शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

corona virus -‘कोरोना’चा धसका : कळंबा कारागृहाच्या कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:41 IST

‘कोरोना’चा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील कारागृहातील कैद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी प्रत्यक्ष उपस्थित ठेवण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील ६२ कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली.

ठळक मुद्देदिवसभरात ६२ कैद्यांची झाली सुनावणीराज्यातील कारागृहांतील कैदी ने-आण करण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई

कोल्हापूर : ‘कोरोना’चा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील कारागृहातील कैद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी प्रत्यक्ष उपस्थित ठेवण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील ६२ कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली.

अशा पध्दतीने सुनावणी करण्यात आल्याने अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांच्या आदेशानुसार कोल्हापूरसह सांगली, सातारा व पुणे पोलिसांचे गार्ड परत पाठविण्यात आले. ही कामगिरी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी पार पाडली.‘कोरोना’च्या धास्तीमुळे राज्यातील सर्व कारागृहांतील कैद्यांची ने-आण करण्याची प्रक्रिया तूर्त थांबली आहे. दि. ३१ मार्चपर्यंत कैद्यांना थेट न्यायालयात सुनावणीसाठी हजर न ठेवता आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी उपस्थित ठेवण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. त्याबाबत राज्याचे अप्पर महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांच्याशी चर्चा करून ‘कोरोना’ची लागण कैद्यांना अगर अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.कोरोना विषाणूचा फैलाव राज्यभर वाढला असल्याने राज्यातील सर्वच कारागृहांनी त्याची धास्ती घेतली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात अगर इतर ठिकाणी न्यायालयीन कामासाठी कैद्यांना ने-आण करावी लागते. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारागृहातील कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात सुरुवात झाली.राज्यातील कारागृहात ३८ हजार कैदीराज्यातील सर्वच कारागृहांत सुमारे ३८ हजारांवर कैदी आहेत. सुनावणीसाठी कैद्यांची नेहमीच ने-आण सुरू असते. नवीन कैदी वाढत असतात. या पार्श्वभूमीवर नवीन कैद्यांची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी त्यांची मुख्य प्रवेशद्वारातच वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कारागृहात शिक्षा भोगणाºया अगर शिक्षेविरुद्ध अपिल केलेल्या कैद्यांना पोलीस बंदोबस्तात रोज न्यायालयात हजर ठेवावे लागते. त्यामुळे कैद्यांची ने-आण करताना त्यांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून व्हीसीद्वारे सुनावणी करण्यात येत आहे.कारागृहाच्या इतिहासात मोठ्या संख्येने प्रथमच व्हीसीकारागृहाच्या इतिहासात एकाच दिवशी सुमारे ६२ कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्याची ही प्रथमच घटना आहे. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील १५, सातारा जिल्ह्यातील १३, सोलापूरमधील १४ तर मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या पुणे जिल्ह्यातील २० अशा एकूण ६२ कैद्यांची सुनावणी व्हिसीद्वारे घेतली. सकाळी ११ ते २ आणि दुपारी २.३० ते ३ या वेळेत सुनावणी झाली.कळंबा कारागृहात कैदी

  • पुरुष : २,३१७
  • स्त्रिया : ८०
  • परदेशी कैदी : ३५

 

 

टॅग्स :corona virusकोरोनाjailतुरुंगkolhapurकोल्हापूर