शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वन्यजिवांना द्याल शॉक...बसेल कायद्याचा 'धक्का'; सुलेगाळी येथील घटनेनंतर चंदगडमधील आठवणी झाल्या ताज्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:55 IST

वन्यजीव प्राण्यांचा अशा पद्धतीने मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असल्याने चिंता

आदित्य वेल्हाळकोल्हापूर : सुलेगाळी (ता. खानापूर) येथे दोन दिवसांपूर्वी विजेचा धक्का बसून दोन हत्तींना आपला जीव गमवावा लागला. तो धक्का कसा बसला याची चौकशी सुरू असली, तरी या घटनेने २००६ मध्ये चंदगड येथील जेलुगडे गावात चार हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. वन्यजीव प्राण्यांचा अशा पद्धतीने मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.वन्यजीवांचे असे अपघात हे ठरवूनच केले जात असल्याचा संशय वन्यजीवप्रेमींना आहे. वन्यजीवांना अशा पद्धतीने शॉक देऊन त्यांचा बळी घेणे हे कायद्याने गंभीर आहे. अशा गुन्ह्यांमध्ये संबंधिताला सात वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.चंदगडमध्ये २००५ मध्ये दोडामार्ग येथून एक गॅस पाइपलाइन बंगळुरूसाठी नेण्यात आली. या गॅस पाइपलाइनच्या आधारे जिल्ह्यात पहिल्यांदा १२ हत्ती आले. फेब्रुवारी २००६ मध्ये जेलुगडेत यातील ३ मादी व १ नरजातीचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. याची तपासणी केली असता, शेतातून जाणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीला आकडा लावून ती तार पानथळ जमिनीत सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. याचाच शॉक लागून चार हत्तींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संशयित शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हत्ती शेतीचे नुकसान करतात, म्हणून शेतकरीच शेताभोवती तारेचे कुंपन करून त्या विद्युत प्रवाह सोडतात. यामुळे वन्यजिवांना जिवाला मुकावे लागत असल्याचे चित्र आहे. मुळात अशा तारांमध्ये किती प्रमाणात विद्युत प्रवाह सोडावा याचे मापदंड नाही. त्यामुळे वन्यजिवांबरोबर माणसांनाही अशा युक्त्या मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या आहेत.

हत्ती हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कायद्यानुसार अनुसूची १ मधील प्राणी आहे. अनुसूची १ मधील प्राण्यांना कायद्यान्वये सर्वोच्च संरक्षण दिले आहे. या कायद्यान्वये अनुसूची एक ते अनुसूची चारपर्यंत असलेल्या कोणत्याही प्राण्यांची शिकार केली किंवा प्रयत्न केला किंवा इजा पोहोचविली, तर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व सुधारित अधिनियम २०२२ अन्वये पंचवीस हजार ते एक लाख रुपये दंड किंवा तीन वर्ष ते सात वर्ष सश्रम करावासाची शिक्षा किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे. - विलास काळे, सहायक वनसंरक्षक, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Electrocution of wildlife brings legal consequences, past incidents resurface.

Web Summary : Electrocution incidents involving elephants in Kolhapur raise concerns about wildlife safety. Past cases highlight the illegal use of electric fences, endangering animals and humans. Violators face severe penalties under wildlife protection laws.