शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

'मध्यान्ह भोजन योजने'मुळे 'कामगारांना' बळ, रोज ५२ हजार जणांना कामाच्या ठिकाणी मिळतयं मोफत जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 11:42 IST

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.

संतोष मिठारी

कोल्हापूर : कोरोनाच्या कालावधीत बांधकाम कामगारांची जेवणासाठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी कामगार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.याअंतर्गत रोज दुपारी आणि रात्री असे दोन्ही वेळ जिल्ह्यातील ५२ हजार ३८८ नोंदीत आणि अनोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवण मोफत पुरविण्यात येत आहे. वेळेत, सकस जेवण मिळत असल्याने कामगारांचे आरोग्य सुदृढ राहण्यास त्यांना काम करण्यातील ऊर्जावाढीला बळ मिळत आहे.

शासनाच्या कामगार मंत्रालयातर्फे मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. कोरोना काळात सर्व बांधकाम कामगारांना एका वेळच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार पुरविला जातो.जिल्ह्यात दि. २ जुलै २०२१ रोजी मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात झाली. याअंतर्गत कबनूर येथील सेंट्रल किचनमध्ये रोज जेवण तयार करून ते दुपारी बारा ते एक आणि रात्री सात ते आठ यावेळेत बांधकाम कामगारांना देण्यात येते.त्यात दुपारी २३७४४, तर रात्री २८६४४ कामगारांचा समावेश आहे. त्यामध्ये परप्रांतीय कामगारांचे प्रमाण अधिक आहे. भोजन योजनेमुळे बांधकाम कामगारांचे सध्या कोरोनाच्या काळात होणारे स्थलांतर कमी झाल्याने ही योजना उपयुक्त ठरली आहे.

असे आहे जेवण

तीन चपात्या, भाजी, भात, आमटी, लोणचे, सलाड, गुळाचा खडा असे जेवण हॉट कंटेनरमधून कामगारांना दिले जाते. दरम्यान, योजनेवर कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष लक्ष आहे. ते स्वत: कधीही अचानकपणे जेवणाचा दर्जा तपासतात, असे सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

नोंदीत बांधकाम कामगार : १ लाख ३८ हजार

रोज जेवण पुरविण्यात येणाऱ्या कामगारांची संख्या : ५२ हजार ३८८

बांधकाम क्षेत्रातील एकूण आस्थापनांची संख्या : ६३४

जिल्ह्यातील नोंदीत, अनोंदीत अशा एकूण ५२३८८ बांधकाम कामगारांना रोज दुपारी, रात्री मोफत जेवण दिले जाते. त्याचे संयोजन कामगार आयुक्त कार्यालयातर्फे केले जाते. या योजनेमुळे कामगारांचे स्थलांतर कमी झाले असून, योजना उपयुक्त ठरली आहे. -अनिल गुरव, सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर

 

बांधकाम कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना चांगली आहे. ती उपयुक्त ठरली आहे. जेवण वेळेवर मिळते. मात्र, त्याचे वितरण करण्याची व्यवस्था आणखी सक्षम होणे आवश्यक आहे. -शिवाजी मगदूम, जिल्हा सचिव, लालबावटा संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ