शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 10:12 IST

Uday Samant Kolhapur-राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाची सुरुवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना दिल्या.

ठळक मुद्देशिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी होणार मंत्रालयातील बैठकीत निर्णय : मंत्रालय आपल्या दारी मोहिम कोल्हापुरातून

कोल्हापूर : राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाची सुरुवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना दिल्या.या बैठकीत पहिल्या सत्रात महाविद्यालयीन व विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी यांचे प्रश्न व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरिता वेळ राखीव ठेवून प्रश्न निकाली काढले जातील. त्यादृष्टीने शिवाजी विद्यापीठात नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आमदार प्रकाश आबिटकर यांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी राज्यातील उच्चशिक्षण विभागाच्या कोल्हापूर येथील विभागीय सहसंचालक कार्यालयातील गैरकारभाराच्या कामकाजाचा आढावा घेतला होता.

त्यांच्या मागणीनुसार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी बैठक झाली. यावेळी आबिटकर यांनी प्रशासकीय कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या व सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्या कार्यालय प्रमुख यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली.मंत्री सामंत म्हणाले, राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ३ महिन्यांचा कालबध्द कार्यक्रम तयार करा. यानुसार मंत्रालय आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येईल. त्याची सुरवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करून, जे अधिकारी व कर्मचारी यामध्ये दोषी आढळतील अशा दोषी अधिकारी व कर्मचारी यांना जागेवर निलंबित करण्यात येईल.यावेळी विभागीय सह. संचालक डॉ. अशोक उबाळे, प्रिआयएएस सेंटर कोल्हापूरच्या संचालिका सोनाली रोडे, शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी विशांत भोसले, प्रा. शशिकांत कांबळे उपस्थित होते. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर