शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

मुख्यमंत्र्यांनी ऊसदरासाठी आता तिजोरी उघडावी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 20:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी,

ठळक मुद्देहंगामाबाबत सरकार-कारखानदारांनी ठरवावेमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी, असे आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत ‘एफआरपी अधिक दोनशे रुपये’ घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शेतकरी संघटनांनी केलेली मागणी, बाजारातील साखरेचे दर व बँकांकडून मिळणारी उचल यामध्ये तफावत असल्याने संघटनांच्या मागणीप्रमाणे शेतकºयांना दर देऊ शकत नाही, अशी भूमिका घेत बुधवारपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार शेट्टी यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, कारखानदारांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी सरकार व कारखानदारांनी काय ते ठरवावे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात येऊन ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपये उसाचा दर जाहीर केला आहे. त्यासाठी साखरेचा बाजारातील किमान दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये करतो, निर्यात साखरेबाबत बँक, केंद्र सरकार व कारखाने यांच्यामध्ये त्रिस्तरीय करार व राज्य सरकारकडून लागेल ती मदत करण्याची ग्वाही जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या घोषणा फडणवीस यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच केल्या असणार यात माझ्या मनात शंका नाही. आता त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. कारखान्यांनी हंगाम बंद करून कोणाची कोंडी केली हे मला माहिती नाही, हंगामाबाबत सरकार व कारखानदारांनी ठरवावे पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाहीएफआरपी अधिक २00 रुपये घेतल्याशिवाय ‘स्वाभिमानी’मागे हटणार नसल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान,बुधवारी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गाळप बंद ठेवले. ‘शाहू’चे सुमारे ८०० टन, तर ‘वारणा’चे ४०० टन ऊस ‘राजाराम’ कारखान्यात आणून गाळप केल्याचे समजते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर