शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

corona in kolhapur-घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात भाज्यांचे दर चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 16:46 IST

शेतात पिकविलेला भाजीपाला गिऱ्हाईक नाही म्हणून फेकून देण्याची वेळ आली असताना किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेतमालाची टंचाई असल्याचे सांगून किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात खरेदी केलेल्या दरापेक्षा चौपट दर लावून विक्री सुरू केली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या या मनमानीमुळे आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.

ठळक मुद्देविक्रेत्यांकडून शेतमालाची टंचाई असल्याचे कारणग्राहकांची लुबाडणूक, प्रशासनाची मात्र डोळेझाक

कोल्हापूर : शेतात पिकविलेला भाजीपाला गिऱ्हाईक नाही म्हणून फेकून देण्याची वेळ आली असताना किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेतमालाची टंचाई असल्याचे सांगून किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात खरेदी केलेल्या दरापेक्षा चौपट दर लावून विक्री सुरू केली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या या मनमानीमुळे आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सौद्याला भाजीपाल्याची आवक मुबलक असल्याने घाऊक दरातही कमालीची घसरण झाली आहे. २५ रुपयांना १० किलो कोबी, १५० रुपयांना १० किलो वांगी, ६० रुपयांना १० किलो टोमॅटो असा सौद्याचा दर निघाला आहे; पण याच वेळी हेच दर किरकोळ बाजारात मात्र ६० रुपये किलो वांगी, १५ रुपये किलो टोमॅटो असे आहेत.

कोथिंबीर साडेसहा रुपये पेंढी असताना किरकोळ बाजारात एका पेंढीचा दर ३० रुपये आकारला जात आहे. गाजरही ७५ रुपयांना १० किलो असताना ४० ते ५० रुपये किलो दर लावण्यात आला आहे. मेथी साडेआठ रुपये एक पेंढी असताना बाजारात २० ते २५ रुपये आहे. यावरून किरकोळ विक्रेत्यांनी चौपटीने दर वाढवून ग्राहकांना लुबाडण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते.लॉकडाऊनमुळे मार्केट यार्डात सौद्यापर्यंत माल पोहोचविता येत नसल्याने एकीकडे शेतकरी ट्रॉलीने भाजीपाला शेतातच फेकून देत आहे. वाहनाची तजबीज करून सौद्यापर्यंत गाडी आणली तर पडलेल्या दरामुळे गाडीभाडेही निघत नाही. त्यामुळे एक तर भाजीपाला शेतातच कुजू दिला जात आहे, फुकट वाटला जात आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. गावागावांत ही विदारक परिस्थिती असताना, शहरात मात्र विक्रेत्यांकडून ग्राहकांना लुबाडले जात आहे.हे वागणं बरे नव्हेदिवसभर एका ठिकाणी बसून विक्री करण्याला वेळ व श्रम लागतात हे मान्य. त्याबदल्यात दुप्पट फायदा व्हावा ही विक्रेत्यांची अपेक्षाही रास्तच; पण दुप्पट, तिप्पट राहू दे ;चौपट दर आकारणी करणे हे नैतिकतेला धरून नाही. लॉकडाऊन असतानाही विक्रेत्यांची उपासमार नको म्हणून प्रशासनाने भाजी विक्रीचे नियोजन केले आहे; पण ज्यांच्यावर दया दाखवली तेच विक्रेते आज सर्वसामान्यांच्याच उरावर बसू लागले आहेत.

आधीच लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेल्याने जनता आर्थिक कोंडी अनुभवत आहे. त्यात त्यांचेच समाजबांधव असलेले हे विक्रेते मात्र त्यांच्याच खिशात हात घालून त्यांच्या संयमाचा अंत पाहत आहेत. अडचणीत असताना लुबाडणे ही संस्कृती नाही, त्यामुळे हातात दंडुका घेऊन ‘हे वागणे बरे नव्हे,’ असे सांगण्याची वेळ आली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर