शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्टÑवादीचा ६-४ चा फॉर्म्युला ! : ‘शिरोळ’ राष्टवादीकडेच राहणार; मैत्रीसाठी ‘शाहूवाडी’त विनय कोरे यांना ‘बाय’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:45 IST

विधानसभेसाठी कॉँग्रेस व राष्टवादी कॉँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून, २८८ पैकी जवळपास २३० जागांचे वाटपही पूर्ण झाले आहे. कोल्हापुरातील दहापैकी पाच जागांवर राष्टवादीने दावा केला असला, तरी वरिष्ठ पातळीवर चार

ठळक मुद्दे विधानसभेसाठी जागा निश्चिती

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : विधानसभेसाठी कॉँग्रेस व राष्टवादी कॉँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून, २८८ पैकी जवळपास २३० जागांचे वाटपही पूर्ण झाले आहे. कोल्हापुरातील दहापैकी पाच जागांवर राष्टÑवादीने दावा केला असला, तरी वरिष्ठ पातळीवर चार जागांवरच समझोता झाला असून, दोन्ही कॉँग्रेसचा ६-४चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे कामही सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली आहे; पण लोकसभेच्या मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा केलाच, त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत विधानसभेची तयारी सुरू केली. विभागनिहाय पक्षप्रमुखांच्या बैठका घेऊन रणनीती ठरवली जात आहे. कॉँग्रेसच्या पातळीवरही अशीच तयारी सुरू असून, पहिल्या टप्प्यात दोन्ही कॉँग्रेसच्या महाआघाडीत ‘शेकाप’, ‘जनता दल’, ‘स्वाभिमानी’, ‘मनसे’ हे पक्ष सहभागी होतील, असे वाटते. त्यानुसारच जागावाटपाचा फॉर्म्युला दोन्ही कॉँग्रेसमध्ये निश्चित झाला आहे.

कॉँग्रेसच्या गुरुवारी (दि. १३) झालेल्या मुंबईतील बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी २००९ च्या विधानसभेच्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटप करावे, असा आग्रह धरला आहे. ‘कागल’, ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘चंदगड’ वगळता उर्वरित सात जागांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे. २००९ ला राज्यात राष्टÑवादी १३४, तर कॉँग्रेस १५४ जागांवर लढली होती. मतदारसंघाची झालेली पुनर्रचना आणि जागांच्या अदलाबदलीत राष्टÑवादीला कोल्हापुरातील तीनच जागा मिळाल्या होत्या. २०१४ ला दोन्ही कॉँग्रेस पक्ष स्वतंत्र लढले. राष्टÑवादीने नऊ जागा लढवीत दोन जागी यश मिळविले, तर कॉँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. लोकसभा निवडणुकीतील अनुभव पाहता, जागांसाठी फारशी ताणाताणी न करता ‘इलेक्टिव्ह मेरिट’वरच जागांचे वाटप होणार आहे. कोल्हापूर शहरातील एका मातब्बर युवा नेत्याला ‘उत्तर’मधून रिंंगणात उतरविण्याचे राष्टÑवादीचे प्रयत्न आहेत. हा उमेदवार हाताला लागला नाही, तर राष्टÑवादी चार जागांवरच लढणार हे निश्चित असून, त्यानुसार तयारी केली आहे.कॉँग्रेसची ‘करवीर’, ‘दक्षिण’, ‘उत्तर’, ‘हातकणंगले’, ‘इचलकरंजी’ या मतदारसंघांत ताकद आहे.

‘शाहूवाडी’मध्ये कर्णसिंह गायकवाड आहेत; पण स्थानिक राजकारणात ते माजी मंत्री विनय कोरे यांच्यासोबत आहेत. कोरे हे भाजपचे सहयोगी असले, तरी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची दोन्ही कॉँगे्रसशी जवळीक आहे. २०१४च्या निवडणुकीत राष्टÑवादीने जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना ‘शाहूवाडी’तून उतरविले. त्यांनी आक्रमक प्रचारयंत्रणा राबवीत चांगली मते मिळविली. त्याचा फटका बसल्याचे शल्य आजही कोरे यांचे कार्यकर्ते बोलून दाखवितात; त्यामुळे आगामी ‘गोकुळ’, ‘जिल्हा बॅँक’, बाजार समितीच्या निवडणुकांत कोरे यांची मदत आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांना होते. यासाठी दोन्ही कॉँग्रेसनी ‘शाहूवाडी’त कोरे यांना ‘बाय’ दिला तर नवल वाटायला नको....तर शिरोळमध्ये मैत्रीपूर्ण लढतमहाआघाडीतील ‘स्वाभिमानी’ पक्षाचा ‘शिरोळ’च्या जागेवर दावा राहणार आहे; पण येथून राष्टÑवादीतर्फे राजेंद्र पाटील-यड्रावकर हे इच्छुक आहेत.दोन्ही पक्षांत समझोता झाला नाही, तरएक तर येथे मैत्रीपूर्ण लढतहोईल अथवा विधानपरिषदेचाशब्द देऊन एकाला शांत केले जाऊ शकते.भास्करराव जाधव,सुरेश पाटील निरीक्षकराष्टवादीने ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘चंदगड’ मतदारसंघांसाठी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांची, तर ‘शिरोळ’साठी सुरेश पाटील (सांगली) यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.कोरेंची ‘वेट अँड वॉच’ची भूमिकामहायुतीत जनसुराज्य पक्ष आहे; पण ‘शाहूवाडी’ व ‘हातकणंगले’ची जागा शिवसेनेकडे असून, येथून विद्यमान आमदार सत्यजित पाटील-सरुडकर व सुजित मिणचेकर हे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. यामुळे विनय कोरे यांची कोंडी झाली आहे. जागावाटपाच्या ताणाताणीत युती तुटली तर मित्र पक्ष सोबत असले पाहिजेत. ‘शाहूवाडी’, ‘करवीर’ व ‘हातकणंगले’ या जागा ‘जनसुराज्य’ला देण्याची रणनीती भाजपची आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर