शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

'मध्यान्ह भोजन योजने'मुळे 'कामगारांना' बळ, रोज ५२ हजार जणांना कामाच्या ठिकाणी मिळतयं मोफत जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 11:42 IST

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.

संतोष मिठारी

कोल्हापूर : कोरोनाच्या कालावधीत बांधकाम कामगारांची जेवणासाठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी कामगार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.याअंतर्गत रोज दुपारी आणि रात्री असे दोन्ही वेळ जिल्ह्यातील ५२ हजार ३८८ नोंदीत आणि अनोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवण मोफत पुरविण्यात येत आहे. वेळेत, सकस जेवण मिळत असल्याने कामगारांचे आरोग्य सुदृढ राहण्यास त्यांना काम करण्यातील ऊर्जावाढीला बळ मिळत आहे.

शासनाच्या कामगार मंत्रालयातर्फे मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. कोरोना काळात सर्व बांधकाम कामगारांना एका वेळच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार पुरविला जातो.जिल्ह्यात दि. २ जुलै २०२१ रोजी मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात झाली. याअंतर्गत कबनूर येथील सेंट्रल किचनमध्ये रोज जेवण तयार करून ते दुपारी बारा ते एक आणि रात्री सात ते आठ यावेळेत बांधकाम कामगारांना देण्यात येते.त्यात दुपारी २३७४४, तर रात्री २८६४४ कामगारांचा समावेश आहे. त्यामध्ये परप्रांतीय कामगारांचे प्रमाण अधिक आहे. भोजन योजनेमुळे बांधकाम कामगारांचे सध्या कोरोनाच्या काळात होणारे स्थलांतर कमी झाल्याने ही योजना उपयुक्त ठरली आहे.

असे आहे जेवण

तीन चपात्या, भाजी, भात, आमटी, लोणचे, सलाड, गुळाचा खडा असे जेवण हॉट कंटेनरमधून कामगारांना दिले जाते. दरम्यान, योजनेवर कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष लक्ष आहे. ते स्वत: कधीही अचानकपणे जेवणाचा दर्जा तपासतात, असे सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

नोंदीत बांधकाम कामगार : १ लाख ३८ हजार

रोज जेवण पुरविण्यात येणाऱ्या कामगारांची संख्या : ५२ हजार ३८८

बांधकाम क्षेत्रातील एकूण आस्थापनांची संख्या : ६३४

जिल्ह्यातील नोंदीत, अनोंदीत अशा एकूण ५२३८८ बांधकाम कामगारांना रोज दुपारी, रात्री मोफत जेवण दिले जाते. त्याचे संयोजन कामगार आयुक्त कार्यालयातर्फे केले जाते. या योजनेमुळे कामगारांचे स्थलांतर कमी झाले असून, योजना उपयुक्त ठरली आहे. -अनिल गुरव, सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर

 

बांधकाम कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना चांगली आहे. ती उपयुक्त ठरली आहे. जेवण वेळेवर मिळते. मात्र, त्याचे वितरण करण्याची व्यवस्था आणखी सक्षम होणे आवश्यक आहे. -शिवाजी मगदूम, जिल्हा सचिव, लालबावटा संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ