शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: अंबाबाई मंदिरातील भुयारी दर्शनरांग, वाहनतळप्रश्नी अंधारच; विकासकामे संथ गतीने 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 30, 2023 14:24 IST

कोल्हापूर : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अंबाबाई मंदिर परिसरात भुयारी दर्शनरांग व वाहनतळाची घोषणा केली असली तरी ते नेमके ...

कोल्हापूर : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अंबाबाई मंदिर परिसरात भुयारी दर्शनरांग व वाहनतळाची घोषणा केली असली तरी ते नेमके कोठे, कसे साकारणार याबद्दल सगळ्याच संबंधित सर्वच यंत्रणांसमोर अंधार आहे. पालकमंत्री जादूची कांडी फिरवून कसा भुयारी मार्ग काढणार याबद्दल लोकांत उत्सुकता आहे.सद्यस्थितीत मंदिर व भोवतालचा परिसर पाहिला तर भुयारी मार्गाने येथे करता येईल अशी शक्यता वाटत नाही. विद्यापीठ गेटसमोर दर्शन मंडप बांधण्याला भाविकांनी विरोध केला त्यावेळी याच जागेतून भुयारी दर्शन रांग करण्याचा विचार महापालिकेने केला होता. पण या किचकट गोष्टीत पडण्याऐवजी पार्किंगकडे निधी वळवला. आता नेमके कोणत्या ठिकाणाहून व कशा पद्धतीने भुयारी दर्शन रांग व वाहनतळ होणार आहे याची महापालिका किंवा देवस्थानच्या संबंधित कर्मचाऱ्यांनाही माहिती नाही. त्यामुळे सध्या तरी हा विषय फक्त पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांपुरताच मर्यादित आहे असे दिसते.सरस्वती टॉकीज येथील महापालिकेच्या बहुमजली पार्किंगची इमारत अपूर्ण, तेथील भक्त निवासाला अजून मंजुरी नाही, देवस्थान समितीच्या वतीने कपिलतीर्थ मार्केटसमोरील जागेत सुरू असलेले भक्तनिवासाचे काम अपूर्ण, मणिकर्णिका कुंडाचे जतन संवर्धनाचे काम गेली दोन वर्षे जैसे थे, गरुड मंडपाने लोखंडी सळ्यांवर तग धरला आहे. अंबाबाई मंदिर व परिसराशी संबंधित सर्व विकासकामे कासव गतीने नव्हे गोगलगायीपेक्षाही संथगतीने सुरू आहेत.

पालकमंत्र्यांचे कौतुकच...अंबाबाई भक्तांचा स्वच्छतागृहाचा प्रश्न सोडवण्यात गेली कित्येक वर्षे स्थानिक नेत्यांनी, पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले नाही. त्यासाठी अन्य जिल्ह्यातील नेते पालकमंत्री म्हणून यावे लागले ही खरे तर खेदाचीच बाब. शाहू छत्रपती यांच्या सहकार्यातून केसरकर यांनी भवानी मंडप परिसरातील सर्व शासकीय कार्यालये हलवून सुधारणा करत आहेत, यासाठी त्यांचे कौतुकच; पण शक्य असलेली आधीची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे.

भक्तनिवास मंजुरीच्या प्रतीक्षेतसरस्वती टॉकीज येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुमजली पार्किंगचे काम गेली चार वर्षे सोयीच्या गतीने सुरू आहे. आता त्यावर तीन मजले चढवून भक्तनिवास उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला आहे. तीन महिने झाले तरी पालकमंत्र्यांची यावर बैठक होऊन मंजुरी मिळालेली नाही.भक्तनिवासासाठी मंजुरी मिळून निधी येईपर्यंत खालच्या चार मजल्यांचेही काम पूर्ण करता येणार नाही, कारण पहिले चार मजल्यांचे काम संपवले आणि नंतर मंजुरी मिळाली तर खालच्या इमारती पुन्हा खराब होणार आहेत.

देवस्थानची इमारत जमेल तसे..देवस्थान समितीच्या वतीने कपिलतीर्थ मार्केटसमोरील जागेत पार्किंग व भक्त निवासाचे काम गेल्या चार वर्षांपासून जमेल तसे सुरू आहे. आता जरा कामाने गती घेतलेली असून, दोन स्लॅब पूर्ण झाले आहेत. हाच वेग गृहीत धरला तर इमारत तयार होऊन भाविक राहायला जायला किमान दाेन तीन वर्षे सहज लागतील. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर