शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘कडकनाथ’ प्रकरणातील कंपनीचे कर्मचारीही पसार ; ‘कडकनाथ’च्या जाळ्यात कोल्हापूरचे हजारावर शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:50 IST

या कडकनाथ कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती आहे. सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची ५00 कोटींपेक्षा अधिक रक्कम या कडकनाथच्या गोरख धंद्यात अडकली आहे. बघता बघता मुदाळ तिटा, शेळेवाडी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी कार्यालये सुरू करून जाळे विणले. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक शेतकरी या कंपनीशी संलग्न आहेत.

ठळक मुद्देतक्रार दाखल करा : राजू शेट्टींचे आवाहनतरी व्यवसाय वाढत गेला तसे नियंत्रण राखता आले नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

इस्लामपूर : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कडकनाथ कोंबडी पालनातून इस्लामपूर शहरासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील दहा हजारांवर सभासद शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आता धूम ठोकली आहे. ‘लोकमत’ने याचा पर्दाफाश केल्यानंतर सर्वजण खडबडून जागे झाले आहेत. या व्यवसायात ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा शेतकºयांनी पोलिसांत तक्रार करावी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीशी राहील, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

या कडकनाथ कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती आहे. सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची ५00 कोटींपेक्षाअधिक रक्कम या कडकनाथच्या गोरख धंद्यात अडकली आहे. गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने या बोगस कंपनीच्या संचालकांनी पुणे येथे मुक्काम ठोकला आहे. आता अटकपूर्व जामीन घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या कंपनीने १00 रुपयांच्या मुद्रांकावर अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. ‘आमची कंपनी प्रामुख्याने रेशीम, मत्स्य,

कुक्कुटपालन व शेळी पालनाचा व्यवसाय करीत आहे. आमच्या कंपनीच्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करून देणे तसेच व्यवसायातून उत्पादित होणारा माल खरेदी करणे याबरोबरच शेतकºयांना विश्वास देऊन खरेदीची हमी देते. आमची कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करीत नाही किंवा शेतकºयांना आर्थिक गुंतवणूक देत नाही’, असे नमूद करुन शेतकºयांची फसवणूक केली आहे. या मुद्रांकावर केवळ बोगस स्वाक्षºया आहेत, परंतु त्यावर नावाचा उल्लेख नाही.

‘लोकमत’ने या फसवणुकीचा पर्दाफाश केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असून आणखी बºयाच जणांची फसवणूक झाल्याचे आता समोर येऊ लागले आहे. यामुळेच खासदार राजू शेट्टी यांनी संंबंंधित कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार करावी, म्हणजे आम्हाला रितसर कारवाईसाठी प्रयत्न करता येतील, असे आवाहन केले आहे.

आरोग्यदृष्ट्या फायदेशीरचा दावा

कडकनाथ कोंबडीची जात मध्य प्रदेशातील झांबुआ या आदिवासी पट्ट्यातील आहे. ही कोंबडी काळी, तिचे रक्त काळे, मांस काळे आणि होणारा रस्साही काळा असल्यामुळे या कोंबडीचे अनेकांना आकर्षण वाटते. वैद्यकीयदृष्ट्या या कोंबडीची प्रजाती मानवी शरीरासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. कंपन्यांनी त्याबाबतची जाहिरातबाजीही केली होती. कोंबडी आरोग्यदृष्ट्या फायदेशीर असल्याची बाब या व्यवसायासही फायदेशीर ठरली. कंपन्या असा दावा करीत असल्या तरी, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी याबाबत कोणताही अधिकृत दावा केलेला नाही. सांगली, इस्लामपूर येथील काही डॉक्टरांना याविषयी विचारले असता त्यांनी, कडकनाथ कोंबडीच्या आरोग्यविषयक दाव्याबाबत काहीही सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले.कोल्हापूर : ‘एका’ अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी पोबारा केल्याने कोल्हापुरातील ‘कडकनाथ’ पक्षी पालक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या व्यवसायात केली आहे. इतर व्यवसायापेक्षा जास्त नफा यामध्ये मिळत असल्याने शेतकऱ्यांनी उड्या घेतल्या; पण गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीकडून प्रतिसादच मिळत नसल्याने शेतकºयांची घालमेल वाढली होती. अलीकडे कमी कष्टात जास्त नफा देणा-या कंपन्या रोज उदयास येत आहेत. त्यातील एक म्हणजे ‘एक’ अ‍ॅग्रो कंपनी होती.

सुरुवातीच्या टप्प्यात मत्स्य व शेळीपालनमध्ये कंपनीने काम सुरू केले. नंतर ‘कडकनाथ’ कोंबडी पालनात उतरली. ‘कडकनाथ’च्या मांसाला परदेशात मोठी मागणी असल्याने कंपनीने मूळ व्यवसाय बाजूला ठेवून यामध्ये लक्ष केंद्रित केले. तीन महिन्यांत लाखोंचा नफा मिळणार असल्याने शेतकऱ्यांनीही उड्या घेतल्या. बघता बघता मुदाळ तिटा, शेळेवाडी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी कार्यालये सुरू करून जाळे विणले. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक शेतकरी या कंपनीशी संलग्न आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. ते पाहून इतर शेतकºयांनीही या व्यवसायात उड्या घेतल्या. शेतकºयांची संख्या वाढत गेली; पण कंपनीला नियंत्रण ठेवता आले नाही. दोन महिन्यांपासून पक्षांना खाद्य पुरवठा करता येईना, पक्षांचा उठाव होत नव्हता, तेव्हापासून शेतकºयांच्या तक्रारी सुरू झाल्या. पक्षांची संख्या वाढल्याने खाद्यपुरवठा होत नाही; त्यामुळे शेतकºयांनी खाद्य बाहेरून खरेदी करावे, त्यांना बिले दिली जातील, असे कंपनीने सांगितले. काही शेतकºयांना थोडे दिवस बिले दिलीही, पण नंतर बहुतांशी शेतकरी अडकले. कंपन्यांच्या अधोगतीला संचालकांची उधळपट्टी कारणीभूत असली, तरी व्यवसाय वाढत गेला तसे नियंत्रण राखता आले नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

अंंडे ६० रुपये...‘ही’ कंपनी शेतकऱ्यांकडून ५० ते ६० रुपये दराने अंडी घेत होती. त्याची उबवण करून पुन्हा पक्षी तयार केले जायचे; पण बाजारात या अंड्याचा दर १0 ते १५ रुपये होता; त्यामुळेही कंपनीला फटका बसल्याचे जाणकारांचे मत आहे.मांस विक्रीचे मार्केटही चुकलेकडकनाथ कोंबड्याच्या मांसाला परदेशातही मागणी आहे. ही कंपनी तिथेपर्यंत पोहोचलीच नाही. उत्पादनाच्या प्रमाणात पुढे मालाचा उठाव झाला नाही, हेही कंपनी आतबट्ट्यात येण्याचे कारण आहे.‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात ‘कडकनाथ’चा ५00 कोटींचा गंडा’ हे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली. कडकनाथ पक्षी पालक दिवसभर संबंधित कंपनीच्या संपर्कात होते. तुम्हाला पैसे दिले जातील, तुम्ही कोठेही तक्रार करू नका, असे कंपनीच्या वतीने शेतकºयांना सांगण्यात आले.

 

या कंपनीत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कर्ज काढून गुंतवणूक केली आहे. या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत. या कंपनीतील एकाही संचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न करू नये.- विक्रम पाटील, पक्षप्रतोद, विकास आघाडी.

 

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूर