शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच ट्रॅक्टरचे ३ कारखान्यांकडे करार, शेतकरी गपगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST

लोगो : खुशाली नव्हे खंडणी शरद यादव कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक टॅक्टर मालकांनी २ ते ३ साखर कारखान्यांकडे ...

लोगो : खुशाली नव्हे खंडणी

शरद यादव

कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक टॅक्टर मालकांनी २ ते ३ साखर कारखान्यांकडे ऊस वाहतुकीचे करार केले आहेत. त्यामुळे ऊस तोडल्यानंतर एकाच कारखान्याला आपला ऊस जाईल, असे छातीठाेकपणे शेतकरी सांगू शकत नाही. त्याचबरोबर ऊस वाहनात भरल्यानंतर शेतकऱ्यांना पोहोच देण्याची पध्दत होती. आता नव्या जमान्यात अनेक कारखान्यांनी पोहोच देणेच बंद केले आहे. यामुळे ऊस वजनात काही गफलत झाली, तर शेतकऱ्यांनी दाद कशाच्या आधारावर मागायची, या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही.

जिल्ह्यात काही ट्रॅक्टर मालकांनी साखर कारखान्यांची यंत्रणा हाताशी धरून एकाचवेळी २ ते ३ कारखान्यांकडे करार केले आहेत. जास्तीत जास्त ऊस ओढण्यासाठी आम्ही असे करत असल्याचे ते सांगत असले तरी, याच्यामागे त्यांचा हेतू शुध्द दिसत नाही. ऊस तोड सुरू झाल्यानंतर अमुक एका कारखान्याकडे तुमचा ऊस जाणार असल्याचे सांगितले जाते. ऊस वाहनात भरून रस्त्यावर आला की, संबंधित कारखान्याच्या अड्डयात जादा वाहने असल्याने आता दुसऱ्या कारखान्याकडे ऊस जाणार असल्याचे सांगितले जाते. यानंतर ट्रॅक्टर शेतातून गावात पोहोचला की, शेतकऱ्याला फोन करून त्याही कारखान्याचा अड्डा जाम असल्याचे सांगत, तिसऱ्याच कारखान्याकडे ऊस नेला जातो. या सर्व प्रकाराकडे शांतपणे पाहत राहणे एवढेच शेतकऱ्यांच्या हातात असते. कारण दाद मागायची तरी कुणाकडे, हा प्रश्न आहेच. या सर्व प्रश्नांबाबत शेतकरी संघटनाही मूग गिळून गप्प असल्याचे चित्र आहे.

.............

पोहोच देणे बंद

या सर्व प्रकारावर कडी म्हणजे, आता अनेक कारखान्याने ऊस तुटल्यानंतर दिली जाणारी पोहोच बंद केली आहे. यामुळे ट्रॅक्टर मालकांच्या या हातचलाखीत ऊस वजनात काही घोळ झाल्यास, पोहोच नसल्यामुळे शेतकरी काहीही करू शकत नाही. १८ महिने राबून ऊस पिकवायचा अन्‌ तोडल्यानंतर कुठल्या कारखान्याकडे गेला, हे शोधत फिरायचे, एवढेच शेतकऱ्याचे आता काम राहिले आहे.

..............

या लुटीला शेतकरीच जबाबदार

शेतकऱ्यांची प्रत्येक टप्प्यावर लूट सुरू असली तरी ही परिस्थिती उद्‌भवण्यास शेतकरीच जबाबदार आहे. यड्रावसारख्या गावात ग्रामसभेत ठराव करून ऊसतोडीसाठी पैसे न देण्याचे व त्याअनुषंगाने सुरू असलेले अघाेरी प्रकार खपवून न घेण्याचा ठराव केला जातो. असे ठराव करणे सर्व गावांना शक्य आहे. मात्र रान मोकळे करण्याच्या अट्टाहासामुळे शेतकऱ्यांची चौफेर गळचेपी सुरू आहे.

............

कोट....

एकाच ट्रॅक्टर मालकाचे दोन किंवा तीन कारखान्यांकडे करार झाले असतील तर हे गंभीर आहे. कारखानदारांनी आपल्याकडे कोणत्या ट्रॅक्टरचे करार झाले आहेत याबाबत आपापसात शहानिशा करणे गरजेचे आहे. ऊस तोडीसाठी आमच्या कारखाना कार्यक्षेत्रात तरी पैसे मागितले जात नाहीत. कुठल्याही शेतकऱ्याबरोबर असा प्रकार घडल्यास कारखान्याकडे तक्रार करावी.

- गणपतराव पाटील

अध्यक्ष, दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ

उद्याच्या अंकात :