शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’मध्ये केंद्रीय प्रवेशाबाबत संभ्रमावस्था ! अकरावी प्रवेश : काही संस्थांचा विरोध,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:48 IST

गतवर्षी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी या प्रक्रियेस काही संस्था चालकांचा विरोध आहे.

ठळक मुद्देपालक-विद्यार्थ्यांची मागणी कायम, प्रशासकीय हालचाली संथ

राम मगदूम ।गडहिंग्लज : गतवर्षी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी या प्रक्रियेस काही संस्था चालकांचा विरोध आहे. दहावीचा निकाल आज शुक्रवारी जाहीर होत आहे. तरी प्रशासकीय हालचालीदेखील संथगतीनेच सुरू असल्यामुळे गडहिंग्लज विभागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

परंतु, केंद्रीय प्रवेशाच्या मागणीवर विद्यार्थी व पालक ठाम आहेत. त्यामुळे याप्रश्नी शिक्षण विभाग कोणती भूमिका घेणार याकडे शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे.कोल्हापुराने राबविलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रिया गडहिंग्लज शहरातदेखील सुरू करावी अशी मागणी होती. त्यासाठी काही पक्ष-संघटनांनीदेखील आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शासनाने त्यास मान्यता दिली. त्या पाठोपाठ त्यास स्थगिती आल्याने सामाजिक संघटना पुन्हा आक्रमक झाल्यामुळे मंजुरी मिळालेली केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. त्यामुळे तालुकास्तरावर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा राज्यातील पहिला मान गडहिंग्लज तालुक्याला मिळाला. त्याचे राज्यभर कौतुक झाले.

मे मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीतही काही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी सभापती प्रा. जयश्री तेली यांच्यासह सर्व सदस्यांनी संबंधित संस्थाचालक आणि प्राचार्यांची बैठक बोलावून शासनाकडून मंजुरी मिळालेली केंद्रीय प्रवेशाची कार्यवाही सुरू करण्याची सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश कोरवी यांनी दिली होती.

दरम्यान, मे महिन्यात संबंधित संस्थाचालक आणि प्राचार्यांची स्वतंत्र बैठक झाल्याचे समजते. मात्र, अद्याप ठोस निर्णय आणि प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, कागल व भुदरगडसह सीमाभागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गडहिंग्लजला येतात. मात्र, यावर्षी अकरावी प्रवेशासंदर्भात अद्याप कांहीच हालचाली नाहीत.एकूण प्रवेशक्षमता १,५४०गडहिंग्लज शहरात अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व तुकड्यांत मिळून अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश क्षमता १,५४० इतकी आहे. गतवर्षी त्यापेक्षाही कमी अर्ज आल्यामुळे लांबलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रियादेखील सुरळीतपार पडली होती.केंद्रीय प्रवेशाची मागणी का?अकरावी विज्ञानच्या प्रवेशासाठी काही महाविद्यालयात भरमसाट देणगी आणि अवाजवी शैक्षणिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याला आळा बसावा यासाठीच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची मागणी पुढे आली. परंतु, त्याला खो घालण्याचा प्रयत्न कांहीच्याकडून सुरू आहे. त्यामुळेच प्रशासकीय हालचाली संथगतीने सुरू असल्याची चर्चा आहे. 

गतवर्षी जनतेच्या रेट्यामुळेच अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मंजूर झाली. यापुढेही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारेच पारदर्शकपणे अकरावीचे प्रवेश दिले जावे, अशी जनतेची मागणी आहे. लोकभावनेचा आदर ठेवून शिक्षण विभागाने यंदाही ही प्रक्रिया तातडीने राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

- बाळेश नाईक, अध्यक्ष- जनता दल गडहिंग्लज तालुका.

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर