शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
4
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले सिवानचे जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
5
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
6
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
7
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
8
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
9
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
10
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
11
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
12
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
13
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
14
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
15
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
16
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
17
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
18
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
19
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
20
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...

समिती नेमली... वाद धुमसताच

By admin | Updated: May 19, 2015 00:48 IST

अस्वस्थ गांधीनगर : तात्पुरती मलमपट्टी; नवीन जागेचा निर्णय होईपर्यंत पुतळा त्याच जागेवर राहणार; बाजारपेठ सुरु

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील शिरु चौकात बसवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासंबंधी सामंजस्याने निर्णय घेण्यासाठी करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती नियुक्त केली असून, ती लवकरच तोडगा काढेल. तोपर्यंत बंद मागे घेऊन सिंधी समाजाने सोमवारी दुपारपासूनच दुकाने सुरू करावीत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून बंद असलेली गांधीनगर बाजारपेठ सुरू झाली.या प्रश्नाबाबत त्यांनी दलित व सिंधी समाजातील प्रमुख नेत्यांशी या वादाबाबत चर्चा केली. त्यास आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, महेश जाधव, भगवान काटे, रिपब्लिकन पक्षाचे शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सिंधी समाजाचे भजनलाल डेंबडा, भगतराम छाबरा, रमेश तनवाणी, माजी सरपंच पूनम परमानंदानी, रितू लालवाणी, सरपंच सौ. लक्ष्मी उदासी, सिंधू सभेचे मनोज बचवाणी, सुरेश आहुजा, आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘सिंधी समाजाचा आंबेडकरांच्या पुतळ््यास विरोध नाही परंतु जिथे तो बसविला आहे, ती जागा बाजाराची आहे. त्यामुळे भविष्यात विटंबनेसारखे प्रकार झाल्यास त्यातून गांधीनगरचे स्वास्थ बिघडेल, अशी भीती या समाजाला वाटते. जिथे पुतळा बसविला आहे, ती जागा सरकारची आहे. सार्वजनिक ठिकाणीच पुतळा बसविला आहे, त्यामुळे विटंबना होईल, असे सांगून पुतळ््यास विरोध का, असे दलित समाजाचे म्हणणे आहे. या दोन्ही समाजाचे म्हणणे तात्त्विकदृष्ट्या योग्यच आहे, परंतु तरीही या प्रश्नांतून दोन्ही समाजाशी बोलून तोडगा काढण्याची गरज आहे. हा तोडगा दोन्ही समाजाला सन्मानजनकच असेल, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली आहे.पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटावा म्हणून समिती नियुक्त केली आहे. त्यातून सन्मानजनक तोडगा निघावा, अशी अपेक्षा आहे.- भजनलाल डेंबडा, अध्यक्ष, सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगरव्यापाऱ्यांनी अगोदर बंद मागे घ्यावा, ही आमची मागणी होती. ती मान्य झाली आहे. समिती चर्चेतून योग्य तोडगा काढील, असा विश्वास वाटतो.- प्रा. शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष, आठवले गटेलवकरच निर्णयपुतळ्याच्या जागेबाबत ही समिती लवकरच निर्णय घेईल असे सांगून पालकमंत्र्यांनी या सवंदेनशील प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठीच समिती नेमल्याचे स्पष्ट केले.