शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

गांभीर्यच नाही : बंदी कागदावर ‘संचार’ गावभर--भाजी, औषधे खरेदीचा बहाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 23:32 IST

‘फिरल्यानं काय होतंय’ ही मानसिकता त्यांना अडचणीत आणू शकते. पोलिसांनी अशा नागरिकांना फटकारले आणि घरी जाण्याचा सल्ला दिला. सकाळी फिरायला गेलेल्या, तसेच सायकलिंग करणा-या नागरिकांना त्यांची नावे, काय करतात, कोठे राहता हे विचारून त्यांचे उपहासात्मक व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याचा एक नवा फंडा पोलिसांनी स्वीकारला आहे.

ठळक मुद्देविनाकारण फिरणाऱ्यांचीही संख्या वाढलेली आहे. त्यांना मात्र मज्जाव करण्याची आवश्यकता आहे.

कोल्हापूर : राज्य सरकारची संचारबंदी, केंद्र सरकारचा लॉकडाऊन असूनही काही बेजबाबदार नागरिक भाजी, औषधे, दूध आणण्याच्या बहाण्याने रस्त्यावर मुक्त संचार करीत असल्याचे मंगळवारी दिसून आले. शहराच्या बहुतेक सर्वच रस्त्यांवर असे चित्र होते. त्यात दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांचाही मोठ्या प्रमाणात वावर होता. पोलिसांनीही घरात बसण्याची सक्ती थोडी शिथिल केल्याचा हा परिणाम होता.

राज्य सरकारने संचारबंदीची मुदत बुधवार (दि. २५)पासून १४ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत ज्या प्रकारे शहरवासीयांनी जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले, तसेच येथून पुढेही करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आवश्यक कारणासाठीच घराबाहेर पडायचे आहे. विनाकारण शहरात फेरफटका मारणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस कारवाई करणार आहेत.कोल्हापुरात सध्यातरी कोरोना संसर्गाबाबत मोठे चिंतेचे कारण नसले तरी ३० मार्चपासून समूह संसर्गाची प्रकरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आणखी १४ दिवस स्वत:ला बंदिस्त करून घेणे आवश्यक आहे. तरीही मंगळवारचे चित्र वेगळेच होते.

शहरात भाजी विक्रीची, तसेच औषध खरेदीची सोय असल्याचा गैरफायदा घेत अनेक नागरिक रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. सकाळी फिरायला, सायकलिंग करायला जाणारे सुशिक्षित नागरिकही स्वत:च्या जिवाशी खेळताना दिसून आले. ‘फिरल्यानं काय होतंय’ ही मानसिकता त्यांना अडचणीत आणू शकते. पोलिसांनी अशा नागरिकांना फटकारले आणि घरी जाण्याचा सल्ला दिला.सकाळी फिरायला गेलेल्या, तसेच सायकलिंग करणा-या नागरिकांना त्यांची नावे, काय करतात, कोठे राहता हे विचारून त्यांचे उपहासात्मक व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याचा एक नवा फंडा पोलिसांनी स्वीकारला आहे. काही पोलीस बेजबाबदार वाहनधारकांना हात जोडून विनंती करीत आहेत, तर काही पोलीस वाहने अडवून ती जप्त करीत आहेत.

जवळपास ८० टक्के शहर लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय, महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा कर्मचारी, काही स्वयंसेवक रस्त्यांवर फिरताना दिसतात. विनाकारण फिरणाऱ्यांचीही संख्या वाढलेली आहे. त्यांना मात्र मज्जाव करण्याची आवश्यकता आहे.

‘संचारबंदी’चा भंग केल्यास अशी शिक्षा१‘कोरोना विषाणू’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीचा भंग करणाऱ्यांना आता विविध कलमान्वये वेगवेगळ्या शिक्षेस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता विनाकारण बाहेर पडणाऱ्यांनो विचार करा. अन्यथा पुढील वर्षभर न्यायालयाचे खेटे व शिक्षेला सामोरे जावे लागेल.

२संचारबंदीच्या काळात विनाकारण शहरातून फेरफटका मारणाºयांना प्रथम पोलिसांनी विनंती करून फिरू नये, असे सांगितले. तरीसुद्धा अनेकजण रस्त्यावरून फिरत आहेत. यानंतर शारीरिक शिक्षा म्हणून ऊठा-बशा काढण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतरही ही मंडळी ऐकण्याचे नाव घेईनात. त्यानंतर पोलिसांनी थेट वाहनेच जप्त करण्यास व गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. तरीसुद्धा ऐकण्याचे नाव घेईनात.

३आता थेट पोलिसांनी अशा उनाड फिरणाºयांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भा.द.वि. २७१,२९०, ५०५(२) तसेच कलम ५१ ब ५२, ५४, ३७(३),कलम २, ३, ४ अशा विविध दखलपात्र व अदखलपात्र कलमाखाली १ महिन्यांपासून ते ३ वर्षापर्यंत शिक्षा व दंड होवू शकतो. तसेच कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० नियम ११- रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक वाहने फिरणाºयांवर गुन्हे व वाहने जप्त व ती ताब्यात घेण्याचे अधिकार दिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस