शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
3
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
4
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
5
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
6
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
7
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
8
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
9
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
10
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
11
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
12
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
13
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
14
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

३९ फूट पाणीपातळीवर नागरिकांचे स्थलांतर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:12 IST

पंचगंगा नदीची पाणीपातळी ३९ फूट (इशारा पातळी) झाल्यावर प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूर व पूरपरिस्थितीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्दे३९ फूट पाणीपातळीवर नागरिकांचे स्थलांतर करणारसतेज पाटील यांची माहिती : पूर स्थितीबाबतचा घेतला आढावा

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणीपातळी ३९ फूट (इशारा पातळी) झाल्यावर प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूर व पूरपरिस्थितीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा आणि पडणारा पाऊस यांबाबत आढावा घेण्यात आला.मंत्री पाटील म्हणाले, पंचगंगेच्या ३९ फुटांवर पाणीपातळी गेल्यानंतर नागरिकांचे स्थलांतर सुरू करावे. जनावरांसाठी नागरिक मागे थांबतात; त्यामुळे सर्वांत आधी जनावरांना बाहेर काढण्यात यावे. याबाबत एसओपी तयार करावी. जेसीबी, पोकलॅन आणि जनरेटर यँची यादी तालुकानिहाय तयार ठेवावी. ते चालवणारे चालक यांचीही यादी आणि संपर्क क्रमांक तयार ठेवावेत. आंबेवाडी, चिखली या गावांमध्ये आधीच जेसीबी ठेवता येईल का, याबाबतही नियोजन करावे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे,ते म्हणाले, गेल्या १५ ते २० वर्षांत पडलेल्या पावसाची आणि धरणांतील पाणीसाठा यांच्या सरासरीबाबत एक आराखडा तयार करावा. त्यानुसार १ जुलै रोजी जिल्ह्यातील धरणांमध्ये काय स्थिती असेल, याची माहिती देऊन पाणीविसर्गाबाबत नियोजन करावे. प्रत्येक धरणाच्या ठिकाणी बेस स्टेशन बसवून संदेशवहनासाठी वॉकीटॉकीचे, पोलीस विभागाचे स्टॅटिक वापरून समांतर संदेशवहन यंत्रणाही माहिती देण्यासाठी उभी करावी. विजेच्या तारा कोठून गेल्या आहेत, कोठे ट्रान्स्फार्मर्स आहेत याची माहिती मॅप मार्कर ॲपच्या माध्यमातून अपलोड करण्यात येत आहे. या माहितीमुळे आपत्ती व्यवस्थापनात बोटी घेऊन जात असताना सुलभतेने मदत होणार आहे.आवश्यक ठिकाणी ७५ ट्रान्स्फॉर्मर्सह्यमहावितरणह्णला दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी ७५ ट्रान्स्फॉर्मर्स ठेवण्यात आले आहेत. खांब पडला तर अडचण येऊ नये यासाठी दोन हजार विजेचे खांब विकत घेतले असून तीन दिवसांत त्या तालुक्यांमध्ये ते पोहोच होतील. कर्मचाऱ्यांसाठी ५० लाईफ जॅकेट विकत घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.२५ नव्या बोटींची खरेदीआपत्ती व्यवस्थापनकडे सध्या २० बोटी कार्यान्वित असून आणखी २५ नव्या बोटींची खरेदी करण्यात आली आहे. आठवडाभरात त्यांपैकी १० ते १५ बोटी उपलब्ध होतील. याशिवाय महापालिकेच्या ११ बोटी व जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी किमान दोन बोटी देण्याचे सांगितले आहे. महापालिका आयुक्तांनीही जिल्ह्यातील २५ ते २९ कमी आणि जास्त बाधित प्रभागांचा आढावा दिला आहे. शिंगणापूर पाणी योजना ही कमाल पाणी पातळीत कशी चालू ठेवता येईल, याबाबतही उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, पावसामुळे रस्ते बंद होतात त्याची माहिती तत्काळ कशी घेता येईल याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने मोबाईल ॲप तयार करावे. शिरोळ तालुक्यात जागेची पाहणी करून हेलिपॅड तयार करावे.पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी धरणांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, ह्यमहावितरणह्णचे कार्यकारी अभियंता सागर मारूलकर यांनी तयारीबाबत माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.तीन महिन्यांचे धान्य केले पोहोचजिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी शाहूवाडीतील चार, गगनबावड्यातील एक, राधानगरीतील १३, आजऱ्यामधील दोन आणि हातकणंगलेतील एक अशा २१ गावांत पुढील तीन महिन्यांचे धान्य पोहोचविल्याची माहिती दिली. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcollectorजिल्हाधिकारी