शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

यड्रावमध्ये स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’!

By admin | Updated: November 17, 2014 23:27 IST

नियोजनाचा अभाव : स्वच्छता अभियान नावापुरतेच; कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप

घन:शाम कुंभार - यड्राव -येथील कचऱ्याचा उठाव वेळच्या वेळी होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोणते काम करू अन् कोणते नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वच्छतेशिवाय इतर कामे कर्मचाऱ्यांना लावल्याने परिसर स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’ झाली आहे. यामुळे स्वच्छता अभियान नावापुरतेच राहिले आहे.यड्राव मुख्य गावाभोवती वस्ती वाढल्याने उपनगरे स्थापितझाली आहेत. रेणुकानगर, इंदिरानगर, शामनगर, आर. के. नगर, पार्वती हौसिंग सोसायटी, अशा विस्तीर्ण परिसरामुळे स्वच्छता करण्याचे काम तेरा कर्मचाऱ्यांवर आहे. प्रत्येक भागाकडे पंधरा दिवसांतून एक दिवस स्वच्छतेसाठी मिळतो. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना दुसरे काम लागले की, पुन्हा पंधरा दिवस स्वच्छता राहिल्यामुळे कचऱ्याचा साठा वाढतो. कचरा उठावासाठी विशिष्ट प्रभागात प्राधान्य दिले जात असल्याने सदस्य व पुढाऱ्यांचा कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप होत आहे. याचबरोबर काही खासगी उद्योगांसमोर होत असलेली स्वच्छता हाही चर्चेचा विषय होत आहे. गावातील षट्कोन शाळा मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा गळतीचेही काम करावे लागत असल्याने स्वच्छता कामात खंड पडत आहे. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. गावच्या पश्चिम भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असल्यामुळे कचऱ्यांचे ढीग विस्कटल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. घरातील व घराबाहेरील कचरा कुंडीत टाकण्याची जबाबदारीही ग्रामस्थांची आहे. यामुळे स्वच्छता करण्यास कर्मचाऱ्यांना सोईचे होईल व स्वच्छता अभियान राबविले याचे समाधानही त्यातून मिळेल. ग्रामपंचायतीकडून कचरा उठावाचे नियोजन होणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना इतर कामे न लावल्यास ग्राम स्वच्छता होईल. गरजेची कामे संबंधित विभागांनी केल्यास योग्य नियोजन होईल. पुरस्काराच्या जबाबदारीकडे दुर्लक्षसध्या डेंग्यूच्या आजाराचा बोलबाला सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वच्छता अभियान’ राबवित आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येते. अशा स्थितीत ग्रामपंचायत स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नाही. कारण ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्रामचे पुरस्कार पंचायतीस मिळाले आहेत. पुरस्कारानंतर जबाबदारी वाढते याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे.