शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार औषध विक्रेत्यांचा उद्या बंद

By admin | Updated: May 29, 2017 16:16 IST

आॅनलाईन फार्मसीला विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २९: आॅनलाईन फार्मसीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी उद्या, मंगळवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार विक्रेते सहभागी होणार आहेत. या बंदसह सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी सोमवारी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान आॅनलाईन औषध विक्रीबाबत अनेकवेळा गंभीर बाबींची साशंकता व्यक्त केल्या नंतरही प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सरकार देशात ई-फार्मसी व ई-पोर्टल लागू करण्याची योजना आखत असल्यामुळे देशातील व राज्यातील औषध विक्रेत्यांनी अखिल भारतीय औषधी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

आॅनलाईन फार्मसीची निती आणि केंद्र सरकारच्या पब्लिक नोटीस विरोधात पुकारलेल्या मंगळवारच्या बंदमध्ये देशातील आठ लाख आणि महाराष्ट्रातील ५५ हजार औषध विक्रेते सहभागी होतील. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार विक्रेते या आंदोलनात सहभागी असतील. असोसिएशनद्वारे सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असोसिएशनचे कार्यालय, उद्योगभवन, जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग आहे. आॅनलाईन फार्मसी विरोधातील निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले जाणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष पाटील यांनी साांगितले.

अत्यावश्यक सुविधा पुरविणार बंद असला, तरी एखाद्या रुग्णाला औषधांची गरज भासल्यास त्यांच्यासाठी जिल्हा केमिस्ट असोसिएशनतर्फे अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येईल. यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी असोसिएशनच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांना आवश्यक असणारी औषधे त्वरीत उपलब्ध करुन दिली जातील,असे असोसिएशनचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

विक्रेत्यांचा विरोध यासाठी

औषधांच्या दुष्परिणामांपासून सामान्य जनतेस वाचविणे, कमी दर्जाच्या अप्रमाणित, डुप्लिकेट औषधांच्या शिरकावाची दाट शक्यता, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अ‍ॅँटिबायोटेक्स, वेदनाशामक किंवा अन्य औषधांच्या वापरास चालना मिळणे, युवकांमध्ये नशेच्या औषधांचा वापरास मोठा धोका, देशातील आठ लाख औषध विक्रेते व ४० लाख कर्मचाऱ्यांच्या कुटंबीयांवर आर्थिक संकट येणार आहे, अशा विविध कारणांमुळे औषध विक्रेत्यांचा आॅनलाईन फार्मसीला विरोध आहे. राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू असून, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.