शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला १३४६ लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गतवर्षी कोरोनाने सारे जग हैराण झालेले असताना या संसर्गाला वाकुल्या दाखवत कोल्हापूर शहरात १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गतवर्षी कोरोनाने सारे जग हैराण झालेले असताना या संसर्गाला वाकुल्या दाखवत कोल्हापूर शहरात १ हजार ३४६ लग्नांचा बार उडाला आहे. सन २०१९ च्या तुलनेत ही आकडेवारी कमी दिसत असली तरी ही केवळ महापालिकेकडे झालेली नोंदणी व विवाह नोंदणी कार्यालयाकडील विवाहांची आहे. परवानगी न घेता परस्पर झालेले, तसेच नोंदणी न झालेल्या विवाहांची संख्या याहून मोठी आहे.

विवाह समारंभ हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंददायी सोहळा असला तरी गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना संसर्ग सुरू झाला आणि या सोहळ्यांवर राज्य शासनाने बंदी आणली. शेकडो, हजारो नागरिकांच्या हस्ते वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकायची पद्धत असताना केवळ ५० लाेकांच्या उपस्थितीत वधू-वरांची सप्तपदी पार पाडावी लागली. त्यासाठीही आधी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक होते, मंगल कार्यालयांनादेखील या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्कॅनिंग असे नियम लावण्यात आले होते. जास्त व्यक्ती उपस्थित असलेल्या, नियमांचे पालन न केलेल्या यजमान कुटूंबावर, मंगल कार्यालयांवरही गुन्हे दाखल झाले. असे सगळे झाले असले तरी काही ठिकाणी कोरोनाचे नियम पाळत काही ठिकाणी नियमांना धाब्यावर बसवून विवाह सोहळे पार पडले.

--

वर्षभरात ४९ लग्नतिथी

हिंदू पंचांगानुसार उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि दिवाळीनंतर लग्नाचा बार उडतो. सगळ्यांना या कालावधीत सुट्ट्या असल्याने या कालावधीतील मुहूर्तांना अधिक प्राधान्य दिले जाते; मात्र उन्हाळ्याची सुरुवात झाली तोपर्यंत कोरोना संसर्ग सुरू झाल्याने अनेकांनी हा समारंभ पुढे ढकलला. गतवर्षी विवाहाचे ४९ मुहूर्त होते. याशिवाय काढीव मुहूर्तावरदेखील विवाह केले जातात.

--

२४२ जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल

कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरात नोंदणी विवाह कार्यालय आहे. येथे आधी एक महिना नोंद केल्यास वधू-वरांचे नोंदणी पद्धतीने विवाह केले जातात. २०१९ साली अशा पद्धतीने विवाह झालेल्यांची संख्या ३११ होती, तर गतवर्षी कोरोनाची लाट असताना २४२ जणांनी लग्नाच्या डामडौलात न पडता नोंदणी विवाह केले.

--

एप्रिल कठीणच

या एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९ व ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत. जानेवारी ते एप्रिल या साडेतीन महिन्यात ६०० हून अधिक विवाह झाले आहेत. पुढील मे महिन्यात सर्वाधिक १६ विवाह मुहूर्त आहेत.

--

गेल्यावर्षी आणि आतासुद्धा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कार्यालयामध्ये विवाह समारंभ झाले आहेत. ज्यांना ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करायचा नाही, त्यांनी बुकींग रद्द करून पैसे परत नेले. गेल्या वर्षभराचा काळ विवाहांवर अवलंबून असलेली मंगल कार्यालये, बँडवाले, सजावटवाले या सगळ्यांसाठीच कठीण होता. अजूनही संसर्ग वाढत असल्याने येणारा काळही परीक्षा घेणाराच असणार आहे.

नाना जरग

कृष्णसरस्वती मंगल कार्यालय

--