शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

थंड कोल्हापूरचा पारा चढला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:57 IST

कोल्हापूर : चोहोबाजूंनी वाहणाऱ्या नद्या, जैवविविधता आणि वृक्षांची हिरवी दुलई या वैशिष्ट्यांमुळे एकेकाळी थंड असलेल्या कोल्हापूरचा पारा गेल्या दोन-तीन वर्षांत चांगलाच वाढला आहे. रस्ते रुंदीकरण आणि सिमेंटची जंगलं उभारण्यासाठी झाडांचीच समिधा दिली गेली आणि आता उन्हाच्या तीव्र झळा सोसताना यंदा ऊन किती वाढलंय यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.कोल्हापूरला लाभलेल्या निसर्गाच्या ...

कोल्हापूर : चोहोबाजूंनी वाहणाऱ्या नद्या, जैवविविधता आणि वृक्षांची हिरवी दुलई या वैशिष्ट्यांमुळे एकेकाळी थंड असलेल्या कोल्हापूरचा पारा गेल्या दोन-तीन वर्षांत चांगलाच वाढला आहे. रस्ते रुंदीकरण आणि सिमेंटची जंगलं उभारण्यासाठी झाडांचीच समिधा दिली गेली आणि आता उन्हाच्या तीव्र झळा सोसताना यंदा ऊन किती वाढलंय यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.कोल्हापूरला लाभलेल्या निसर्गाच्या वरदानामुळे या शहराला कधी तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत उन्हाळ््याच्या चार महिन्यांतही कोल्हापूरचा पारा कधी ३५ ते ३६ डिग्री सेल्सिअसवर गेला नाही. पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींच्या तोंडून ‘कोल्हापूर किती थंड आहे’, हे वाक्य हमखास ऐकायला मिळायचे. मात्र, कोल्हापूरचा रस्ते रुंदीकरणाचा प्रकल्प जणू या थंड कोल्हापूरच्या मुळावर उठला.तेव्हापासून या शहराचा पारा वर्षागणिक दोन-तीन डिग्री सेल्सिअसने वाढू लागला. यंदा या उन्हाने एप्रिल महिन्यातच ४१ ते ४२ डिग्री सेल्सिअसचा टप्पा गाठलाआहे. आताच अशी स्थिती आहे, तरमे महिन्यात कसे होणार, या विचारानेही पुन्हा पारा चढण्याची वेळ आली आहे.तापमानवाढीच्या चर्चेत ग्लोबल वॉर्मिंगचा नेहमी उल्लेख होतो. मात्र, प्रादेशिक आणि स्थानिक वातावरणाचा फार मोठा परिणाम सर्व ऋतूंवर होतो. कोल्हापूर शहरातील रस्त्यालगतची दोन हजार झाडे रस्ते रुंदीकरणात कापली गेली. त्याच्या दुप्पट वृक्ष लावून ते जगवण्यात स्थानिक प्रशासन आणि नागरिकही कमी पडले. अजूनही अनेक कारणांनी सर्रास झाडं तोडली जातात. तुलनेने उपनगरांत अजूनही झाडे असल्याने राहणाºया नागरिकांना किमान परिसरात तरी फार उकाडा जाणवत नाही.गेल्या काही वर्षांत जुन्या कोल्हापूरची वाटचाल मुंबई-पुण्यासारख्या सिमेंटच्या जंगलांच्या दिशेने सुरू झाली आहे. परिसरातील लहान-मोठ्या डोंगरांवरील झाडे गेली, परिसराचे सपाटीकरण झाले आणि उंचच उंच इमारती तयार झाल्या. याचाही फार मोठा परिणाम तापमानवाढीमध्ये झाला आहे. साडेदहा-अकरा वाजताही घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने दुपारी बारा ते दुपारी चार या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे.झाडं लावू नका, जगवाकोल्हापूरच्या या वातावरण बदलाबाबत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत म्हणाले, तापमानवाढीला स्थानिक नागरिक म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार आहोत. झाडे उन्हाची तीव्रता कमी करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत शहरात झालेल्या बेसुमार वृक्षतोडीने आणि सिमेंटच्या इमारतींमुळे ही वेळ आली आहे. उन्हाळा सुसह्य करायचा असेल, तर झाडं नुसती लावू नका तर जगवा. प्रत्येकाने किमान आपल्या दारात दोन झाडे लावून ती जगवली तरी खूप आहे.