शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

पंचगंगा नदीच्या पूररेषेचे सर्व्हेक्षण पूर्ण, डिमार्केशन तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 11:58 IST

कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची सरासरी, तसेच महत्तम पूररेषेचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले असून, आता फक्त त्याचे डिमार्केशन तपासण्यात येणार असल्याची माहिती येथील जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी बुधवारी दिली. पूररेषेचा शास्त्रीय अहवाल १५ दिवसांत पाठविला जाईल, असे या सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देपूररेषेचे सर्व्हेक्षण पूर्ण, डिमार्केशन तपासणारशास्त्रीय अहवाल १५ दिवसांत पाठविणार

कोल्हापूर : शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची सरासरी, तसेच महत्तम पूररेषेचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले असून, आता फक्त त्याचे डिमार्केशन तपासण्यात येणार असल्याची माहिती येथील जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी बुधवारी दिली. पूररेषेचा शास्त्रीय अहवाल १५ दिवसांत पाठविला जाईल, असे या सूत्रांनी सांगितले.पंचगंगा नदीची पूररेषा निश्चित करण्याच्या अनुषंगाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पूररेषेचा शास्त्रीय अहवाल देण्याचे आदेश झाले आहेत; त्यामुळे तब्बल १३ वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणातील पूररेषा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार २००५ साली झालेल्या सर्वेक्षणानुसार डिमार्केशन तपासून अहवाल देण्यात येणार आहे.पंचगंगा नदीला महापूर आल्यामुळे १९८९, २००५ साली कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले होते; त्यामुळे पाटबंधारे विभागाने २००५ सालच्या महापुराची महत्तम रेषा आणि सरासरी पूररेषा निश्चित केली होती. तसा अहवाल राज्य सरकारलाही देण्यात आला होता; परंतु या पूररेषेतील प्रतिबंधित क्षेत्रात काही अटींवर बांधकाम करण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली होती; त्यामुळे पूररेषेत अनेक बांधकामे झाली आहेत.ज्यावेळी बांधकामांना प्रतिबंध करायची आवश्यकता होती, त्यावेळी महापालिका आणि राज्य सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि आता बांधकामे झाल्यावर अचानक पूररेषेची आठवण झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सरकारच्या या पूररेषेच्या शास्त्रीय अहवाल तयार करण्यास सांगून मूळ सर्वेक्षणात बदल करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी शंका काही पर्यावरणवादी कार्यकर्ते व्यक्तकरीत आहेत.

 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर