शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

यड्रावमध्ये स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’!

By admin | Updated: November 17, 2014 23:27 IST

नियोजनाचा अभाव : स्वच्छता अभियान नावापुरतेच; कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप

घन:शाम कुंभार - यड्राव -येथील कचऱ्याचा उठाव वेळच्या वेळी होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोणते काम करू अन् कोणते नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वच्छतेशिवाय इतर कामे कर्मचाऱ्यांना लावल्याने परिसर स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’ झाली आहे. यामुळे स्वच्छता अभियान नावापुरतेच राहिले आहे.यड्राव मुख्य गावाभोवती वस्ती वाढल्याने उपनगरे स्थापितझाली आहेत. रेणुकानगर, इंदिरानगर, शामनगर, आर. के. नगर, पार्वती हौसिंग सोसायटी, अशा विस्तीर्ण परिसरामुळे स्वच्छता करण्याचे काम तेरा कर्मचाऱ्यांवर आहे. प्रत्येक भागाकडे पंधरा दिवसांतून एक दिवस स्वच्छतेसाठी मिळतो. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना दुसरे काम लागले की, पुन्हा पंधरा दिवस स्वच्छता राहिल्यामुळे कचऱ्याचा साठा वाढतो. कचरा उठावासाठी विशिष्ट प्रभागात प्राधान्य दिले जात असल्याने सदस्य व पुढाऱ्यांचा कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप होत आहे. याचबरोबर काही खासगी उद्योगांसमोर होत असलेली स्वच्छता हाही चर्चेचा विषय होत आहे. गावातील षट्कोन शाळा मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा गळतीचेही काम करावे लागत असल्याने स्वच्छता कामात खंड पडत आहे. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. गावच्या पश्चिम भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असल्यामुळे कचऱ्यांचे ढीग विस्कटल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. घरातील व घराबाहेरील कचरा कुंडीत टाकण्याची जबाबदारीही ग्रामस्थांची आहे. यामुळे स्वच्छता करण्यास कर्मचाऱ्यांना सोईचे होईल व स्वच्छता अभियान राबविले याचे समाधानही त्यातून मिळेल. ग्रामपंचायतीकडून कचरा उठावाचे नियोजन होणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना इतर कामे न लावल्यास ग्राम स्वच्छता होईल. गरजेची कामे संबंधित विभागांनी केल्यास योग्य नियोजन होईल. पुरस्काराच्या जबाबदारीकडे दुर्लक्षसध्या डेंग्यूच्या आजाराचा बोलबाला सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वच्छता अभियान’ राबवित आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येते. अशा स्थितीत ग्रामपंचायत स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नाही. कारण ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्रामचे पुरस्कार पंचायतीस मिळाले आहेत. पुरस्कारानंतर जबाबदारी वाढते याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे.