शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

होम क्वारंटाईन रुग्णांकडील दुर्लक्षामुळेच कोरोना हाताबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 14:57 IST

होम क्वारंटाईन पॉझिटिव्ह रुग्णांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असल्याचा आरोप शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

ठळक मुद्देहोम क्वारंटाईन रुग्णांकडील दुर्लक्षामुळेच कोरोना हाताबाहेरशहर व जिल्हा नागरी कृती समितीचा आरोप

कोल्हापूर : होम क्वारंटाईन पॉझिटिव्ह रुग्णांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शहरात कोरोना संसर्ग वाढला आहे. संबंधित रुग्ण घरातून बाहेर फिरत असतात. अशांवर महापालिकेची कोणताच वचक राहिलेला नाही. परिणामी रुग्णसंख्या वाढत आहे. परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असल्याचा आरोप शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.यामध्ये म्हटले आहे की, लक्षणे काही दिसत नाहीत, अशा कोरोना रुग्णांना प्रशासनाकडून होम क्वारंटाईन होण्यास सांगितले जाते. त्यांचे संपूर्ण अलगीकरण झाल्याचे दिसत नाही. हे रुग्ण तितके डिस्टन्स पाळत नाहीत. यांच्यासाठी केलेल्या स्वयंपाकाची भांडी, त्यांचे कपडे, अंथरूण, प्रसाधनगृह यांचे विलगीकरण होत नाही. घरातील इतर लोकही त्याचा बराचसा वापर करतात. रुग्ण पाच-सहा दिवसांनंतर घरात व परिसरात वावरताना दिसतो.

यामुळे संपर्कातील लोकांनाही त्याची बाधा होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. बरीच मंडळी स्राव देऊन आल्यानंतर क्वारंटाईन न होता कुटुंबात व समाजात बिनधास्त फिरत असतात आणि नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सगळ्यांची धावपळ होऊन परिस्थिती गंभीर बनते.याबाबत प्रशासनाचे काहीच नियोजन दिसत नाही. गांभीर्याने घेतले जात नाही. याबाबत काय व कशा प्रकारे नियोजन केले हे जाहीर करावे, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, अंजुम देसाई, भाऊ घोडके, संभाजी जगदाळे यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका