शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर, धोका मात्र आजही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:30 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून, सध्या शहरात केवळ ४५ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरवासीयांच्या दृष्टीने ही एक ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून, सध्या शहरात केवळ ४५ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरवासीयांच्या दृष्टीने ही एक चांगली बातमी असली तरी, कोरोना संसर्गाचा धोका मात्र आजही कायम आहे. मंगळवारी झालेल्या गौरी-गणपती विसर्जनावेळी अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते, गर्दी टाळण्याचे भान राहिले नाही. त्यामुळे जरी कोरोना संसर्ग कमी होत असला, तरी तो पुन्हा नव्याने सुरूहोणार नाही, यादृष्टीने अधिक जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेची रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर्संमधून केवळ ३६ रुग्ण उपचार घेत आहेत. नऊ रुग्ण गृह अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. बुधवारी नव्याने केवळ १६ रुग्ण आढळून आले. एकेकाळी शहरातील रुग्णालयातून तसेच कोविड सेंटर्समधून रुग्णांवर उपचार करण्यास बेड मिळत नव्हते; पण आता सर्वच रुग्णालये मोकळी पडली आहेत.

एकीकडे रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, नवीन रुग्णांची संख्या घटत असताना, वातावरणातील संसर्गाचा धोका कमी झाला आहे. मात्र दुसरीकडे गणेशोत्सव सुरू झाल्यामुळे शहरात गर्दी वाढत आहे. मास्क लावणे, गर्दी टाळणे या महत्त्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. मंगळवारी घरगुती गौरी गणपती विसर्जन झाले. त्यावेळी या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. म्हणूनच कोरोनाचा धोका संपलेला नाही. यापुढील काळात अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे.