शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

'एफआरपी'तून शेतकऱ्यांची थकित वीजबिले वसूल करा, साखर कारखान्यांची होणार कोंडी

By विश्वास पाटील | Updated: August 20, 2022 11:34 IST

ऊसबिलातून एक रुपया काढून घ्यायचा झाला तरी शेतकरी अंगावर येतात.

विश्वास पाटीलकोल्हापूर : साखर कारखान्यांकडून ऊसबिलापोटी दिल्या जाणाऱ्या एफआरपीतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिलांची वसुली केली जावी, असा आग्रह महावितरणकडून सुरू झाला आहे. ही वसुली न केल्यास कारखान्यांकडून कमी दराने वीज खरेदी करण्याची भीती दाखवण्यात येत आहे. कृषी पंपाची वीजबिल वसुली ही महावितरणची जबाबदारी असताना त्यातून अंग काढून त्यासाठी साखर कारखानदारीस वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. एफआरपीतून अशा प्रकारची वसुली करणे, हे कायद्यानेही बेकायदेशीर आहे. त्यामुळे या फतव्याविरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत. कोल्हापुरात १४, सांगली जिल्ह्यात ८ कारखान्यांचे सहवीज प्रकल्प आहेत. राज्यातील ही संख्या १२४ आहे.शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी चार चांगले पैसे देता यावेत, यासाठी कारखाने कर्ज काढून सहवीज प्रकल्पाची उभारणी करतात. बगॅसपासून तयार झालेली वीज कारखाने स्वतःसाठी वापरतात व शिल्लक वीज महावितरणला पुरवतात. कारखान्यांपुढे त्याशिवाय अन्य दुसरा पर्याय कोणताच नाही. कारखान्यांकडून वीज खरेदी करण्याचा महावितरणशी करार व्हावा लागतो तरच ही वीज खरेदी केली जाते. यापूर्वी तेरा वर्षांपूर्वी झालेल्या करारांची मुदत आता संपली आहे.

त्यावेळी युनिटला ६ रुपये ५७ पैसे दर मिळत होता. आता हाच दर ४ रुपये ७५ पैशांवर आला आहे. साधारणपणे कारखान्यांना वीज निर्मितीसाठी खर्चाएवढा दर येणाऱ्या महावितरणकडून मिळतो. कारखाना व महावितरण यांच्यातील करारास महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाची संमती लागते. त्यामुळे नव्या करारामध्ये वीज बिलांची वसुली करण्याची जबाबदारी कारखान्यांवर सोपवल्याने कारखान्यांची चांगलीच कोंडी होणार आहे.ऊसबिलातून एक रुपया काढून घ्यायचा झाला तरी शेतकरी अंगावर येतात. वीज बिलाची वसुली करून दिली नाही तर सध्या दिल्या जाणाऱ्या वीज खरेदी युनिटचा दर ५० पैशांनी कमी करण्याची तरतूद नव्या करारामध्ये आहे. त्यामुळे हे वीज खरेदीचे करार करण्यास अजून कोण पुढे यायला तयार नाही. आतापर्यंत १३ कारखान्यांनीच असे करार केल्याचे साखर संघातील सूत्रांनी सांगितले. कारखान्यांना करार हे करावेच लागतील कारण त्याशिवाय वीज पुरवठा करताच येणार नाही.

दृष्टिक्षेपात सहवीज प्रकल्प

  • देशातील एकूण कारखान्यांकडील सहवीज प्रकल्प - ३६०
  • ७५६२ - मेगावॅट वीज त्यातून निर्माण होते
  • रु. ४,७५ सरासरी प्रतियुनिट वीज दर
  • २६०० - मेगावॅट वीज निर्मिती  
  • १२४ - महाराष्ट्रातील सहवीज प्रकल्प 

महावितरणची वीजबिल वसुलीची सक्ती अत्यंत चुकीची आहे. एफआरपीतील एक नया पैसाही अन्य कुणाला कायद्याने देता येत नाही. साखर कारखाने म्हणजे काय वसुली एजन्सी नव्हे. उद्या कोण आम्हाला घरफाळाही वसूल करून द्या म्हणून सांगेल कारखान्यांनी हेच उद्योग करावेत का? - के.पी.पाटील, अध्यक्ष, दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री, ता. कागल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेelectricityवीज