शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-हरळी खुर्दच्या सीमेवर माजी सैनिकांचा पहारा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:13 IST

देशाच्या सीमेवर अतिरेक्यांबरोबर दोन हात करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आजी-माजी सैनिकांनी आता गावकऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आहे. गावच्या ‘पांढरीत’ कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ते आपल्या वेशीवर २४ तास खडा पहारा देत आहेत. त्यामुळे ‘हरळी खुर्द’ येथील आजी-माजी सैनिकांचे गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात विशेष कौतुक होत आहे.

ठळक मुद्देहरळी खुर्दच्या सीमेवर माजी सैनिकांचा पहारा..!ना नफा..ना तोटा तत्वावर घरोघरी पोहचवताहेत भाजीपाला, किराणा माल

राम मगदूम

गडहिंग्लज- देशाच्या सीमेवर अतिरेक्यांबरोबर दोन हात करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आजी-माजी सैनिकांनी आता गावकऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आहे. गावच्या ‘पांढरीत’ कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ते आपल्या वेशीवर २४ तास खडा पहारा देत आहेत. त्यामुळे ‘हरळी खुर्द’ येथील आजी-माजी सैनिकांचे गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात विशेष कौतुक होत आहे.गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर २८२८ लोकसंख्या आणि अवघे ५५०-६०० उंबरे असणाऱ्या या गावात एकूण ९४ आजी-माजी सैनिक आहेत. गावासाठी कांही तरी करण्याची जिद्द उराशी बाळगून ते एकत्र आले आहेत. त्यासाठी त्यांनी आपली संघटना स्थापन केली आहे.१९७१ च्या भारत-पाक युद्धात इथले जवान शामराव रायाप्पा ऐवाळे हे शहीद झाले. मातंग समाजातील त्या जवानाच्या स्मरणार्थ त्यांनी वैयक्तिक वर्गणी काढून गावच्या वेशीवर ६ लाखाची स्वागत कमान उभारली आहे.‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी आठवड्यापूर्वी सरकारने लॉकडाऊनचा आदेश अचानक जारी केला. त्यावेळी त्यांनी संघटनेतर्फे आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणि मोठ्या गावातून किराणा माल खरेदी करून गावात आणला. त्यावर कोणताही नफा न मिळविता आणलेल्या किमतीत तो ग्रामस्थांना घरपोच केला.दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांनी गावबंदीचा हुकूम जारी केल्यानंतर त्यांनी उत्स्फूर्तपणे ग्रामपंचायतीच्या परवानगीने गावच्या सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी संघटनेकडे घेतली आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे, रस्त्यावर फिरणाऱ्या होम क्वॉरंटाईनना घरात बसविणे व प्रबोधनाचे कामदेखील ते मनापासून आणि आनंदाने करीत आहेत. त्यांनी सैनिकी गणवेशात आळीपाळीने गावच्या वेशीवर २४ तासांचा जागता पहारा ठेवला आहे.संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राजे, उपाध्यक्ष जयसिंग पाटील, खजिनदार संजय पाटील, सचिव शशीकांत चौगुले, सिद्राम कानडे, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, बबन चौगुले, सुरेश पाटील आदींच्या नेतृत्वाने हे काम सुरू आहे.

संकटकाळी गावासाठी उत्स्फूर्तपणे झटणाऱ्या सैनिकांमुळे ग्रामस्थांचे मनोधैर्य वाढण्यास मदत झाली आहे. त्यांच्या अनमोल कामगिरीबद्दल ग्रामस्थ सदैव कृतज्ञ राहतील.- बाळकृष्ण परीट, माजी सरपंच.

१ हजार मास्क वाटणारगावातील गरजूंना १ हजार मास्क संघटनेतर्फे मोफत वाटण्याचा निर्णय सैनिकांनी घेतला आहे. त्यासाठी कापडी मास्क शिवण्याचे काम त्यांनी गावातील महिलांना दिले आहे. त्यातून कांही महिलांना रोजगारही मिळाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर