शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

corona virus : कोल्हापुरात १०९३ नवे रुग्ण, २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 20:43 IST

सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा भडका उडेल, या मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे कोरोनाचा खरोखरच भडका उडतोय की काय, अशी शंका कोल्हापूरकरांना येऊ लागली आहे; कारण शुक्रवारी एकाच दिवसात जिल्ह्यात १०९३ नवीन रुग्ण आढळून आले; तर २१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोल्हापुरात १०९३ नवे रुग्ण, २१ जणांचा मृत्यूकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा भडका उडेल, या मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे कोरोनाचा खरोखरच भडका उडतोय की काय, अशी शंका कोल्हापूरकरांना येऊ लागली आहे; कारण शुक्रवारी एकाच दिवसात जिल्ह्यात १०९३ नवीन रुग्ण आढळून आले; तर २१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २६ हजार ३४४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात शुक्रवारी आणखी १०९३ नवीन रुग्णांची भर पडली; तर ७१७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शुक्रवारी आणखी २१ जणांंचा मृत्यू झाला. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनात आता कोरोनाची चांगलीच धडकी भरली आहे.कागल तालुक्यात रुग्णांची तसेच मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने तसेच सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याच्या शक्यतेने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत संपूर्ण कागल तालुक्यात दि. ६ ते १५ सप्टेंबर असे सलग १० दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. या काळात कोणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या भागात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, त्या भागावर विशेष लक्ष द्या, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा जलदगतीने शोध घेऊन त्यांच्या चाचण्या व उपचार करा, अशा सक्त सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर