शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'मध्यान्ह भोजन योजने'मुळे 'कामगारांना' बळ, रोज ५२ हजार जणांना कामाच्या ठिकाणी मिळतयं मोफत जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 11:42 IST

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.

संतोष मिठारी

कोल्हापूर : कोरोनाच्या कालावधीत बांधकाम कामगारांची जेवणासाठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी कामगार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.याअंतर्गत रोज दुपारी आणि रात्री असे दोन्ही वेळ जिल्ह्यातील ५२ हजार ३८८ नोंदीत आणि अनोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवण मोफत पुरविण्यात येत आहे. वेळेत, सकस जेवण मिळत असल्याने कामगारांचे आरोग्य सुदृढ राहण्यास त्यांना काम करण्यातील ऊर्जावाढीला बळ मिळत आहे.

शासनाच्या कामगार मंत्रालयातर्फे मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. कोरोना काळात सर्व बांधकाम कामगारांना एका वेळच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार पुरविला जातो.जिल्ह्यात दि. २ जुलै २०२१ रोजी मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात झाली. याअंतर्गत कबनूर येथील सेंट्रल किचनमध्ये रोज जेवण तयार करून ते दुपारी बारा ते एक आणि रात्री सात ते आठ यावेळेत बांधकाम कामगारांना देण्यात येते.त्यात दुपारी २३७४४, तर रात्री २८६४४ कामगारांचा समावेश आहे. त्यामध्ये परप्रांतीय कामगारांचे प्रमाण अधिक आहे. भोजन योजनेमुळे बांधकाम कामगारांचे सध्या कोरोनाच्या काळात होणारे स्थलांतर कमी झाल्याने ही योजना उपयुक्त ठरली आहे.

असे आहे जेवण

तीन चपात्या, भाजी, भात, आमटी, लोणचे, सलाड, गुळाचा खडा असे जेवण हॉट कंटेनरमधून कामगारांना दिले जाते. दरम्यान, योजनेवर कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष लक्ष आहे. ते स्वत: कधीही अचानकपणे जेवणाचा दर्जा तपासतात, असे सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

नोंदीत बांधकाम कामगार : १ लाख ३८ हजार

रोज जेवण पुरविण्यात येणाऱ्या कामगारांची संख्या : ५२ हजार ३८८

बांधकाम क्षेत्रातील एकूण आस्थापनांची संख्या : ६३४

जिल्ह्यातील नोंदीत, अनोंदीत अशा एकूण ५२३८८ बांधकाम कामगारांना रोज दुपारी, रात्री मोफत जेवण दिले जाते. त्याचे संयोजन कामगार आयुक्त कार्यालयातर्फे केले जाते. या योजनेमुळे कामगारांचे स्थलांतर कमी झाले असून, योजना उपयुक्त ठरली आहे. -अनिल गुरव, सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर

 

बांधकाम कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना चांगली आहे. ती उपयुक्त ठरली आहे. जेवण वेळेवर मिळते. मात्र, त्याचे वितरण करण्याची व्यवस्था आणखी सक्षम होणे आवश्यक आहे. -शिवाजी मगदूम, जिल्हा सचिव, लालबावटा संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ