शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

सर्दी -- आयुर्वेद

By admin | Updated: February 10, 2017 21:22 IST

माणसाने जनावरांप्रमाणे भूक, तहान व झोप याकडे नैसर्गिकरीत्या लक्ष दिले, तर त्याला ‘पाणी किती प्यावे’ हे शिकवायला लागणार नाही,

आज बाहेर थंडी फारच होती. सर्व मुले चिकित्सालयात आली तीच मुले शिंकत आणि नाक ओढत. सर्वच हैराण झाले होते. ‘सर, आयुर्वेदाने सर्दी, पडशाचा विचार कसा केला आहे?’ अंजलीने विचारले. आयुर्वेदाने सर्दीसारख्या विकाराचाही सूक्ष्म विचार केलाय. आज आपण ज्याला ‘अ‍ॅलर्जी’ म्हणतो; त्याचाही विचार आयुर्वेदाने केला आहे; पण प्रत्येक सर्दी अ‍ॅलर्जीनेच होते असे नाही. धुके, थंड वारा, धूळ ही तर सर्दीची कारणे आहेतच; पण ज्याचा आपण सहसा विचार करीत नाही ती कारणेही आयुर्वेदाने सांगितली आहेत. आजही सर्दीच्या रुग्णांमध्ये ती कारणे सापडतात. ती बंद केली की सर्दी जाते. फार बोलणे, फार झोपणे, फार जागणे, उशी न घेता झोपणे, फार पाणी पिणे, दूषित पाणी पिणे, अशी अनेक कारणे आयुर्वेदाने सांगितली आहेत. मुलांनो, अनेकवेळा अती पाणी पिणाऱ्यांमध्ये सर्दी हमखास झालेली पाहायला मिळते. माणसाने जनावरांप्रमाणे भूक, तहान व झोप याकडे नैसर्गिकरीत्या लक्ष दिले, तर त्याला ‘पाणी किती प्यावे’ हे शिकवायला लागणार नाही, असे वाटते. नेहमी म्हणतात की, कुठलाही रोग बरा करायचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे तो होऊ नये याचीच काळजी घ्यावी; हे अक्षरश: खरे आहे. वर सांगितलेली कारणे टाळली तर निम्मी सर्दी कमी होते. सर्व प्रकारच्या पडशात प्रथम जितके जमेल तितके निर्वात जागेत राहावे. पडसे जर पाण्यासारखे असेल, डोकेदुखी असेल, तर पंचकर्मापैकी स्नेहन (तेल लावणे), स्वेदन (शेकणे) व नस्थर (नाकात औषधी थेंब घालणे) हे जास्त उपयोगी पडतात. वमनाचाही चांगला उपयोग होतो. अंगात व डोक्याला बांधण्यासाठी ऊबदार अशा लोकरी कपड्यांचा वापर करावा. आपण खात असलेले अन्न हे पचायला हलके हवे. भाजलेले चणे, गूळ, जव, गहू, सुंठ, मिरी, पिंपळी यांचा वापर अन्नात करावा, सर्दी जर वातज असेल (तज्ज्ञ वैद्यांकडून खात्री करून घ्यावी.) तर दही जरूर खावे. वेखंड किंवा सुंठीचा उगाळून गंधासारखा लेप डोक्यावर घालण्यास हरकत नाही. जर नाकाचा, डोळ्यांचा, घशांचा दाह होत असेल, तर ती सर्दी पित्ताची आहे, असे समजावे, अशावेळी ज्येष्ठमधाने सिद्ध केलेले तूप अधिक उपयोगी पडते. घशाचा दाह करणारे असे तिखट, तेलकट, मसालेदार पदार्ख खाऊ नयेत. जर नाकातील स्त्राव जाड, चिकट असेल, डोके जड वाटत असेल, तर ती कफाची सर्दी समजावी, त्यावेळी मात्र आंबट पदार्थ, दूध व दुधाचे पदार्थ, फ्रीजमधले थंड पदार्थ, दुपारची झोप पूर्ण बंद करावी. कफाच्या सर्दीला थांबविण्याचा रामबाण उपाय म्हणजे झेपेल तेवढा उपवास करणे. पचायला अत्यंत हलके अन्न म्हणजे लाह्या, भात, मूग अशा प्रकारचे अन्न खावे. कफज सर्दीला वमन चांगले उपयोगी पडते. सर्दीचा प्रसार अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे सगळीकडे सर्दी वाढू नये, असं खरोखर सामाजिक भान असेल, तर तोंडावर हात न घेता शिंकू नये. शक्यतो रुमालावर निलगिरीचे थेंब टाकून त्यांचा वापर शिंकताना करावा. अनेकांना शिंकताना, खोकताना साधा हातसुद्धा तोंडावर ठेवण्याचे भान नसते. अशा कारणाने हे रोग फार लवकर पसरतात. रस्त्यातून जाताना कुठेही थुंकू नये. (हे ही माणसाला शिकवावे लागते, हे आर्श्चयच।) अनेक दुष्ट रोगांचा त्यामुळे फैलाव होतो, हे आपण सुजाण नागरिक विसरतो. सर्दीच्या निमित्ताने ‘स्वच्छ भारताचा’ असाही विचार करायला हरकत नसावी. ‘औषध घेतली तर सात दिवसांत आणि नाही घेतली तर आठवड्यात बरी होते,’ अशी बदनाम झालेली सर्दी आपण योग्य काळजी घेतली, तर चांगली आटोक्यात आणू शकतो. ‘आऽऽ..क्शी’ करतच सर्व उठल्हो; पण यावेळी त्यांनी न चुकता आपले रुमाल आपल्या नाकावर धरले होते. ----- डॉ. विवेक हळदवणेकर--(लेखक प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत)