शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या कामांचे मूल्यांकन पूर्ण

By admin | Updated: November 11, 2016 01:07 IST

कामाची रक्कम निश्चित : ३४0 कोटी खर्च झाल्याचा सुप्रीम कंपनीचा दावा, प्रस्ताव बांधकाम विभागाकडे

सतीश पाटील -- शिरोली --कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या सुप्रीम कंपनीने केलेल्या कामाची किंमत ठरविण्यासाठी कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाम विभागात ४ ते ५ नोव्हेंबरला रस्त्याचे मूल्यमापन करणाऱ्या समितीची बैठक झाली. या बैठकीत रस्त्याच्या कामाची रक्कम ठरली असून, तो प्रस्ताव शासनाकडे बांधकाम विभागाने पाठविला आहे. कामाच्या किमतीबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. दरम्यान, सुप्रीम कंपनीचे ३४० कोटी खर्च झाल्याचा दावा केला आहे.कोल्हापूर-सांगली या ५२ किलोमीटर रस्त्याचे टेंडर २०११साली निघाले होते. हे काम मुंबईमधील सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया कंपनीने १९९५ कोटी रुपयांना घेतले. २०१२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. कंपनीने हे काम २०१४ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. या ५२ किलोमीटर रस्त्यासाठी चौदा गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार होत्या. या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष ठेवायचे होते. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्षाला मोबदलाही ठरलेला होता, पण हे काम पूर्ण करण्यासाठी सुप्रीम कंपनी, शासकीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कधीच तत्परता दाखवली नाही. सुप्रीम कंपनीला फायनान्सची अडचण, तर शासकीय अधिकारी आणि प्रशासनाने या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनी व भूसंपादन करून द्यायचे होते, पण अद्यापही बऱ्याच ठिकाणचे भूसंपादन झालेले नाही, तर गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचा दर्जा तपासला नाही की या रस्त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. गेल्या चार वर्षांत रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासकीय पातळीवर बऱ्याच बैठका झाल्या, आश्वासने झाली. कंपनीला दिवसाला दीड लाख रुपये दंड आकारण्यात आला, पण कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. अखेर एप्रिल २०१६ मध्ये सुप्रीम कंपनीला शासनाने काळ्या यादीत टाकले. काळ्या यादीत टाकल्यावर सुप्रीम कंपनीने ९५टक्के काम पूर्ण केले आहे, असे सांगितले आणि १ मे रोजी टोलवसुली सुरू करण्याचे ठरविले, पण याला लोकांनी विरोध केला. अखेर मे महिन्यात सुप्रीम कंपनीने जुलैपर्यंत काम पूर्ण करून रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याचे ठरले. याला आर्थिक साहाय्य शासनाने द्यायचे ठरले होते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची जबाबदारी घ्यायची असे ठरले होते, पण अर्थसाहाय्य मिळाले नाही आणि रस्ताही पूर्ण झाला नाही. अखेर झालेल्या कामाचे मूल्यमापन करून सुप्रीम कंपनीला पैसे देण्याचे ठरले. यासाठी एक समिती नेमली. या समितीने संपूर्ण कामाचे मूल्यमापन करून कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ४ ते ६ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवस समितीची बैठक झाली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष सोलापूर बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी राजेश पाटील, कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, अर्थसाहाय्य करणारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा समावेश होता. त्यांनी या कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या कामाबाबताचा अहवाल तयार करून पाठविला आहे. या रस्त्याच्या कामाच्या मूल्यमापनाबाबत गोपनीयता ठेवली आहे, तर, सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असता ५२ किलोमीटर रस्त्यासाठी ३४० कोटी रुपये खर्च आला आहे, असे सांगितले.कोल्हापूर-सांगली रस्त्याचे मूल्यमापन झाले आहे. सुप्रीम कंपनीला कामाचे पैसे मिळतील. कंपनी पैसे घेऊन जाईल, पण अपुरे रस्ते पूर्ण कोण करणार, का असेच राहणार, हा प्रश्न आहे. गेली चार वर्षे हा रस्ता अपुरा आहे. रस्ता पूर्ण होण्यास अजून किती वर्षे लागणार.