शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
9
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
10
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
11
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
12
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
13
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
14
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
15
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
16
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
17
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
18
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
19
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
20
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक

ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या समावेशाने सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा कोंडमारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तुरंबे : एनएमएमएस परीक्षेत महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तुरंबे : एनएमएमएस परीक्षेत महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इयत्ता आठवीसाठी होणाऱ्या या परीक्षेत यावर्षी प्रथमच ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा समावेश केला, ही बाब बहुतांशी शाळांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे दहा टक्के आरक्षणाचा लाभ या प्रवर्गाला मिळाला. त्याचा कट ऑफ ८७ आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेला निवड होऊ शकली नाही.

८८ ते १३१ इतके अपेक्षित गुण मिळूनही गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्याने या विद्यार्थ्यांचा कोंडमारा झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा नेहमीच शिष्यवृत्ती परीक्षांच्या बाबतीत राज्यात दबदबा राखून असतो. यावर्षी झालेल्या एनएमएमएस परीक्षेत १८९४ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. यापैकी ५०० विद्यार्थी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून, तर सर्वसाधारण गटातून ४९४ विद्यार्थ्यांची निवड झाली. सर्वसाधारण गटाचा कटऑफ १३२ आहे ज्या विद्यार्थ्यांना ८८ पेक्षा जास्त १३१ पर्यंत गुण मिळाले, अशा सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले. तर ज्यांनी ईडब्ल्यूएस पर्याय निवडलेला आहे. अशा ८७ गुण असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या शिष्यवृत्तीचा लाभ झाला आहे. शाळा ऑनलाइन फॉर्म भरताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे परिपत्रक हाताळतात. मात्र, या परिपत्रकामध्ये कोठेही ईडब्ल्यूएस संदर्भातील नोंदी आढळत नाहीत.

एनएमएमएस ही परीक्षा मुळातच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी असलेने यासाठी ईडब्ल्यूएस हा ऑप्शन लागूच पडत नाही. कारण या परीक्षेस प्रविष्ट होणारा विद्यार्थी दीड लाखाच्या उत्पन्न मर्यादित बसत असल्यामुळे जनरलमधील सर्वच विद्यार्थी ईडब्ल्यूएस पात्र होतात. म्हणजेच या परीक्षेसाठी ईडब्ल्यूएस हा वेगळा संवर्ग असण्याची आवश्यकताच नाही. एनटीएस परीक्षासाठी जे परीक्षा परिषदेने नोटिफिकेशन काढलेले आहे, त्यामध्ये ईडब्ल्यूएसचा स्पष्ट उल्लेख आहे. एनएमएमएस या परीक्षेसाठी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये ईडब्ल्यूएसचा कोणताही उल्लेख नाही. मराठा समाजासाठी एसईबीसी हा ऑप्शन हा संवर्ग ठेवला. या प्रवर्गासाठी कोणत्याही प्रकारचा कोटा नसताना हा प्रवर्ग ठेवला असल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

ही शिष्यवृत्ती परीक्षा दीड लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न गटातील पालकांच्या पाल्यासाठी असताना त्यामध्ये ईडब्ल्यूएस म्हणजे ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे अशा प्रवर्गाचा समावेश केल्याने मूळच्या संकल्पनेचा संदर्भ बदलल्याचे दिसते. वर्षभर प्रचंड मेहनत करून तयारी केलेल्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या कष्टाला न्याय मिळावा व सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी सोशल मीडियातून व परीक्षा परिषदेकडे मेल द्वारे पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यातर्फे करण्यात येत आहे.