शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

corona in kolhapur-घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात भाज्यांचे दर चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 16:46 IST

शेतात पिकविलेला भाजीपाला गिऱ्हाईक नाही म्हणून फेकून देण्याची वेळ आली असताना किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेतमालाची टंचाई असल्याचे सांगून किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात खरेदी केलेल्या दरापेक्षा चौपट दर लावून विक्री सुरू केली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या या मनमानीमुळे आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.

ठळक मुद्देविक्रेत्यांकडून शेतमालाची टंचाई असल्याचे कारणग्राहकांची लुबाडणूक, प्रशासनाची मात्र डोळेझाक

कोल्हापूर : शेतात पिकविलेला भाजीपाला गिऱ्हाईक नाही म्हणून फेकून देण्याची वेळ आली असताना किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेतमालाची टंचाई असल्याचे सांगून किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात खरेदी केलेल्या दरापेक्षा चौपट दर लावून विक्री सुरू केली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या या मनमानीमुळे आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सौद्याला भाजीपाल्याची आवक मुबलक असल्याने घाऊक दरातही कमालीची घसरण झाली आहे. २५ रुपयांना १० किलो कोबी, १५० रुपयांना १० किलो वांगी, ६० रुपयांना १० किलो टोमॅटो असा सौद्याचा दर निघाला आहे; पण याच वेळी हेच दर किरकोळ बाजारात मात्र ६० रुपये किलो वांगी, १५ रुपये किलो टोमॅटो असे आहेत.

कोथिंबीर साडेसहा रुपये पेंढी असताना किरकोळ बाजारात एका पेंढीचा दर ३० रुपये आकारला जात आहे. गाजरही ७५ रुपयांना १० किलो असताना ४० ते ५० रुपये किलो दर लावण्यात आला आहे. मेथी साडेआठ रुपये एक पेंढी असताना बाजारात २० ते २५ रुपये आहे. यावरून किरकोळ विक्रेत्यांनी चौपटीने दर वाढवून ग्राहकांना लुबाडण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते.लॉकडाऊनमुळे मार्केट यार्डात सौद्यापर्यंत माल पोहोचविता येत नसल्याने एकीकडे शेतकरी ट्रॉलीने भाजीपाला शेतातच फेकून देत आहे. वाहनाची तजबीज करून सौद्यापर्यंत गाडी आणली तर पडलेल्या दरामुळे गाडीभाडेही निघत नाही. त्यामुळे एक तर भाजीपाला शेतातच कुजू दिला जात आहे, फुकट वाटला जात आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. गावागावांत ही विदारक परिस्थिती असताना, शहरात मात्र विक्रेत्यांकडून ग्राहकांना लुबाडले जात आहे.हे वागणं बरे नव्हेदिवसभर एका ठिकाणी बसून विक्री करण्याला वेळ व श्रम लागतात हे मान्य. त्याबदल्यात दुप्पट फायदा व्हावा ही विक्रेत्यांची अपेक्षाही रास्तच; पण दुप्पट, तिप्पट राहू दे ;चौपट दर आकारणी करणे हे नैतिकतेला धरून नाही. लॉकडाऊन असतानाही विक्रेत्यांची उपासमार नको म्हणून प्रशासनाने भाजी विक्रीचे नियोजन केले आहे; पण ज्यांच्यावर दया दाखवली तेच विक्रेते आज सर्वसामान्यांच्याच उरावर बसू लागले आहेत.

आधीच लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेल्याने जनता आर्थिक कोंडी अनुभवत आहे. त्यात त्यांचेच समाजबांधव असलेले हे विक्रेते मात्र त्यांच्याच खिशात हात घालून त्यांच्या संयमाचा अंत पाहत आहेत. अडचणीत असताना लुबाडणे ही संस्कृती नाही, त्यामुळे हातात दंडुका घेऊन ‘हे वागणे बरे नव्हे,’ असे सांगण्याची वेळ आली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर