शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी -- आयुर्वेद

By admin | Updated: February 10, 2017 21:22 IST

माणसाने जनावरांप्रमाणे भूक, तहान व झोप याकडे नैसर्गिकरीत्या लक्ष दिले, तर त्याला ‘पाणी किती प्यावे’ हे शिकवायला लागणार नाही,

आज बाहेर थंडी फारच होती. सर्व मुले चिकित्सालयात आली तीच मुले शिंकत आणि नाक ओढत. सर्वच हैराण झाले होते. ‘सर, आयुर्वेदाने सर्दी, पडशाचा विचार कसा केला आहे?’ अंजलीने विचारले. आयुर्वेदाने सर्दीसारख्या विकाराचाही सूक्ष्म विचार केलाय. आज आपण ज्याला ‘अ‍ॅलर्जी’ म्हणतो; त्याचाही विचार आयुर्वेदाने केला आहे; पण प्रत्येक सर्दी अ‍ॅलर्जीनेच होते असे नाही. धुके, थंड वारा, धूळ ही तर सर्दीची कारणे आहेतच; पण ज्याचा आपण सहसा विचार करीत नाही ती कारणेही आयुर्वेदाने सांगितली आहेत. आजही सर्दीच्या रुग्णांमध्ये ती कारणे सापडतात. ती बंद केली की सर्दी जाते. फार बोलणे, फार झोपणे, फार जागणे, उशी न घेता झोपणे, फार पाणी पिणे, दूषित पाणी पिणे, अशी अनेक कारणे आयुर्वेदाने सांगितली आहेत. मुलांनो, अनेकवेळा अती पाणी पिणाऱ्यांमध्ये सर्दी हमखास झालेली पाहायला मिळते. माणसाने जनावरांप्रमाणे भूक, तहान व झोप याकडे नैसर्गिकरीत्या लक्ष दिले, तर त्याला ‘पाणी किती प्यावे’ हे शिकवायला लागणार नाही, असे वाटते. नेहमी म्हणतात की, कुठलाही रोग बरा करायचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे तो होऊ नये याचीच काळजी घ्यावी; हे अक्षरश: खरे आहे. वर सांगितलेली कारणे टाळली तर निम्मी सर्दी कमी होते. सर्व प्रकारच्या पडशात प्रथम जितके जमेल तितके निर्वात जागेत राहावे. पडसे जर पाण्यासारखे असेल, डोकेदुखी असेल, तर पंचकर्मापैकी स्नेहन (तेल लावणे), स्वेदन (शेकणे) व नस्थर (नाकात औषधी थेंब घालणे) हे जास्त उपयोगी पडतात. वमनाचाही चांगला उपयोग होतो. अंगात व डोक्याला बांधण्यासाठी ऊबदार अशा लोकरी कपड्यांचा वापर करावा. आपण खात असलेले अन्न हे पचायला हलके हवे. भाजलेले चणे, गूळ, जव, गहू, सुंठ, मिरी, पिंपळी यांचा वापर अन्नात करावा, सर्दी जर वातज असेल (तज्ज्ञ वैद्यांकडून खात्री करून घ्यावी.) तर दही जरूर खावे. वेखंड किंवा सुंठीचा उगाळून गंधासारखा लेप डोक्यावर घालण्यास हरकत नाही. जर नाकाचा, डोळ्यांचा, घशांचा दाह होत असेल, तर ती सर्दी पित्ताची आहे, असे समजावे, अशावेळी ज्येष्ठमधाने सिद्ध केलेले तूप अधिक उपयोगी पडते. घशाचा दाह करणारे असे तिखट, तेलकट, मसालेदार पदार्ख खाऊ नयेत. जर नाकातील स्त्राव जाड, चिकट असेल, डोके जड वाटत असेल, तर ती कफाची सर्दी समजावी, त्यावेळी मात्र आंबट पदार्थ, दूध व दुधाचे पदार्थ, फ्रीजमधले थंड पदार्थ, दुपारची झोप पूर्ण बंद करावी. कफाच्या सर्दीला थांबविण्याचा रामबाण उपाय म्हणजे झेपेल तेवढा उपवास करणे. पचायला अत्यंत हलके अन्न म्हणजे लाह्या, भात, मूग अशा प्रकारचे अन्न खावे. कफज सर्दीला वमन चांगले उपयोगी पडते. सर्दीचा प्रसार अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे सगळीकडे सर्दी वाढू नये, असं खरोखर सामाजिक भान असेल, तर तोंडावर हात न घेता शिंकू नये. शक्यतो रुमालावर निलगिरीचे थेंब टाकून त्यांचा वापर शिंकताना करावा. अनेकांना शिंकताना, खोकताना साधा हातसुद्धा तोंडावर ठेवण्याचे भान नसते. अशा कारणाने हे रोग फार लवकर पसरतात. रस्त्यातून जाताना कुठेही थुंकू नये. (हे ही माणसाला शिकवावे लागते, हे आर्श्चयच।) अनेक दुष्ट रोगांचा त्यामुळे फैलाव होतो, हे आपण सुजाण नागरिक विसरतो. सर्दीच्या निमित्ताने ‘स्वच्छ भारताचा’ असाही विचार करायला हरकत नसावी. ‘औषध घेतली तर सात दिवसांत आणि नाही घेतली तर आठवड्यात बरी होते,’ अशी बदनाम झालेली सर्दी आपण योग्य काळजी घेतली, तर चांगली आटोक्यात आणू शकतो. ‘आऽऽ..क्शी’ करतच सर्व उठल्हो; पण यावेळी त्यांनी न चुकता आपले रुमाल आपल्या नाकावर धरले होते. ----- डॉ. विवेक हळदवणेकर--(लेखक प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत)