शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

corona in kolhapur-हरळी खुर्दच्या सीमेवर माजी सैनिकांचा पहारा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:13 IST

देशाच्या सीमेवर अतिरेक्यांबरोबर दोन हात करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आजी-माजी सैनिकांनी आता गावकऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आहे. गावच्या ‘पांढरीत’ कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ते आपल्या वेशीवर २४ तास खडा पहारा देत आहेत. त्यामुळे ‘हरळी खुर्द’ येथील आजी-माजी सैनिकांचे गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात विशेष कौतुक होत आहे.

ठळक मुद्देहरळी खुर्दच्या सीमेवर माजी सैनिकांचा पहारा..!ना नफा..ना तोटा तत्वावर घरोघरी पोहचवताहेत भाजीपाला, किराणा माल

राम मगदूम

गडहिंग्लज- देशाच्या सीमेवर अतिरेक्यांबरोबर दोन हात करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आजी-माजी सैनिकांनी आता गावकऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आहे. गावच्या ‘पांढरीत’ कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ते आपल्या वेशीवर २४ तास खडा पहारा देत आहेत. त्यामुळे ‘हरळी खुर्द’ येथील आजी-माजी सैनिकांचे गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात विशेष कौतुक होत आहे.गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर २८२८ लोकसंख्या आणि अवघे ५५०-६०० उंबरे असणाऱ्या या गावात एकूण ९४ आजी-माजी सैनिक आहेत. गावासाठी कांही तरी करण्याची जिद्द उराशी बाळगून ते एकत्र आले आहेत. त्यासाठी त्यांनी आपली संघटना स्थापन केली आहे.१९७१ च्या भारत-पाक युद्धात इथले जवान शामराव रायाप्पा ऐवाळे हे शहीद झाले. मातंग समाजातील त्या जवानाच्या स्मरणार्थ त्यांनी वैयक्तिक वर्गणी काढून गावच्या वेशीवर ६ लाखाची स्वागत कमान उभारली आहे.‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी आठवड्यापूर्वी सरकारने लॉकडाऊनचा आदेश अचानक जारी केला. त्यावेळी त्यांनी संघटनेतर्फे आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणि मोठ्या गावातून किराणा माल खरेदी करून गावात आणला. त्यावर कोणताही नफा न मिळविता आणलेल्या किमतीत तो ग्रामस्थांना घरपोच केला.दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांनी गावबंदीचा हुकूम जारी केल्यानंतर त्यांनी उत्स्फूर्तपणे ग्रामपंचायतीच्या परवानगीने गावच्या सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी संघटनेकडे घेतली आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे, रस्त्यावर फिरणाऱ्या होम क्वॉरंटाईनना घरात बसविणे व प्रबोधनाचे कामदेखील ते मनापासून आणि आनंदाने करीत आहेत. त्यांनी सैनिकी गणवेशात आळीपाळीने गावच्या वेशीवर २४ तासांचा जागता पहारा ठेवला आहे.संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राजे, उपाध्यक्ष जयसिंग पाटील, खजिनदार संजय पाटील, सचिव शशीकांत चौगुले, सिद्राम कानडे, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, बबन चौगुले, सुरेश पाटील आदींच्या नेतृत्वाने हे काम सुरू आहे.

संकटकाळी गावासाठी उत्स्फूर्तपणे झटणाऱ्या सैनिकांमुळे ग्रामस्थांचे मनोधैर्य वाढण्यास मदत झाली आहे. त्यांच्या अनमोल कामगिरीबद्दल ग्रामस्थ सदैव कृतज्ञ राहतील.- बाळकृष्ण परीट, माजी सरपंच.

१ हजार मास्क वाटणारगावातील गरजूंना १ हजार मास्क संघटनेतर्फे मोफत वाटण्याचा निर्णय सैनिकांनी घेतला आहे. त्यासाठी कापडी मास्क शिवण्याचे काम त्यांनी गावातील महिलांना दिले आहे. त्यातून कांही महिलांना रोजगारही मिळाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर