शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

लसीकरणानंतर जिल्ह्यातील ५० जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील सात लाखांवर नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली असून, हा वेग राज्यात चांगला मानला जातो. मात्र, लस ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील सात लाखांवर नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली असून, हा वेग राज्यात चांगला मानला जातो. मात्र, लस घेतल्यानंतरही ५० नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लस घेतली म्हणजे कोरोनाविरोधात आपण विजय मिळवल्याची भावना न बाळगता काळजी घेण्याचीच गरज असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स, त्यानंतर पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी, नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अशांना लस देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार १८ एप्रिलपर्यंत ७ लाख ३४ हजार ५३२ जणांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. मात्र, ही लस घेतल्यानंतर किती जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली याची पाहणी केली असता हे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचे स्पष्ट झाले. याचा अर्थ लसीकरणाचा कोरोनाची साथ रोखण्यात फायदाच होत असल्याचे चित्र आहे.

जानेवारी २०२१ पासून १८ एप्रिलपर्यंत ७१३१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये लसीकरणानंतर ज्यांनी लस घेतली आहे, अशा शहर जिल्ह्यातील ५० जणांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला. यामध्ये कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील पाच जण असून उवरित ४५ जण हे बारा तालुक्यांतील आहेत. लसीकरण झालेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ५० जण पुन्हा पॉझिटिव्ह येणे ही अतिशय नगण्य अशी संख्या मानली जाते.

चौकट

लसीकरण करून घ्याच

जरी लसीकरणानंतर या काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरीही त्याची तीव्रता कमी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचा त्यांना फायदाच झालेला आहे. परिणामी नागरिकांनी लस घेण्यामध्ये कुचराई करू नये. पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोसही आठवणीने घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

कोट

जिल्ह्यातील ५० जणांना जरी कोरोनाची फेरलागण झाली असली तरी लसीकरण झालेल्यांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. लस घेतली म्हणजे पुन्हा संसर्ग होत नाही, असा कुणीही दावा केलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लस घेतली म्हणजे आपल्याला संचाराला स्वातंत्र्य आहे, असे समजू नये. लसीमुळे कोरोनाच्या संसर्गाची शक्यता खूपच कमी होते आणि तो झाला तरी त्यांची तीव्रताही कमी होते.

डॉ. योगेश साळे

जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर