शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या समावेशाने सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा कोंडमारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तुरंबे : एनएमएमएस परीक्षेत महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तुरंबे : एनएमएमएस परीक्षेत महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इयत्ता आठवीसाठी होणाऱ्या या परीक्षेत यावर्षी प्रथमच ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा समावेश केला, ही बाब बहुतांशी शाळांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे दहा टक्के आरक्षणाचा लाभ या प्रवर्गाला मिळाला. त्याचा कट ऑफ ८७ आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेला निवड होऊ शकली नाही.

८८ ते १३१ इतके अपेक्षित गुण मिळूनही गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्याने या विद्यार्थ्यांचा कोंडमारा झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा नेहमीच शिष्यवृत्ती परीक्षांच्या बाबतीत राज्यात दबदबा राखून असतो. यावर्षी झालेल्या एनएमएमएस परीक्षेत १८९४ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. यापैकी ५०० विद्यार्थी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून, तर सर्वसाधारण गटातून ४९४ विद्यार्थ्यांची निवड झाली. सर्वसाधारण गटाचा कटऑफ १३२ आहे ज्या विद्यार्थ्यांना ८८ पेक्षा जास्त १३१ पर्यंत गुण मिळाले, अशा सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले. तर ज्यांनी ईडब्ल्यूएस पर्याय निवडलेला आहे. अशा ८७ गुण असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या शिष्यवृत्तीचा लाभ झाला आहे. शाळा ऑनलाइन फॉर्म भरताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे परिपत्रक हाताळतात. मात्र, या परिपत्रकामध्ये कोठेही ईडब्ल्यूएस संदर्भातील नोंदी आढळत नाहीत.

एनएमएमएस ही परीक्षा मुळातच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी असलेने यासाठी ईडब्ल्यूएस हा ऑप्शन लागूच पडत नाही. कारण या परीक्षेस प्रविष्ट होणारा विद्यार्थी दीड लाखाच्या उत्पन्न मर्यादित बसत असल्यामुळे जनरलमधील सर्वच विद्यार्थी ईडब्ल्यूएस पात्र होतात. म्हणजेच या परीक्षेसाठी ईडब्ल्यूएस हा वेगळा संवर्ग असण्याची आवश्यकताच नाही. एनटीएस परीक्षासाठी जे परीक्षा परिषदेने नोटिफिकेशन काढलेले आहे, त्यामध्ये ईडब्ल्यूएसचा स्पष्ट उल्लेख आहे. एनएमएमएस या परीक्षेसाठी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये ईडब्ल्यूएसचा कोणताही उल्लेख नाही. मराठा समाजासाठी एसईबीसी हा ऑप्शन हा संवर्ग ठेवला. या प्रवर्गासाठी कोणत्याही प्रकारचा कोटा नसताना हा प्रवर्ग ठेवला असल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

ही शिष्यवृत्ती परीक्षा दीड लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न गटातील पालकांच्या पाल्यासाठी असताना त्यामध्ये ईडब्ल्यूएस म्हणजे ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे अशा प्रवर्गाचा समावेश केल्याने मूळच्या संकल्पनेचा संदर्भ बदलल्याचे दिसते. वर्षभर प्रचंड मेहनत करून तयारी केलेल्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या कष्टाला न्याय मिळावा व सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी सोशल मीडियातून व परीक्षा परिषदेकडे मेल द्वारे पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यातर्फे करण्यात येत आहे.