शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पांडवरुपी जनताच महाडिकांंना उत्तर देईल; सतेज पाटील यांचा पलटवार

By राजाराम लोंढे | Updated: August 26, 2022 20:01 IST

दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार महाडीक यांनी ‘खूप सहन केले, आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’, असा इशारा आमदार सतेज पाटील यांना दिला होता.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : काहीजण महाभारत घडवणार आहेत, पण आम्ही रामायण घडवणारी मंडळी आहोत. जर महाभारत घडले तर पांडवरुपी जनताच त्यांना उत्तर देईल, असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडीक यांच्यावर शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार महाडीक यांनी ‘खूप सहन केले, आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’, असा इशारा आमदार सतेज पाटील यांना दिला होता. याबाबत विचारले असता, आमदार पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षे आपण व ज्येष्ठ नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. खरे तर, लोकसभा, विधानसभा निवडणूकीला अजून वेळ आहे. त्यावेळी टीकाटिपणी करुया. सत्ता आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी काय करणार, हे सांगणे अपेक्षित आहे. आमच्या काळात कोल्हापूर विमानतळासाठी निधी मंजूर केला, मात्र आता तो आला.

कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे, मात्र सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून ग्रामीण जनतेशी बोलले पाहिजे. त्यांना विकासाचा विश्वास दिला पाहिजे. बांधकाम परवान्यासह सुविधांबाबत समर्पक उत्तर दिले पाहिजे. यासाठी आपण ग्रामीण जनतेशी बोलूया, असे कृती समितीला यापुर्वीच सांगितल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.ज्येष्ठांनी राहुल गांधींच्या मागे रहावेगुलामनबी आझाद हे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या सारख्या तरुणांना कॉग्रेसमधील ज्येष्ठांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या मागे राहिले पाहिजे. ४०,५० वर्षे सत्तेच्या माध्यमातून पदे घेतली, आता सगळ्यांनी मिळून पक्ष बळकटीसाठी पुढे आले पाहिजे. असे आमदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकcongressकाँग्रेसBJPभाजपा