शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर जिल्ह्यातील ५० जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील सात लाखांवर नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली असून, हा वेग राज्यात चांगला मानला जातो. मात्र, लस ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील सात लाखांवर नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली असून, हा वेग राज्यात चांगला मानला जातो. मात्र, लस घेतल्यानंतरही ५० नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लस घेतली म्हणजे कोरोनाविरोधात आपण विजय मिळवल्याची भावना न बाळगता काळजी घेण्याचीच गरज असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स, त्यानंतर पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी, नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अशांना लस देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार १८ एप्रिलपर्यंत ७ लाख ३४ हजार ५३२ जणांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. मात्र, ही लस घेतल्यानंतर किती जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली याची पाहणी केली असता हे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचे स्पष्ट झाले. याचा अर्थ लसीकरणाचा कोरोनाची साथ रोखण्यात फायदाच होत असल्याचे चित्र आहे.

जानेवारी २०२१ पासून १८ एप्रिलपर्यंत ७१३१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये लसीकरणानंतर ज्यांनी लस घेतली आहे, अशा शहर जिल्ह्यातील ५० जणांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला. यामध्ये कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील पाच जण असून उवरित ४५ जण हे बारा तालुक्यांतील आहेत. लसीकरण झालेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ५० जण पुन्हा पॉझिटिव्ह येणे ही अतिशय नगण्य अशी संख्या मानली जाते.

चौकट

लसीकरण करून घ्याच

जरी लसीकरणानंतर या काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरीही त्याची तीव्रता कमी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचा त्यांना फायदाच झालेला आहे. परिणामी नागरिकांनी लस घेण्यामध्ये कुचराई करू नये. पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोसही आठवणीने घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

कोट

जिल्ह्यातील ५० जणांना जरी कोरोनाची फेरलागण झाली असली तरी लसीकरण झालेल्यांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. लस घेतली म्हणजे पुन्हा संसर्ग होत नाही, असा कुणीही दावा केलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लस घेतली म्हणजे आपल्याला संचाराला स्वातंत्र्य आहे, असे समजू नये. लसीमुळे कोरोनाच्या संसर्गाची शक्यता खूपच कमी होते आणि तो झाला तरी त्यांची तीव्रताही कमी होते.

डॉ. योगेश साळे

जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर