शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या आधीच नारळ भडकला; दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:16 IST

आवक कमी झाल्याने नारळाचा तुटवडा

कोल्हापूर : ग्लोबल वॉर्मिंगचा फटका यंदा नारळाला बसला आहे. दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाला कीड लागल्याने यंदा उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे चढ्या दराने नारळ विकले जात आहेत. या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.कोल्हापुरात तामिळनाडू आणि कर्नाटक येथून येणारी नारळाची आवक एकदम कमी झाली आहे, त्यामुळे किरकोळ नारळविक्रीचा दर २५ रुपयांवरून ३५ ते ४० रुपये नग झाला आहे. आवक घटल्यामुळे नारळाचे दर यंदा श्रावणापूर्वी दोन महिने आधीच वाढले आहेत. गौरी-गणपतीचा सण तोंडावर असून, या काळात हा दर वाढलेला असून दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे.सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नारळाची सुमारे ६० ते १०० टन आवक होते. यंदा ती गतवर्षीपेक्षा जास्त असली तरी मुळातच आवक कमी झाल्याने नारळाचा तुटवडा आहे. कोकणातही रोज ५०० पोती नारळ कोल्हापुरातून जातो. घाऊक बाजारात नारळ ५ ते १५ रुपयांना मिळत होते. किंमतही १५ रुपयांपेक्षा जास्त वाढत नव्हती.याउलट, सुमारे ५०० ग्रॅम वजनाच्या नारळाची किमान किंमत ३० रुपये आणि मोठ्या म्हणजे जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कोठारी’ नारळाची किंमत आता बाजारात ६० ते ६५ रुपये झाली आहे. एका आठवड्यात नारळाच्या किमतीत प्रतिकिलो सात रुपयांनी वाढ झाली आहे.

आम्हांला जेवणात ओले खोबरे घालायला आवडते. नारळाचे दर वाढल्याने वापरावर मर्यादा आल्या आहेत. - सरिता जाधव, सोन्यामारुती चौक, कोल्हापूर. 

गेल्या काही वर्षांत किमती सातत्याने वाढत असल्या तरी, नारळाची किंमत अभूतपूर्व पातळीवर पोहोचल्या आहेत. याचा फटका सामान्य व्यक्तीला बसत आहे. - अविनाश नासिपुडे, नारळ व्यापारी, महापालिका चौक, कोल्हापूर.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे यंदा नारळाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने इतर राज्यांवरील भार वाढला आहे. त्याचा फटका नारळविक्रीवर झाला आहे.- निखिल बेंडके, नारळ व्यापारी, लक्ष्मीपुरी