शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

समिती नेमली... वाद धुमसताच

By admin | Updated: May 19, 2015 00:48 IST

अस्वस्थ गांधीनगर : तात्पुरती मलमपट्टी; नवीन जागेचा निर्णय होईपर्यंत पुतळा त्याच जागेवर राहणार; बाजारपेठ सुरु

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील शिरु चौकात बसवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासंबंधी सामंजस्याने निर्णय घेण्यासाठी करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती नियुक्त केली असून, ती लवकरच तोडगा काढेल. तोपर्यंत बंद मागे घेऊन सिंधी समाजाने सोमवारी दुपारपासूनच दुकाने सुरू करावीत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून बंद असलेली गांधीनगर बाजारपेठ सुरू झाली.या प्रश्नाबाबत त्यांनी दलित व सिंधी समाजातील प्रमुख नेत्यांशी या वादाबाबत चर्चा केली. त्यास आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, महेश जाधव, भगवान काटे, रिपब्लिकन पक्षाचे शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सिंधी समाजाचे भजनलाल डेंबडा, भगतराम छाबरा, रमेश तनवाणी, माजी सरपंच पूनम परमानंदानी, रितू लालवाणी, सरपंच सौ. लक्ष्मी उदासी, सिंधू सभेचे मनोज बचवाणी, सुरेश आहुजा, आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘सिंधी समाजाचा आंबेडकरांच्या पुतळ््यास विरोध नाही परंतु जिथे तो बसविला आहे, ती जागा बाजाराची आहे. त्यामुळे भविष्यात विटंबनेसारखे प्रकार झाल्यास त्यातून गांधीनगरचे स्वास्थ बिघडेल, अशी भीती या समाजाला वाटते. जिथे पुतळा बसविला आहे, ती जागा सरकारची आहे. सार्वजनिक ठिकाणीच पुतळा बसविला आहे, त्यामुळे विटंबना होईल, असे सांगून पुतळ््यास विरोध का, असे दलित समाजाचे म्हणणे आहे. या दोन्ही समाजाचे म्हणणे तात्त्विकदृष्ट्या योग्यच आहे, परंतु तरीही या प्रश्नांतून दोन्ही समाजाशी बोलून तोडगा काढण्याची गरज आहे. हा तोडगा दोन्ही समाजाला सन्मानजनकच असेल, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली आहे.पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटावा म्हणून समिती नियुक्त केली आहे. त्यातून सन्मानजनक तोडगा निघावा, अशी अपेक्षा आहे.- भजनलाल डेंबडा, अध्यक्ष, सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगरव्यापाऱ्यांनी अगोदर बंद मागे घ्यावा, ही आमची मागणी होती. ती मान्य झाली आहे. समिती चर्चेतून योग्य तोडगा काढील, असा विश्वास वाटतो.- प्रा. शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष, आठवले गटेलवकरच निर्णयपुतळ्याच्या जागेबाबत ही समिती लवकरच निर्णय घेईल असे सांगून पालकमंत्र्यांनी या सवंदेनशील प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठीच समिती नेमल्याचे स्पष्ट केले.