शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

संकुचित वृत्तीमुळे देशाची एकात्मता धोक्यात : न्या. हेमंत गोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 16:05 IST

जाती धर्माच्या नावावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात संकुचितपणा वाढत चालला आहे. देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक बाब आहे, अशी चिंता निवृत्त न्यायमुर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसंकुचित वृत्तीमुळे देशाची एकात्मता धोक्यात : न्या. हेमंत गोखले शिवाजी विद्यापीठात हमीद दलवाई चर्चासत्राचा समारोप

कोल्हापूर: जाती धर्माच्या नावावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात संकुचितपणा वाढत चालला आहे. देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक बाब आहे, अशी चिंता निवृत्त न्यायमुर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याकामध्ये भीतीचे वातावरण असून जगण्यापेक्षा मोठे होत चालेल्या धर्माच्या प्रश्नांचा देशाच्या प्रगतीवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठा गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या हमीद दलवाई साहित्य व समाजकार्य या विषयावरील चर्चासत्राचा समारोप शनिवारी गोखले यांच्या मार्गदर्शनाने झाला. साहित्यीक सदानंद मोरे, राजन गवस, विनोद शिरसाठ, विनय हर्डीकर, रणधीर शिंदे प्रमुख उपस्थित होते.समारोपाच्या पहिल्या सत्रात दलवाईच्या लेखनाचे अनुवाद व नव्या पिढीचे मनोगत यावर चर्चासत्र झाले. गौरी पटवर्धन व दिपाली अवकाळे यांनी दलवाईच्या साहित्याचे अनुवाद करताना येणारे अनुभव कथन केले. नव्या पिढीचे मनोगत समीर शेख, हिना कौसरखान, अझरुद्दीन पटेल यांनी मांडले. दलवाई आजच्या पिढीने अभ्यासावा, अंगीकारावा असे व्यक्तीमत्व असल्याच्या भावना त्यांनी मांडल्या.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य सुनिलकुमार लवटे यांनी दलवार्इंचे साहित्य सर्व भाषामध्ये प्रकाशित होण्याची गरज मांडली. दलवार्इंचा विचार मुस्लिम म्हणून न करता मानवतावादी भारतीय असे करणे हीच त्यांच्या कार्याला पोहचपावती ठरेल असे सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर