शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावमध्ये स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’!

By admin | Updated: November 17, 2014 23:27 IST

नियोजनाचा अभाव : स्वच्छता अभियान नावापुरतेच; कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप

घन:शाम कुंभार - यड्राव -येथील कचऱ्याचा उठाव वेळच्या वेळी होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोणते काम करू अन् कोणते नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वच्छतेशिवाय इतर कामे कर्मचाऱ्यांना लावल्याने परिसर स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’ झाली आहे. यामुळे स्वच्छता अभियान नावापुरतेच राहिले आहे.यड्राव मुख्य गावाभोवती वस्ती वाढल्याने उपनगरे स्थापितझाली आहेत. रेणुकानगर, इंदिरानगर, शामनगर, आर. के. नगर, पार्वती हौसिंग सोसायटी, अशा विस्तीर्ण परिसरामुळे स्वच्छता करण्याचे काम तेरा कर्मचाऱ्यांवर आहे. प्रत्येक भागाकडे पंधरा दिवसांतून एक दिवस स्वच्छतेसाठी मिळतो. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना दुसरे काम लागले की, पुन्हा पंधरा दिवस स्वच्छता राहिल्यामुळे कचऱ्याचा साठा वाढतो. कचरा उठावासाठी विशिष्ट प्रभागात प्राधान्य दिले जात असल्याने सदस्य व पुढाऱ्यांचा कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप होत आहे. याचबरोबर काही खासगी उद्योगांसमोर होत असलेली स्वच्छता हाही चर्चेचा विषय होत आहे. गावातील षट्कोन शाळा मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा गळतीचेही काम करावे लागत असल्याने स्वच्छता कामात खंड पडत आहे. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. गावच्या पश्चिम भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असल्यामुळे कचऱ्यांचे ढीग विस्कटल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. घरातील व घराबाहेरील कचरा कुंडीत टाकण्याची जबाबदारीही ग्रामस्थांची आहे. यामुळे स्वच्छता करण्यास कर्मचाऱ्यांना सोईचे होईल व स्वच्छता अभियान राबविले याचे समाधानही त्यातून मिळेल. ग्रामपंचायतीकडून कचरा उठावाचे नियोजन होणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना इतर कामे न लावल्यास ग्राम स्वच्छता होईल. गरजेची कामे संबंधित विभागांनी केल्यास योग्य नियोजन होईल. पुरस्काराच्या जबाबदारीकडे दुर्लक्षसध्या डेंग्यूच्या आजाराचा बोलबाला सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वच्छता अभियान’ राबवित आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येते. अशा स्थितीत ग्रामपंचायत स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नाही. कारण ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्रामचे पुरस्कार पंचायतीस मिळाले आहेत. पुरस्कारानंतर जबाबदारी वाढते याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे.