शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Kolhapur: वन्यजिवांना द्याल शॉक...बसेल कायद्याचा 'धक्का'; सुलेगाळी येथील घटनेनंतर चंदगडमधील आठवणी झाल्या ताज्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:55 IST

वन्यजीव प्राण्यांचा अशा पद्धतीने मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असल्याने चिंता

आदित्य वेल्हाळकोल्हापूर : सुलेगाळी (ता. खानापूर) येथे दोन दिवसांपूर्वी विजेचा धक्का बसून दोन हत्तींना आपला जीव गमवावा लागला. तो धक्का कसा बसला याची चौकशी सुरू असली, तरी या घटनेने २००६ मध्ये चंदगड येथील जेलुगडे गावात चार हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. वन्यजीव प्राण्यांचा अशा पद्धतीने मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.वन्यजीवांचे असे अपघात हे ठरवूनच केले जात असल्याचा संशय वन्यजीवप्रेमींना आहे. वन्यजीवांना अशा पद्धतीने शॉक देऊन त्यांचा बळी घेणे हे कायद्याने गंभीर आहे. अशा गुन्ह्यांमध्ये संबंधिताला सात वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.चंदगडमध्ये २००५ मध्ये दोडामार्ग येथून एक गॅस पाइपलाइन बंगळुरूसाठी नेण्यात आली. या गॅस पाइपलाइनच्या आधारे जिल्ह्यात पहिल्यांदा १२ हत्ती आले. फेब्रुवारी २००६ मध्ये जेलुगडेत यातील ३ मादी व १ नरजातीचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. याची तपासणी केली असता, शेतातून जाणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीला आकडा लावून ती तार पानथळ जमिनीत सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. याचाच शॉक लागून चार हत्तींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संशयित शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हत्ती शेतीचे नुकसान करतात, म्हणून शेतकरीच शेताभोवती तारेचे कुंपन करून त्या विद्युत प्रवाह सोडतात. यामुळे वन्यजिवांना जिवाला मुकावे लागत असल्याचे चित्र आहे. मुळात अशा तारांमध्ये किती प्रमाणात विद्युत प्रवाह सोडावा याचे मापदंड नाही. त्यामुळे वन्यजिवांबरोबर माणसांनाही अशा युक्त्या मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या आहेत.

हत्ती हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कायद्यानुसार अनुसूची १ मधील प्राणी आहे. अनुसूची १ मधील प्राण्यांना कायद्यान्वये सर्वोच्च संरक्षण दिले आहे. या कायद्यान्वये अनुसूची एक ते अनुसूची चारपर्यंत असलेल्या कोणत्याही प्राण्यांची शिकार केली किंवा प्रयत्न केला किंवा इजा पोहोचविली, तर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व सुधारित अधिनियम २०२२ अन्वये पंचवीस हजार ते एक लाख रुपये दंड किंवा तीन वर्ष ते सात वर्ष सश्रम करावासाची शिक्षा किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे. - विलास काळे, सहायक वनसंरक्षक, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Electrocution of wildlife brings legal consequences, past incidents resurface.

Web Summary : Electrocution incidents involving elephants in Kolhapur raise concerns about wildlife safety. Past cases highlight the illegal use of electric fences, endangering animals and humans. Violators face severe penalties under wildlife protection laws.