शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

सर्किट बेंचआंदोलन ताकदीने सुरूच ठेवणार

By admin | Updated: April 13, 2017 01:00 IST

खंडपीठ पक्षकार कृती समिती मेळाव्यात निर्णय : उद्यापासून सहा जिल्ह्यांचा जनजागृती दौरा

कोल्हापूर : खंडपीठ हे सहा जिल्ह्यांसाठी असल्याने नेतृत्ववादाचा मुद्दा न ठेवता कोल्हापुरात खंडपीठ होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्णय खंडपीठ पक्षकार कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला. उद्या, शुक्रवारी बिंदू चौकात संविधानाचे पूजन करून सहा जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचे सिटिझम फोरमचे प्रसाद जाधव यांनी सांगितले. येथील शाहू स्मारक भवनमध्ये बुधवारी सकाळी हा मेळावा पार पडला.कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी २८ वर्षांपासून वकिलांनी लढा उभारला आहे. हा लढा आता अंतिम टप्प्यात आहे. गेल्या पाच वर्षांपासून आंदोलनाची तीव्रता वाढल्यामुळे राज्य सरकारने कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी ठराव उच्च न्यायालयात पाठविला आहे तसेच ५ एप्रिलला कोल्हापुरातील सर्व खासदार, आमदार, महापौर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खंडपीठासाठी प्रयत्न करण्याचे निवेदन दिले होते. त्यामुळे खंडपीठाचा मुद्दा आता निर्णयाच्या अंतिम टप्प्यात आला आहे. प्रसाद जाधव म्हणाले, श्रेयवादामुळे आंदोलन दिशाहीन होत आहे. खंडपीठ मिळणे अंतिम टप्प्यात असताना कोणा एकामुळे हे यश मिळालेले नाही तर त्यासाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील जनता व वकिलांनी रेटा लावला आहे. २०१३ पासून आम्ही सायकल रॅली, मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आंदोलन केले आहे.बाजीराव नाईक, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, शिवाजीराव परूळेकर, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. व्ही. आर. पाटील, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, ‘मनसे’चे राजू जाधव, अ‍ॅड. पद्माकर कापसे, गायत्री राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, बाबा महाडिक, सुनील सामंत, गणेश चिले, किशोर डवंग, अशोक रामचंदानी, मधुकर पाटील, बजरंग शेलार, प्रकाश पाटील, महादेव पाटील, फिरोज शेख, सुभाष कोळी, संभाजी जगदाळे, प्रशांत पाटील, शक्ती सारंग, वंदना आळतेकर, सविता पाटील, शोभा खेडकर, आदी उपस्थित होते.श्रेयवाद, नेतृत्ववादामुळे आंदोलन दिशाहीनखंडपीठासाठी श्रेयवाद व नेतृत्ववाद यामुळे वेगळाच मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे आंदोलन दिशाहीन होत आहे. याबाबत उठणारे गैरसमज दूर करण्यासाठी खंडपीठ नागरी पक्षकार कृती समितीच्यावतीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णंय घेतला. या आंदोलनात वकील सहभागी झाले नाहीत, तरी खंडपीठ हे सर्वसामान्य पक्षकारांसाठी गरजेचे आहे. यासाठी न्यायव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करायचा, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.कोल्हापूर खंडपीठ स्थापन करावे, या मागणीसाठी बुधवारी कोल्हापुरात शाहू स्मारक भवनमध्ये खंडपीठ पक्षकार कृती समितीच्यावतीने आयोजित मेळाव्यात निमंत्रक प्रसाद जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. पद्माकर कापसे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, सचिन तोडकर, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.