शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काँग्रेसचा आत्मघात

By admin | Updated: October 21, 2014 00:20 IST

काँग्रेसला शहाणपण सुचलेले नाही

भारत चव्हाण - कोल्हापूर  --कित्येकदा शेवटच्या क्षणी होणाऱ्या दगाबाजीचा फटका बसला तरीही काँग्रेसला शहाणपण सुचलेले नाही. बदला घेण्याची जुनी पद्धत नेत्यांच्या मनात आजही नव्याने घर करून राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली. एकेकाळी काँग्रेसच्या प्रभावाखाली असलेल्या जिल्ह्यातील नेत्यांना आता ‘कुठे आहे जिल्हा माझा’ अशी म्हणायची वेळ आली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात काँग्रेस राहणार काय? असा प्रश्न निर्माण झाला असताना पी. एन. पाटलांनी काँग्रेसला सावरले; परंतु दुसऱ्या बाजूने पक्षात राहून पक्षाच्या विरोधात कृत्य करणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. महादेवराव महाडिक-सतेज पाटील, पी. एन. पाटील-प्रकाश आवाडे, आवाडे-आवळे असे एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करणारे गट सक्रिय राहिले. महाडिक-सतेज पाटील यांच्यातील वादाने तर काँग्रेसचे खूपच नुकसान झाले. त्यांच्यातील वादाने कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण अशा दोन जागा गमवाव्या लागल्या. अशीच स्थिती काहीशी ‘राधानगरी’मधून झाली. राधानगरी की भुदरगड या वादात काँग्रेसचे स्थानिक नेते पडले. त्यातूनच मग वैयक्तिक हेवे-दावे सुरू झाले. राधानगरीतील नेते, कार्यकर्ते प्रचार करणार नव्हते. त्यामुळे बजरंग देसार्इंना उमेदवारी दिल्यानंतरही त्यांना माघार घ्यावी लागली. इथे काँग्रेसच्या पराभूत मनोवृत्तीचे दर्शन झाले. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसला संधी असताना सत्यजित कदम यांना धडा शिकविण्यासाठी कार्यकर्त्यांत चढाओढ झाली. काँग्रेस काही पदाधिकारी शिवसेनेच्या प्रचारात होते. ‘दक्षिण’मधून सतेज पाटील यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनी सुपारी घेतली. इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातीलच बारा नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला मदत केली. शिरोळमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करीत राहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वचपा काढण्याच्या नादात काँग्रेसने आपल्याच पायावर दगड मारून घेतला. करवीर व हातकणंगले येथे उमेदवारांना अतिआत्मविश्वास नडला. काँग्रेसने स्वत:चा आत्मघात करून घेतला. जिल्ह्यात सक्षम नेतृत्व नसल्यानेच हे सगळे घडले. काँग्रेसनेच काँग्रेसचा पराभव केला हे नक्की !