शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

लसीच्या दुसऱ्या डोससाठी नागरिकांची तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:37 IST

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ठरावीक मुदतीत दुसरा डोस ...

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ठरावीक मुदतीत दुसरा डोस घेणे आवश्यक असताना तो मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. यासाठी लसीकरण केंद्रांवर फेऱ्या मारणे सुरू असून, आता प्रशासनाने यासाठी वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. ज्यांनी खासगी रुग्णालयामध्ये लस घेतली आहे ते नागरिकही त्या त्या रुग्णालयांच्या मागे लस देण्यासाठी रोज तगादा लावत आहेत.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यात, फ्रंटलाइन वर्कर आणि पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी यांना दुसऱ्या टप्प्यात, ज्येष्ठ नागरिक यांना तिसऱ्या टप्प्यात तर ४५ वर्षांवरील नागरिकांना चौथ्या टप्प्यात लसीकरण सुरू करण्यात आले.

यातील कोव्हॅक्सिनचा डोस ज्यांनी घेतला आहे त्यांना २८ ते ४५ दिवसांमध्ये दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे, तर कोविशिल्डचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे अशांनी ४५ ते ५६ दिवसांमध्ये दुसरा डोस घेणे बंधकारक आहे. पहिला डोस घेतल्यानंतर काही प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढते. परंतु १०० टक्के प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दुसरा डोस अत्यावश्यक असतो.

परंतु कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस लस आलेली नाही. गेल्या पंधरवड्यापासून लसींचा खेळखंडोबा सुरू असून, यामुळे सगळ्यात हवालदिल झाले आहेत ते पहिला डोस घेतलेले नागरिक. दुसऱ्या डोसची मुदत संपत आली तरी तो मिळत नसल्याने अशा नागरिकांचा धीर सुटत चालला आहे. रोज चौकशी करायची, लसीकरण केंद्रांवर जायचे आणि लस नाही म्हणून, गर्दी प्रचंड आहे म्हणून परत यायचे असे अनेकांच्या बाबतीत सुरू आहे.

चौकट

ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल

या सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. एकतर वय जास्त झाले आहे म्हणून बाहेर जायचे नाही. गर्दीतच पहिला डोस घेतला तर आता दुसरा डोस मिळत नाही, अशा कात्रीत ही मंडळी अडकली आहेत. एकदा का दोन डोस घेतले की, आपल्याला कोरोना होणार नाही, हा आशावाद त्यांना प्रेरणा देऊ शकतो. मात्र, दुसरा डोसच उपलब्ध होत नसल्याने पुन्हा नव्याने डोस घ्यावा लागण्याची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.

चौकट

हे करता येईल

ज्यांना पहिला डोस दिला आहे, अशांना लस उपलब्ध झाल्यानंतर मेसेज पाठवायचे. त्यांनाच केंद्रांवर दुसरी रांग करून लसीकरणासाठी प्राधान्य द्यायचे. यासाठी वेगळे नियोजन करून पहिला डोस दिलेल्या नागरिकांना दिलासा देता येणे शक्य आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेने यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.

प्राधान्याने दुसरा डोसच द्या

जिल्हा प्रशासनाने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याऐवजी ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना तातडीने दुसरा डोस कसा मुदतीत मिळेल, यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे.