहे.

ठळक मुद्देमृताच्या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांतअपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, कोरोनामुळे आकडा दुप्पट

सचिन भोसलेकोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृताच्या साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात शंभर ते सव्वाशेजणांचा अपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, हा आकडा कोरोनामुळे दुप्पट झाला आहे.हिंदू धर्मातील चालीरितीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची अंत्ययात्रा काढली जाते. ती तिरडीवरून काढली जाते. मृताचे साहित्य विक्री करणारे मोजकेच लोक शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठेत आहेत. मात्र, या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांत आली आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीमुळे संसर्ग वाढू नये. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळून दिला जातो. मृताला घरी न नेता थेट स्मशानभूमीत नेऊन दहन करण्याची सक्त सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मृताच्या साहित्य विक्रीवर व अन्य सर्वच विधीवरही परिणाम झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांत ४०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. इतर आजारांनीही तितक्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी कोरोनाविना मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी हे साहित्य नेले. मात्र, जे कोरोनामुळे मृत झाले त्यांच्यावर कोणताच विधी न करता थेट स्मशानभूमीत लाकडी सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी गुलाल नाही, तिरडी नाही की मंत्र नाही.काय लागते साहित्य..बांबूच्या काठ्या, गाडगी, सुतळी, गुलाल, खोबरेवाटी, चंदन,पाच मीटर पांढरे कापड,पान, सुपारी, हार असे साहित्य लागते. मृत पुरुष असेल तर त्याला पांढरी टोपी, धोतर, पंचा ,तर सुहासिनी महिला असेल तर तिच्याकरीता हिरवा चुडा, हिरवी साडी, कंगवा फणी, मणी मंगळसूत्र, हळदी-कुंकू (प्रत्येकी अर्धा किलो) लागते. विधवा असेल तर पांढरी साडी लागते. सरासरी हा खर्च दीड हजार रुपयांपर्यंत होत असतो. 

आमचा व्यवसाय शंभर वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. मृताच्या साहित्याला कधी मंदी येत नाही, असे लोक म्हणायचे; परंतु कोरोनामुळे ते देखील खोटे ठरविले आहे. गेल्या चार महिन्यांत या साहित्य विक्रीवरही कोरोनाने परिणाम केला आहे.- राजेंद्र निकम, मृताचे साहित्य विक्रेते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर