शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला १३४६ लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गतवर्षी कोरोनाने सारे जग हैराण झालेले असताना या संसर्गाला वाकुल्या दाखवत कोल्हापूर शहरात १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गतवर्षी कोरोनाने सारे जग हैराण झालेले असताना या संसर्गाला वाकुल्या दाखवत कोल्हापूर शहरात १ हजार ३४६ लग्नांचा बार उडाला आहे. सन २०१९ च्या तुलनेत ही आकडेवारी कमी दिसत असली तरी ही केवळ महापालिकेकडे झालेली नोंदणी व विवाह नोंदणी कार्यालयाकडील विवाहांची आहे. परवानगी न घेता परस्पर झालेले, तसेच नोंदणी न झालेल्या विवाहांची संख्या याहून मोठी आहे.

विवाह समारंभ हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंददायी सोहळा असला तरी गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना संसर्ग सुरू झाला आणि या सोहळ्यांवर राज्य शासनाने बंदी आणली. शेकडो, हजारो नागरिकांच्या हस्ते वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकायची पद्धत असताना केवळ ५० लाेकांच्या उपस्थितीत वधू-वरांची सप्तपदी पार पाडावी लागली. त्यासाठीही आधी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक होते, मंगल कार्यालयांनादेखील या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्कॅनिंग असे नियम लावण्यात आले होते. जास्त व्यक्ती उपस्थित असलेल्या, नियमांचे पालन न केलेल्या यजमान कुटूंबावर, मंगल कार्यालयांवरही गुन्हे दाखल झाले. असे सगळे झाले असले तरी काही ठिकाणी कोरोनाचे नियम पाळत काही ठिकाणी नियमांना धाब्यावर बसवून विवाह सोहळे पार पडले.

--

वर्षभरात ४९ लग्नतिथी

हिंदू पंचांगानुसार उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि दिवाळीनंतर लग्नाचा बार उडतो. सगळ्यांना या कालावधीत सुट्ट्या असल्याने या कालावधीतील मुहूर्तांना अधिक प्राधान्य दिले जाते; मात्र उन्हाळ्याची सुरुवात झाली तोपर्यंत कोरोना संसर्ग सुरू झाल्याने अनेकांनी हा समारंभ पुढे ढकलला. गतवर्षी विवाहाचे ४९ मुहूर्त होते. याशिवाय काढीव मुहूर्तावरदेखील विवाह केले जातात.

--

२४२ जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल

कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरात नोंदणी विवाह कार्यालय आहे. येथे आधी एक महिना नोंद केल्यास वधू-वरांचे नोंदणी पद्धतीने विवाह केले जातात. २०१९ साली अशा पद्धतीने विवाह झालेल्यांची संख्या ३११ होती, तर गतवर्षी कोरोनाची लाट असताना २४२ जणांनी लग्नाच्या डामडौलात न पडता नोंदणी विवाह केले.

--

एप्रिल कठीणच

या एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९ व ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत. जानेवारी ते एप्रिल या साडेतीन महिन्यात ६०० हून अधिक विवाह झाले आहेत. पुढील मे महिन्यात सर्वाधिक १६ विवाह मुहूर्त आहेत.

--

गेल्यावर्षी आणि आतासुद्धा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कार्यालयामध्ये विवाह समारंभ झाले आहेत. ज्यांना ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करायचा नाही, त्यांनी बुकींग रद्द करून पैसे परत नेले. गेल्या वर्षभराचा काळ विवाहांवर अवलंबून असलेली मंगल कार्यालये, बँडवाले, सजावटवाले या सगळ्यांसाठीच कठीण होता. अजूनही संसर्ग वाढत असल्याने येणारा काळही परीक्षा घेणाराच असणार आहे.

नाना जरग

कृष्णसरस्वती मंगल कार्यालय

--