शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

मुख्यमंत्र्यांनी ऊसदरासाठी आता तिजोरी उघडावी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 20:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी,

ठळक मुद्देहंगामाबाबत सरकार-कारखानदारांनी ठरवावेमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी, असे आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत ‘एफआरपी अधिक दोनशे रुपये’ घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शेतकरी संघटनांनी केलेली मागणी, बाजारातील साखरेचे दर व बँकांकडून मिळणारी उचल यामध्ये तफावत असल्याने संघटनांच्या मागणीप्रमाणे शेतकºयांना दर देऊ शकत नाही, अशी भूमिका घेत बुधवारपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार शेट्टी यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, कारखानदारांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी सरकार व कारखानदारांनी काय ते ठरवावे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात येऊन ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपये उसाचा दर जाहीर केला आहे. त्यासाठी साखरेचा बाजारातील किमान दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये करतो, निर्यात साखरेबाबत बँक, केंद्र सरकार व कारखाने यांच्यामध्ये त्रिस्तरीय करार व राज्य सरकारकडून लागेल ती मदत करण्याची ग्वाही जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या घोषणा फडणवीस यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच केल्या असणार यात माझ्या मनात शंका नाही. आता त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. कारखान्यांनी हंगाम बंद करून कोणाची कोंडी केली हे मला माहिती नाही, हंगामाबाबत सरकार व कारखानदारांनी ठरवावे पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाहीएफआरपी अधिक २00 रुपये घेतल्याशिवाय ‘स्वाभिमानी’मागे हटणार नसल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान,बुधवारी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गाळप बंद ठेवले. ‘शाहू’चे सुमारे ८०० टन, तर ‘वारणा’चे ४०० टन ऊस ‘राजाराम’ कारखान्यात आणून गाळप केल्याचे समजते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर