शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात भाज्यांचे दर चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 16:46 IST

शेतात पिकविलेला भाजीपाला गिऱ्हाईक नाही म्हणून फेकून देण्याची वेळ आली असताना किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेतमालाची टंचाई असल्याचे सांगून किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात खरेदी केलेल्या दरापेक्षा चौपट दर लावून विक्री सुरू केली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या या मनमानीमुळे आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.

ठळक मुद्देविक्रेत्यांकडून शेतमालाची टंचाई असल्याचे कारणग्राहकांची लुबाडणूक, प्रशासनाची मात्र डोळेझाक

कोल्हापूर : शेतात पिकविलेला भाजीपाला गिऱ्हाईक नाही म्हणून फेकून देण्याची वेळ आली असताना किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेतमालाची टंचाई असल्याचे सांगून किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात खरेदी केलेल्या दरापेक्षा चौपट दर लावून विक्री सुरू केली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या या मनमानीमुळे आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सौद्याला भाजीपाल्याची आवक मुबलक असल्याने घाऊक दरातही कमालीची घसरण झाली आहे. २५ रुपयांना १० किलो कोबी, १५० रुपयांना १० किलो वांगी, ६० रुपयांना १० किलो टोमॅटो असा सौद्याचा दर निघाला आहे; पण याच वेळी हेच दर किरकोळ बाजारात मात्र ६० रुपये किलो वांगी, १५ रुपये किलो टोमॅटो असे आहेत.

कोथिंबीर साडेसहा रुपये पेंढी असताना किरकोळ बाजारात एका पेंढीचा दर ३० रुपये आकारला जात आहे. गाजरही ७५ रुपयांना १० किलो असताना ४० ते ५० रुपये किलो दर लावण्यात आला आहे. मेथी साडेआठ रुपये एक पेंढी असताना बाजारात २० ते २५ रुपये आहे. यावरून किरकोळ विक्रेत्यांनी चौपटीने दर वाढवून ग्राहकांना लुबाडण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते.लॉकडाऊनमुळे मार्केट यार्डात सौद्यापर्यंत माल पोहोचविता येत नसल्याने एकीकडे शेतकरी ट्रॉलीने भाजीपाला शेतातच फेकून देत आहे. वाहनाची तजबीज करून सौद्यापर्यंत गाडी आणली तर पडलेल्या दरामुळे गाडीभाडेही निघत नाही. त्यामुळे एक तर भाजीपाला शेतातच कुजू दिला जात आहे, फुकट वाटला जात आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. गावागावांत ही विदारक परिस्थिती असताना, शहरात मात्र विक्रेत्यांकडून ग्राहकांना लुबाडले जात आहे.हे वागणं बरे नव्हेदिवसभर एका ठिकाणी बसून विक्री करण्याला वेळ व श्रम लागतात हे मान्य. त्याबदल्यात दुप्पट फायदा व्हावा ही विक्रेत्यांची अपेक्षाही रास्तच; पण दुप्पट, तिप्पट राहू दे ;चौपट दर आकारणी करणे हे नैतिकतेला धरून नाही. लॉकडाऊन असतानाही विक्रेत्यांची उपासमार नको म्हणून प्रशासनाने भाजी विक्रीचे नियोजन केले आहे; पण ज्यांच्यावर दया दाखवली तेच विक्रेते आज सर्वसामान्यांच्याच उरावर बसू लागले आहेत.

आधीच लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेल्याने जनता आर्थिक कोंडी अनुभवत आहे. त्यात त्यांचेच समाजबांधव असलेले हे विक्रेते मात्र त्यांच्याच खिशात हात घालून त्यांच्या संयमाचा अंत पाहत आहेत. अडचणीत असताना लुबाडणे ही संस्कृती नाही, त्यामुळे हातात दंडुका घेऊन ‘हे वागणे बरे नव्हे,’ असे सांगण्याची वेळ आली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर